पणजी - दीड दिवसाच्या 'बाप्पाला' भक्तीपूर्ण वातावरणात गोव्यात ठिकठिकाणी निरोप देण्यात आला. गणेश विसर्जन काळात भक्तांच्या मदतीसाठी गोवा सरकारने नियुक्त केलेल्या 'द्रुष्टी मरीन' एजन्सीतर्फे किनारी भागात 40 विसर्जन ठिकाणी जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.
गोव्यात दीड दिवसाच्या घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असते. यासाठी दुपारपासून रात्री उशीरापर्यंत भाविक कुटुंबियांसह गणेश मूर्ती घेऊन दाखल होत असतात. तेथे आरती केल्यानंतर मूर्ती विसर्जित केली जाते. गावातील विसर्जन हे एकत्रितरित्या तळ्यात अथवा नदीवर केले जाते, तर किनारी भागात समुद्रात गणेश मूर्ती विसर्जन केले जाते. त्यामुळे आजपासून (दि. 3) दि. 13 सप्टेंबर पर्यंत राज्यातील किनारी भागात 40 ठिकाणी जीवरक्षक तैनात करण्यात आले आहे.
दूपारपासूनच एकएक भाविक किनाऱ्यावर येत गणेश मूर्ती विसर्जन करत होते. गणपती बाप्पा मोरयाच्या गजराच गणरायाला निरोप देत होते. यामध्ये महिला आणि मुले सहभागी झाली होती. तर काही ठिकाणी पर्यटकही आरती म्हणत गणरायाला निरोप देताना दिसत होते.