ETV Bharat / city

Chhagan Bhujbal On Hijab Controversy : जाती धर्माचे विष पेरण्याचे काम करु नका, भुजबळांचा इशारा

author img

By

Published : Feb 11, 2022, 1:23 PM IST

छगन भुजबळ यांनी हिजाब प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शांततेने सत्याग्रह करण्याचा अधिकार सर्वांना आहे. शांततेने मत मांडा कुठेही हिंसाचार होणार नाही याची काळजी घ्या, असे त्यांनी म्हटलं आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक - हिजाब प्रकरणावर देशात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावर राज्याचे अन्नपुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत मांडले ( Chhagan Bhujbal On Hijab Controversy ) आहे. शांततेने सत्याग्रह करण्याचा अधिकार सर्वांना आहे. माझी विनंती आहे, शांततेने मत मांडा कुठेही हिंसाचार होणार नाही याची काळजी घ्या. शाळा - कॉलेज मध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्माचे विष पेरण्याचा काम करू नका, असा इशारा भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) यांनी दिला आहे.

भुजबळ फार्म येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातेमा शेख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर गेलं पाहिजे. देशातील मोठ्या नेत्यांना माझी विनंती आहे की, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम आपण केले पाहिजे. आपले मत शांततेने मांडा, अशी विनंतीही त्यांनी केली.

छगन भुजबळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

विद्यार्थ्यांमध्ये जर अशाच जाती - धर्माच्या भिंती उभ्या केल्या तर देशाच्या घटनेच्या दृष्टीने अयोग्य आहे. विद्यार्थ्यांनी हे प्रकरण वाढवू नये शिक्षणावर लक्ष द्यावे, असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केलं आहे.

हेही वाचा - President at Raj Bhavan : राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटन

नाशिक - हिजाब प्रकरणावर देशात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावर राज्याचे अन्नपुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत मांडले ( Chhagan Bhujbal On Hijab Controversy ) आहे. शांततेने सत्याग्रह करण्याचा अधिकार सर्वांना आहे. माझी विनंती आहे, शांततेने मत मांडा कुठेही हिंसाचार होणार नाही याची काळजी घ्या. शाळा - कॉलेज मध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्माचे विष पेरण्याचा काम करू नका, असा इशारा भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) यांनी दिला आहे.

भुजबळ फार्म येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातेमा शेख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर गेलं पाहिजे. देशातील मोठ्या नेत्यांना माझी विनंती आहे की, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम आपण केले पाहिजे. आपले मत शांततेने मांडा, अशी विनंतीही त्यांनी केली.

छगन भुजबळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

विद्यार्थ्यांमध्ये जर अशाच जाती - धर्माच्या भिंती उभ्या केल्या तर देशाच्या घटनेच्या दृष्टीने अयोग्य आहे. विद्यार्थ्यांनी हे प्रकरण वाढवू नये शिक्षणावर लक्ष द्यावे, असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केलं आहे.

हेही वाचा - President at Raj Bhavan : राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.