ETV Bharat / city

नाशिक जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींसाठी ८ हजार ५४९ उमेदवार रिंगणात

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले असून राजकीय धुराळा उडाला आहे. नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी १७ हजार ०४ उमेदवारांनी अर्ज दाखल करत मैदानात उडी घेतली होती.

author img

By

Published : Jan 5, 2021, 10:01 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक
ग्रामपंचायत निवडणूक

नाशिक - जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारी प्रक्रिया पार पडली. ५ हजार ८९५ जागांसाठी ८ हजार ५४९ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर तब्बल ४ हजार २१६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. जिल्ह्यातील ३०८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. सर्वाधिक माघार निफाड व सिन्नर तालुक्यातील उमेदवारांनी घेतली आहे. आता येत्या १५ जानेवारीला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

४ हजार २१६ उमेदवारांनी माघार-

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले असून राजकीय धुराळा उडाला आहे. नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी १७ हजार ०४ उमेदवारांनी अर्ज दाखल करत मैदानात उडी घेतली होती. अर्ज छाननीत ४६३ उमेदवारांचे अर्ज अवैध तर १६ हजार ५४१ अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर सोमवारी अर्ज माघारी प्रक्रिया पार पडली. त्यात ४ हजार २१६ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतली आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ५ हजार ८९५ जागांसाठी ८ हजार ५४९ उमेदवार रिंगणात उरले आहे. निफाडमधून सर्वाधिक १ हजार ३८ व त्याखालोखाल सिन्नर तालुक्यात ८०८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे.

उमेदवारांना विविध आकर्षक निवडणूक चिन्ह वाटप-

उमेदवारांना पतंग, चेंडू, बॅट ,कोबी, फ्लावर ,विमान,असे विविध आकर्षक निवडणून चिन्ह वाटप करण्यात आले आहे. आता चित्र स्पष्ट झाल्याने उद्यापासून प्रचाराचा धुराळा उडणार असून राजकीय वातावरण हळूहळू तापायला सुरुवात झाली आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला विजयाचा गुलाल उडणार आहे.

३०८ जागा बिनविरोध-

नाशिक जिल्ह्यातील उमराणे गावात तब्बल दोन कोटी पाच लाखाची सरपंच पदासह पॅनलची बोली लावली. त्यामुळे जिल्ह्यातील किती जागा बिनविरोध होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. ३०८ जागांवर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने या ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली आहे.

तालुका रिंगणातील उमेदवार संख्या

कळवण- ३८१
इगतपुरी- ११५
दिंडोरी- ८२२
त्र्यंबकेश्वर- ४०
सिन्नर- १७४७
निफाड- १३३५
बागलाण- ६८५
चांदवड- ८६८
देवळा- १२९
मालेगाव- १८९४
नाशिक- ५३३

नाशिक - जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारी प्रक्रिया पार पडली. ५ हजार ८९५ जागांसाठी ८ हजार ५४९ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर तब्बल ४ हजार २१६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. जिल्ह्यातील ३०८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. सर्वाधिक माघार निफाड व सिन्नर तालुक्यातील उमेदवारांनी घेतली आहे. आता येत्या १५ जानेवारीला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

४ हजार २१६ उमेदवारांनी माघार-

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले असून राजकीय धुराळा उडाला आहे. नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी १७ हजार ०४ उमेदवारांनी अर्ज दाखल करत मैदानात उडी घेतली होती. अर्ज छाननीत ४६३ उमेदवारांचे अर्ज अवैध तर १६ हजार ५४१ अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर सोमवारी अर्ज माघारी प्रक्रिया पार पडली. त्यात ४ हजार २१६ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतली आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ५ हजार ८९५ जागांसाठी ८ हजार ५४९ उमेदवार रिंगणात उरले आहे. निफाडमधून सर्वाधिक १ हजार ३८ व त्याखालोखाल सिन्नर तालुक्यात ८०८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे.

उमेदवारांना विविध आकर्षक निवडणूक चिन्ह वाटप-

उमेदवारांना पतंग, चेंडू, बॅट ,कोबी, फ्लावर ,विमान,असे विविध आकर्षक निवडणून चिन्ह वाटप करण्यात आले आहे. आता चित्र स्पष्ट झाल्याने उद्यापासून प्रचाराचा धुराळा उडणार असून राजकीय वातावरण हळूहळू तापायला सुरुवात झाली आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला विजयाचा गुलाल उडणार आहे.

३०८ जागा बिनविरोध-

नाशिक जिल्ह्यातील उमराणे गावात तब्बल दोन कोटी पाच लाखाची सरपंच पदासह पॅनलची बोली लावली. त्यामुळे जिल्ह्यातील किती जागा बिनविरोध होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. ३०८ जागांवर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने या ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली आहे.

तालुका रिंगणातील उमेदवार संख्या

कळवण- ३८१
इगतपुरी- ११५
दिंडोरी- ८२२
त्र्यंबकेश्वर- ४०
सिन्नर- १७४७
निफाड- १३३५
बागलाण- ६८५
चांदवड- ८६८
देवळा- १२९
मालेगाव- १८९४
नाशिक- ५३३

हेही वाचा- 'ईडी'ने बोलविल्यास मी पुन्हा येणार - अंजली दमानिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.