ETV Bharat / city

Vegetable Price Hike : भाज्या कडाडल्या, ग्राहकांचा बजेट बिघडला, भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

author img

By

Published : Jul 27, 2022, 8:49 PM IST

राज्याच्या अनेक भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भाज्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. भाज्यांचे ट्रक गरजेपेक्षा कमी पोहोचत असल्याने भाज्यांचे दर कडाडले ( Vegetable Price Hike ) असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे. आजच्या बाजारभावानुसार प्रत्येक भाजीमागे ३० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे.

Vegetable Price Hike
भाज्या कडाडल्या

नागपूर - अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ठोक आणि घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटली आहे, त्यामुळे सर्वच भाज्यांच्या दरात प्रचंड वाढ झाली ( Vegetable Price Hike ) आहे. मुसळधार पावसामुळे शेतातील भाज्यांचा तोडाचं होऊ शकतं नसल्याने मोठ्या प्रमाणात भाज्या सडत असल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले ( Price Of Vegetable out Of Budget Common man ) आहेत. ठोक बाजारात 60 रुपये किलो दराने मिळणारे वांगीने घाऊक बाजारात शंभरी गाठली आहे. मेथी तर 120 ते 150 रुपये किलो पर्यंत जाऊन पोहचली आहे. बहुतांश भाज्यांचे दर 100 रुपयांच्या पुढे गेल्याने ग्राहक देखील बाजारात फिरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया

भाजीमागे ३० ते ५० रुपयांची वाढ - राज्याच्या अनेक भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे भाज्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. भाज्यांचे ट्रक गरजेपेक्षा कमी पोहोचत असल्याने भाज्यांचे दर कडाडले असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे. आजच्या बाजारभावानुसार प्रत्येक भाजीमागे ३० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे.

नागपुरातील भाज्यांचे रेट - घरोघरी चवीने खाल्ले जाणारे वांगे २० वरून थेट ८० ते १०० रुपये किलो झाले आहेत तर टमाटर ३० ते ५० रुपये दराने विकले जात आहेत. फुलकोबी १०० रुपये किलो,पत्ताकोबी ८० रुपये किलो, भेंडी ८० रुपये किलो,शिमला मिर्ची ११० रुपये किलो, मेथी १२० ते १५० रुपये किलो,पालक ९० रुपये किलो, तोंडले ११० रुपये किलो, दुधी ७० रुपये किलो, चवळीच्या शेंगा १२० रुपये किलो बिन्स १६० रुपये किलो, गवारीच्या शेंगा १२० रुपये किलो, कोहळ ६० रुपये किलो, दोडके ११० रुपये किलो, रान काटवल २५० ते ३०० रुपये किलो, मिरची ८० रुपये किलो, कोथिंबीर २०० रुपये किलो आणि अद्रक ८० रुपये किलोने विकल्या जात आहे.

हेही वाचा - Vegetables Rate Hike : पावसामुळे भाजीपाल्यांचे दर कडाडले; वाचा किरकोळ बाजारातील दर

नागपूर - अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ठोक आणि घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटली आहे, त्यामुळे सर्वच भाज्यांच्या दरात प्रचंड वाढ झाली ( Vegetable Price Hike ) आहे. मुसळधार पावसामुळे शेतातील भाज्यांचा तोडाचं होऊ शकतं नसल्याने मोठ्या प्रमाणात भाज्या सडत असल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले ( Price Of Vegetable out Of Budget Common man ) आहेत. ठोक बाजारात 60 रुपये किलो दराने मिळणारे वांगीने घाऊक बाजारात शंभरी गाठली आहे. मेथी तर 120 ते 150 रुपये किलो पर्यंत जाऊन पोहचली आहे. बहुतांश भाज्यांचे दर 100 रुपयांच्या पुढे गेल्याने ग्राहक देखील बाजारात फिरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया

भाजीमागे ३० ते ५० रुपयांची वाढ - राज्याच्या अनेक भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे भाज्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. भाज्यांचे ट्रक गरजेपेक्षा कमी पोहोचत असल्याने भाज्यांचे दर कडाडले असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे. आजच्या बाजारभावानुसार प्रत्येक भाजीमागे ३० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे.

नागपुरातील भाज्यांचे रेट - घरोघरी चवीने खाल्ले जाणारे वांगे २० वरून थेट ८० ते १०० रुपये किलो झाले आहेत तर टमाटर ३० ते ५० रुपये दराने विकले जात आहेत. फुलकोबी १०० रुपये किलो,पत्ताकोबी ८० रुपये किलो, भेंडी ८० रुपये किलो,शिमला मिर्ची ११० रुपये किलो, मेथी १२० ते १५० रुपये किलो,पालक ९० रुपये किलो, तोंडले ११० रुपये किलो, दुधी ७० रुपये किलो, चवळीच्या शेंगा १२० रुपये किलो बिन्स १६० रुपये किलो, गवारीच्या शेंगा १२० रुपये किलो, कोहळ ६० रुपये किलो, दोडके ११० रुपये किलो, रान काटवल २५० ते ३०० रुपये किलो, मिरची ८० रुपये किलो, कोथिंबीर २०० रुपये किलो आणि अद्रक ८० रुपये किलोने विकल्या जात आहे.

हेही वाचा - Vegetables Rate Hike : पावसामुळे भाजीपाल्यांचे दर कडाडले; वाचा किरकोळ बाजारातील दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.