नागपूर - राज्यापाल भगसिंह कोश्यारी हे सध्या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ( Governor koshyari controversial statement ) विरोधकांच्या टीकेचे धनी ठरले आहे. आता त्यांनी केलेल्या एका विधानाने त्यांच्यावर पुन्हा टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ( Governor koshyari on indians respect in world ) नेतृत्वात आपला देश ( Governor koshyari nagpur news ) वेगाने प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर दिवसाला वीस-वीस तास सलग काम करतात, त्यामुळे जगात भारताची कीर्ती वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी जगात भारतीयांना जो मान मिळाला नव्हता तो आता जगात मिळत असल्याचे राज्यपाल भगतसिह कोश्यारी म्हणाले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्याने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र त्यांच्या या विधानावर आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून निषेध होत आहे.
हेही वाचा - ATM Theft In Nagpur : शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर एटीएम फोडणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घटनात्मक पदावरील व्यक्तीने असे वक्तव्य करणे निंदनीय - रोहित पवार : पंतप्रधानमोदींपूर्वी जगात देशाचा मान नव्हता काय? त्यांच्या आधीच्या पंतप्रधानांनी काहीच केले नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी राज्यपालांचे वक्तव्य खोडून काढले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले, की मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केले नाही, असे नाही. आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसेच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचेच योगदान असते असे नाही. तर, आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरिकांचे योगदान तेवढेच महत्त्वाचे असते. म्हणून 'आधी भारतीयांना किंमत नव्हती' असे वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणे ही अत्यंत निंदनीय बाब ( Rohit Pawar Slammed Bhagat singh ) आहे, असे ते म्हणाले.
-
राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2022राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2022