ETV Bharat / city

सावरकर आणि वाद.. 'भारतरत्न'ची मागणी अन् होणारा विरोध

author img

By

Published : Oct 16, 2019, 8:11 PM IST

Updated : Oct 16, 2019, 10:58 PM IST

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या संकल्प पत्रात विनायक दामोदर सावरकर यांना भारत रत्न पुरस्कार देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याबाबतच्या चर्चांना ऊत आला. सावरकरांचे व्यक्तिमत्व पहिल्यापासूनच वादग्रस्त राहिले आहे. जेव्हा कधी सावरकारांना भारतरत्न देण्याचा विषय चर्चेला येतो त्यावेळी टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात.

वीर सावरकर

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या संकल्प पत्रात विनायक दामोदर सावरकर यांना भारत रत्न पुरस्कार देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याबाबतच्या चर्चांना ऊत आला. सावरकरांचे व्यक्तिमत्व पहिल्यापासूनच वादग्रस्त राहिले आहे. जेव्हा कधी सावरकारांना भारतरत्न देण्याचा विषय चर्चेला येतो, त्यावेळी टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात.

विशेष म्हणजे कधीही जनसंघ किंवा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सदस्य न राहिलेले सावरकर तमाम हिंदूत्ववादी संघटनांसाठी आदर्श आहेत. विरोधात असताना जनसंघ व त्यानंतर भाजपने सावरकरांना भारतरत्न देण्याची जोरदार मागणी केली. मात्र १९९६ मध्ये वाजपेयी आणि २०१४ पासून केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असूनही सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पूर्ण न झाल्याने हिंदूत्ववादी संघटना व विशेष करून शिवसेनेमध्ये नाराजी आहे. दरवेळी भारतरत्न पुरस्काराच्या घोषणेनंतर शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून केंद्राच्या धोरणावर टीका केली आहे.

‘सावरकर: इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचे समर्थन केलं. त्याचबरोबर ते म्हणाले, की देश स्वतंत्र झाल्यानंतर सावरकर जर देशाचे पंतप्रधान असते तर आज पाकिस्तानच जन्मालाच आला नसता. उद्धव म्हणाले, की आमचं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव केलाच पाहिजे.

शिवसेनेचे उपनेते व अभिनेते शरद पोंक्षे यांनी मत व्यक्त करताना म्हटले, की स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक, साहित्यिक, लेखक होते. त्यांनी कायम हिंदुत्त्ववाद मांडला म्हणून ते कायम दुर्लक्षित राहिले. दिवंगत राजीव गांधी, नेल्सन मंडेला यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून क्रांतीकारक घडविणारे, देशासाठी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या सावरकरांना मात्र तो मिळत नाही. त्यांना तो देण्यात यावा म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागणे यापेक्षा दुर्दैव दुसरे नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महान कार्यासाठी त्यांना ‘विश्वरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी २०१६ मध्ये आयोजित २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात करण्यात आली. जेव्हा कधी सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा येतो त्यावेळी त्याला टोकाचा विरोध केला जातो. सावरकरांसोबत गोडसेला भारतरत्न द्या, अशी टिप्पणीही गांधीवादी नेत्यांकडून व धर्मनिरपेक्ष संघटनांकडून केली जाते. काहीचे म्हणणे आहे, की सावरकरांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत योगदानच काय? त्यांनी इंग्रजांची माफी मागून आपली शिक्षा कमी करून घेतली. बहुचर्चित पुस्तक 'द आरएसएस-आयकॉन्स ऑफ द इंडियन राइट' मध्ये लिहिले आहे, की ऑक्टोबर १९०६ मध्ये लंडन येथे महात्मा गांधी व सावरकर यांच्यात भेट झाली होती. त्यावेळी गांधी महात्मा नव्हते तर केवळ मोहनदास करमचंद गांधी होते. त्यावेळी कोकणस्थ ब्राह्मण असलेले विनायक दामोदर सावरकर इंडिया हाऊसमधील त्यांच्या खोलीत झिंगे (माशांचा प्रकार) तळत होते. गांधींनी सावरकरांना म्हटले होते, की ते इंग्रजांविरुद्ध आवश्यकतेहून अधिक आक्रमकता दाखवत आहेत.

जेव्हा सावरकरांनी गांधींना भोजनाचा आग्रह केला, त्यावेळी त्यांनी मासांहार करत नसल्याचे सांगितले. त्यावर सावरकरांनी गांधींची गंमत करताना म्हटले, की तुम्ही मांसाहार करत नाहीत तर इंग्रजांसारख्या मजबूत शक्तीचा सामना कसा कराल. त्यारात्री भोजन न करता गांधी उपाशीपोटी सावरकरांच्या खोली बाहेर पडले.

सावरकर आणि वाद -

१९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येच्या सहाव्या दिवशी सावरकरांना गांधी हत्येचा कट रचल्याप्रकरणी मुंबईतून अटक केली होती. नंतर फेब्रवारी १९४९ मध्ये त्यांची मुक्तता करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनसंघाचे कधीही सदस्य न राहिलेल्या सावरकरांचे नाव संघ परिवारात मोठ्या आदराने घेतले जाते. वर्ष २००० मध्ये वाजपेयी सरकारने तत्कालीन राष्ट्पती के.आर. नारायणन यांच्याकडे सावरकरांना 'भारत रत्न' देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. परंतु तो मंजूर करण्यात आला नाही.

त्यानंतर २६ मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवासात वीर सावरकरांची १३१ वी जयंती होती. त्यावेळी मोदी संसद भवनातील सावरकरांच्या तैलचित्रासमोर नतमस्तक झाले होते. सर्वांना कबूल करावे लागेल, की सावरकर वादग्रस्त व्यक्तिमत्व होते.

गांधी हत्याकांड प्रकरणी सावरकारांविरुद्ध खटला चालला होता. जरी ते यातून निर्दोष सुटले होते, तरी त्यांच्या जीवनकाळातच त्यांच्या चौकशीसाठी कपूर आयोग बसवला होता. या आयोगाच्या अहवालात संशयाची सुई सावरकरांकडे होती. अशा नेत्याला सार्वजनिकरित्या इतका मोठा सन्मान देणे मोदींकडून मोठे प्रतीकात्मक पाऊल होते.

नाशिक कलेक्टरच्या हत्येप्रकरणी अटक -

आपल्या जहाल राजकीय विचारांमुळे सावरकरांना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून निलंबित करण्यात आले होते. १९१० मध्ये सावरकरांना नाशिक कलेक्टरच्या हत्येप्रकरणी लंडनमधून अटक करण्यात आली होती. कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येप्रकरणी सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर यांना अटक करण्यात आली होती.

विनायक सावरकरांवर आरोप होता, की त्यांनी भावासाठी लंडनहून एक पिस्तूल पाठवली होती. त्यानेच जिल्हाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली होती. समुद्रातील त्या प्रसिद्ध उडीनंतर पुढील जवळपास २५ वर्षांपर्यंत सावरकर कोणत्या ना कोणत्या रुपात इंग्रजांचे कैदी राहिले. त्यांनी सावरकरांना २५-२५ वर्षांचा दोन वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या व काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी सावरकरांनी अंदमानावर पाठवण्यात आले.

परंतु सेल्युलर जेलमध्ये भोगलेल्या ९ वर्षे १० महिन्यांच्या तुरुंगवासानंतर इंग्रजांचे सावरकरांविषयी मन बदलले. असे म्हटले जाते की, ११ जुलै १९११ रोजी सावरकर अंदमानला पोहोचले व २९ ऑगस्तला त्यांनी आपला पहिला माफीनामा लिहिला. तेथील ९ वर्षाच्या कारावासात जवळपास ६ वेळा इंग्रजांकडे माफीनामा पाठवला.

अंदमानमध्ये दर महिन्याला ३-४ कैद्यांना फाशी दिली जात होती. याचा परिणाम सावरकरांवर झाला. त्यावेळी सावरकरांसोबत शिक्षा भोगत असलेले अन्य एक कैदी बरिंद्र घोष यांनी लिहिले आहे, की सावरकर बंधु आम्हाला जेलर विरुद्ध आंदोलन करण्यास प्रवृत्त करत परंतु ते सक्रीय सहभाग घेत नसत.

त्यानंतर सावरकर व त्यांच्या समर्थकांनी इंग्रजांची माफी मागण्याला एक रणनिती संबोधले. त्यामुळे तुरुंगात त्यांना काही सवलती मिळाल्या. सावरकरांनी आपल्या आत्मकथेत म्हटले आहे, की जर मी तुरुंगात आंदोलन केले असते तर भारतात पत्र पाठविण्याचा अधिकार मिळाला नसता. त्याचबरोबर त्यांची रणनिती होती, की भूमिगत राहूनही क्रांतीकारी चळवळ चालवली जाऊ शकते.

सावरकरांचे कडवे हिंदुत्व -

अंदमानहून परत आल्यानंतर सावरकरांनी 'हिंदुत्व - हू इज़ हिंदू?' हे पुस्तक लिहून एका राजकीय विचारधारेचा वापर केला. हिंदुत्वाची व्याख्या सांगताना ते म्हणत की, देशातील प्रत्येक व्यक्ती पहिल्यांदा हिंदू आहे. देशाचा नागरिक तोच होऊ शकतो ज्याची पितृ भूमि, मातृ भूमि व पुण्यभूमी भारत असेल. पितृ आणि मातृ भूमि कोणाचीही असू शकते परंतु पुण्य भूमि केवळ हिंदू, शीख, बौद्ध व जैनांची होऊ शकते. त्यामुळे मुसलमान व खिश्चन या देशाचे नागरिक होऊ शकत नाहीत. १९२४ मध्ये सावरकरांनी येरवडा जेलमधून दोन अटींवर सोडण्यात आले. एक ते कोणत्याही राजकीय प्रक्रियेत सहभाग घेणार नाहीत व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुमतीशिवाय रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाहीत.

इतिहास संशोधक सांगतात की, सावरकरांनी लॉर्ड व्हाईसरॉय लिनलिथगो यांच्याशी करार केला होता, की त्यांचा समान उद्देश्य आहे, गांधी, काँग्रेस व मुसलमानांचा विरोध. सावरकरांनी इंग्रजांकडून प्रतिमाह पेन्शनही मिळत होती.

३० जानेवारी १९४८ रोजी नथूराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर आठ लोकांबरोबरच सावरकरांनाही अटक केली होती. त्यानंतर संघाला गांधी हत्येचा डाग पुसण्यास खूप वर्षांचा काळ व्यतीत करावा लागला.

धनंजय कीर यांनी त्यांच्या 'सावरकर एंड हिज़ टाइम्स' पुस्तकात म्हणतात, की लाल किल्ल्यात चाललेल्या खटल्यात न्यायधीशांनी सावरकरांना मुक्त केले व नथूराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी सुनावली. त्यावेळी अनेक जण सावरकरांच्या पाया पडले व त्यांनी नारेबाजी केली.

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या संकल्प पत्रात विनायक दामोदर सावरकर यांना भारत रत्न पुरस्कार देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याबाबतच्या चर्चांना ऊत आला. सावरकरांचे व्यक्तिमत्व पहिल्यापासूनच वादग्रस्त राहिले आहे. जेव्हा कधी सावरकारांना भारतरत्न देण्याचा विषय चर्चेला येतो, त्यावेळी टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात.

विशेष म्हणजे कधीही जनसंघ किंवा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सदस्य न राहिलेले सावरकर तमाम हिंदूत्ववादी संघटनांसाठी आदर्श आहेत. विरोधात असताना जनसंघ व त्यानंतर भाजपने सावरकरांना भारतरत्न देण्याची जोरदार मागणी केली. मात्र १९९६ मध्ये वाजपेयी आणि २०१४ पासून केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असूनही सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पूर्ण न झाल्याने हिंदूत्ववादी संघटना व विशेष करून शिवसेनेमध्ये नाराजी आहे. दरवेळी भारतरत्न पुरस्काराच्या घोषणेनंतर शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून केंद्राच्या धोरणावर टीका केली आहे.

‘सावरकर: इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचे समर्थन केलं. त्याचबरोबर ते म्हणाले, की देश स्वतंत्र झाल्यानंतर सावरकर जर देशाचे पंतप्रधान असते तर आज पाकिस्तानच जन्मालाच आला नसता. उद्धव म्हणाले, की आमचं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव केलाच पाहिजे.

शिवसेनेचे उपनेते व अभिनेते शरद पोंक्षे यांनी मत व्यक्त करताना म्हटले, की स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक, साहित्यिक, लेखक होते. त्यांनी कायम हिंदुत्त्ववाद मांडला म्हणून ते कायम दुर्लक्षित राहिले. दिवंगत राजीव गांधी, नेल्सन मंडेला यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून क्रांतीकारक घडविणारे, देशासाठी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या सावरकरांना मात्र तो मिळत नाही. त्यांना तो देण्यात यावा म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागणे यापेक्षा दुर्दैव दुसरे नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महान कार्यासाठी त्यांना ‘विश्वरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी २०१६ मध्ये आयोजित २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात करण्यात आली. जेव्हा कधी सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा येतो त्यावेळी त्याला टोकाचा विरोध केला जातो. सावरकरांसोबत गोडसेला भारतरत्न द्या, अशी टिप्पणीही गांधीवादी नेत्यांकडून व धर्मनिरपेक्ष संघटनांकडून केली जाते. काहीचे म्हणणे आहे, की सावरकरांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत योगदानच काय? त्यांनी इंग्रजांची माफी मागून आपली शिक्षा कमी करून घेतली. बहुचर्चित पुस्तक 'द आरएसएस-आयकॉन्स ऑफ द इंडियन राइट' मध्ये लिहिले आहे, की ऑक्टोबर १९०६ मध्ये लंडन येथे महात्मा गांधी व सावरकर यांच्यात भेट झाली होती. त्यावेळी गांधी महात्मा नव्हते तर केवळ मोहनदास करमचंद गांधी होते. त्यावेळी कोकणस्थ ब्राह्मण असलेले विनायक दामोदर सावरकर इंडिया हाऊसमधील त्यांच्या खोलीत झिंगे (माशांचा प्रकार) तळत होते. गांधींनी सावरकरांना म्हटले होते, की ते इंग्रजांविरुद्ध आवश्यकतेहून अधिक आक्रमकता दाखवत आहेत.

जेव्हा सावरकरांनी गांधींना भोजनाचा आग्रह केला, त्यावेळी त्यांनी मासांहार करत नसल्याचे सांगितले. त्यावर सावरकरांनी गांधींची गंमत करताना म्हटले, की तुम्ही मांसाहार करत नाहीत तर इंग्रजांसारख्या मजबूत शक्तीचा सामना कसा कराल. त्यारात्री भोजन न करता गांधी उपाशीपोटी सावरकरांच्या खोली बाहेर पडले.

सावरकर आणि वाद -

१९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येच्या सहाव्या दिवशी सावरकरांना गांधी हत्येचा कट रचल्याप्रकरणी मुंबईतून अटक केली होती. नंतर फेब्रवारी १९४९ मध्ये त्यांची मुक्तता करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनसंघाचे कधीही सदस्य न राहिलेल्या सावरकरांचे नाव संघ परिवारात मोठ्या आदराने घेतले जाते. वर्ष २००० मध्ये वाजपेयी सरकारने तत्कालीन राष्ट्पती के.आर. नारायणन यांच्याकडे सावरकरांना 'भारत रत्न' देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. परंतु तो मंजूर करण्यात आला नाही.

त्यानंतर २६ मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवासात वीर सावरकरांची १३१ वी जयंती होती. त्यावेळी मोदी संसद भवनातील सावरकरांच्या तैलचित्रासमोर नतमस्तक झाले होते. सर्वांना कबूल करावे लागेल, की सावरकर वादग्रस्त व्यक्तिमत्व होते.

गांधी हत्याकांड प्रकरणी सावरकारांविरुद्ध खटला चालला होता. जरी ते यातून निर्दोष सुटले होते, तरी त्यांच्या जीवनकाळातच त्यांच्या चौकशीसाठी कपूर आयोग बसवला होता. या आयोगाच्या अहवालात संशयाची सुई सावरकरांकडे होती. अशा नेत्याला सार्वजनिकरित्या इतका मोठा सन्मान देणे मोदींकडून मोठे प्रतीकात्मक पाऊल होते.

नाशिक कलेक्टरच्या हत्येप्रकरणी अटक -

आपल्या जहाल राजकीय विचारांमुळे सावरकरांना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून निलंबित करण्यात आले होते. १९१० मध्ये सावरकरांना नाशिक कलेक्टरच्या हत्येप्रकरणी लंडनमधून अटक करण्यात आली होती. कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येप्रकरणी सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर यांना अटक करण्यात आली होती.

विनायक सावरकरांवर आरोप होता, की त्यांनी भावासाठी लंडनहून एक पिस्तूल पाठवली होती. त्यानेच जिल्हाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली होती. समुद्रातील त्या प्रसिद्ध उडीनंतर पुढील जवळपास २५ वर्षांपर्यंत सावरकर कोणत्या ना कोणत्या रुपात इंग्रजांचे कैदी राहिले. त्यांनी सावरकरांना २५-२५ वर्षांचा दोन वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या व काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी सावरकरांनी अंदमानावर पाठवण्यात आले.

परंतु सेल्युलर जेलमध्ये भोगलेल्या ९ वर्षे १० महिन्यांच्या तुरुंगवासानंतर इंग्रजांचे सावरकरांविषयी मन बदलले. असे म्हटले जाते की, ११ जुलै १९११ रोजी सावरकर अंदमानला पोहोचले व २९ ऑगस्तला त्यांनी आपला पहिला माफीनामा लिहिला. तेथील ९ वर्षाच्या कारावासात जवळपास ६ वेळा इंग्रजांकडे माफीनामा पाठवला.

अंदमानमध्ये दर महिन्याला ३-४ कैद्यांना फाशी दिली जात होती. याचा परिणाम सावरकरांवर झाला. त्यावेळी सावरकरांसोबत शिक्षा भोगत असलेले अन्य एक कैदी बरिंद्र घोष यांनी लिहिले आहे, की सावरकर बंधु आम्हाला जेलर विरुद्ध आंदोलन करण्यास प्रवृत्त करत परंतु ते सक्रीय सहभाग घेत नसत.

त्यानंतर सावरकर व त्यांच्या समर्थकांनी इंग्रजांची माफी मागण्याला एक रणनिती संबोधले. त्यामुळे तुरुंगात त्यांना काही सवलती मिळाल्या. सावरकरांनी आपल्या आत्मकथेत म्हटले आहे, की जर मी तुरुंगात आंदोलन केले असते तर भारतात पत्र पाठविण्याचा अधिकार मिळाला नसता. त्याचबरोबर त्यांची रणनिती होती, की भूमिगत राहूनही क्रांतीकारी चळवळ चालवली जाऊ शकते.

सावरकरांचे कडवे हिंदुत्व -

अंदमानहून परत आल्यानंतर सावरकरांनी 'हिंदुत्व - हू इज़ हिंदू?' हे पुस्तक लिहून एका राजकीय विचारधारेचा वापर केला. हिंदुत्वाची व्याख्या सांगताना ते म्हणत की, देशातील प्रत्येक व्यक्ती पहिल्यांदा हिंदू आहे. देशाचा नागरिक तोच होऊ शकतो ज्याची पितृ भूमि, मातृ भूमि व पुण्यभूमी भारत असेल. पितृ आणि मातृ भूमि कोणाचीही असू शकते परंतु पुण्य भूमि केवळ हिंदू, शीख, बौद्ध व जैनांची होऊ शकते. त्यामुळे मुसलमान व खिश्चन या देशाचे नागरिक होऊ शकत नाहीत. १९२४ मध्ये सावरकरांनी येरवडा जेलमधून दोन अटींवर सोडण्यात आले. एक ते कोणत्याही राजकीय प्रक्रियेत सहभाग घेणार नाहीत व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुमतीशिवाय रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाहीत.

इतिहास संशोधक सांगतात की, सावरकरांनी लॉर्ड व्हाईसरॉय लिनलिथगो यांच्याशी करार केला होता, की त्यांचा समान उद्देश्य आहे, गांधी, काँग्रेस व मुसलमानांचा विरोध. सावरकरांनी इंग्रजांकडून प्रतिमाह पेन्शनही मिळत होती.

३० जानेवारी १९४८ रोजी नथूराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर आठ लोकांबरोबरच सावरकरांनाही अटक केली होती. त्यानंतर संघाला गांधी हत्येचा डाग पुसण्यास खूप वर्षांचा काळ व्यतीत करावा लागला.

धनंजय कीर यांनी त्यांच्या 'सावरकर एंड हिज़ टाइम्स' पुस्तकात म्हणतात, की लाल किल्ल्यात चाललेल्या खटल्यात न्यायधीशांनी सावरकरांना मुक्त केले व नथूराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी सुनावली. त्यावेळी अनेक जण सावरकरांच्या पाया पडले व त्यांनी नारेबाजी केली.

Intro:Body:

सावरकर भारतातील 'नायक' की 'खलनायक'? 'भारतरत्न'ची मागणी अन् विरोध



मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या संकल्प पत्रात विनायक दामोदर सावरकर यांना भारत रत्न पुरस्कार देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याबाबतच्या चर्चांना ऊत आला. सावरकरांचे व्यक्तिमत्व पहिल्यापासूनच वादग्रस्त राहिले आहे. जेव्हा कधी सावरकारांना भारतरत्न देण्याचा विषय चर्चेला येतो त्यावेळी टोकाचा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात.

विशेष म्हणजे कधीही जनसंघ किंवा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सदस्य न राहिलेले सावरकर तमान हिंदूत्ववादी संघटनांसाठी आदर्श आहेत. विरोधात असताना जनसंघ व त्यानंतर भाजपने सावरकरांना भारतरत्न देण्याची जोरदार मागणी केली. मात्र १९९६ मध्ये वाजपेयी व २०१४ पासून केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असूनही सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पूर्ण न झाल्याने हिंदूत्ववादी संघटना व विशेष करून शिवसेनेमध्ये नाराजी आहे. दरवेळी भारतरत्न पुरस्काराच्या घोषणेनंतर शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून केंद्राच्या धोरणावर टीका केली आहे.



‘सावरकर: इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचे समर्थन केलं. त्याचबरोबर ते म्हणाले, की देश स्वतंत्र झाल्यानंतर सावरकर जर देशाचे पंतप्रधान असते तर आज पाकिस्तानच जन्मालाच आला नसता. उद्धव म्हणाले, की आमचं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव केला पाहिजे.



शिवसेनेचे उपनेते व अभिनेते शरद पोंक्षे यांनी मत व्यक्त करताना म्हटले, की स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक, साहित्यिक, लेखक होते. त्यांनी कायम हिंदुत्त्ववाद मांडला म्हणून ते कायम दुर्लक्षित राहिले. दिवंगत राजीव गांधी, नेल्सन मंडेला यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून क्रांतीकारक घडविणारे, देशासाठी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या सावरकरांना मात्र तो मिळत नाही. त्यांना तो देण्यात यावा म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागणे यापेक्षा दुदैव दुसरे नाही.  

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महान कार्यासाठी त्यांना ‘विश्वरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी २०१६ मध्ये आयोजित २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात करण्यात आली.

जेव्हा कधी सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा येतो त्यावेळी त्याला टोकाचा विरोध केला जातो. सावरकरांसोबत गोडसेला भारतरत्न द्या अशी टिप्पणीही गांधीवादी नेत्यांकडून व धर्मनिरपेक्ष संघटनांकडून केली जाते. काहीचे म्हणणे आहे, की सावरकरांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत योगदानच काय. त्यांनी इंग्रजांची माफी मागून आपली शिक्षा कमी करून घेतली.

बहुचर्चित पुस्तक 'द आरएसएस-आयकॉन्स ऑफ द इंडियन राइट' मध्ये लिहिले आहे, की ऑक्टोबर १९०६ मध्ये लंडन येथे महात्मा गांधी व सावरकर यांच्यात भेट झाली होती. त्यावेळी गांधी महात्मा नव्हते तर केवळ मोहनदास करमचंद गांधी होते. त्यावेळी कोकणस्थ ब्राह्मण असलेले विनायक दामोदर सावरकर इंडिया हाऊसमधील त्यांच्या खोलीत झिंगे (माशांचा प्रकार) तळत होते. गांधींनी सावरकरांना म्हटले होते, की ते इंग्रजांविरुद्ध आवश्यकतेहून अधिक आक्रमकता दाखवत आहेत.

जेव्हा सावरकरांनी गांधींना भोजनाचा आग्रह केला त्यावेळी त्यांनी मासांहार करत नसल्याचे सांगितले. त्यावर सावरकरांनी गांधींची गंमत करताना म्हटले, की तुम्ही मांसाहार करत नाहीत तर इंग्रजांसारख्या मजबूत शक्तीचा सामना कसा कराल. त्यारात्री भोजन न करता गांधी उपाशीपोटी सावरकरांच्या खोली बाहेर पडले.



सावरकर स्वातंत्र्यलढ्यातील नायक की खलनायक ?

१९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येच्या सहाव्या दिवशी सावरकरांना गांधी हत्येचा कट रचल्याप्रकरणी मुंबईतून अटक केली होती. नंतर फेब्रवारी १९४९ मध्ये त्यांची मुक्तता करण्यात आली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनसंघाचे कधीही सदस्य न राहिलेल्या सावरकरांचे नाव संघ परिवारात मोठ्या आदराने घेतले जाते.

वर्ष २००० मध्ये वाजपेयी सरकारने तत्कालीन राष्ट्पती के.आर. नारायणन यांच्याकडे सावरकरांना 'भारत रत्न' देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. परंतु तो मंजूर करण्यात आला नाही.

त्यानंतर २६ मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवासात वीर सावरकरांची १३१ वी जयंती होती. त्यावेळी मोदी संसद भवनातील सावरकरांच्या तैलचित्रासमोर नतमस्तक झाले होते. सर्वांना कबूल करावे लागेल, की सावरकर वादग्रस्त व्यक्तिमत्व होते.



गांधी हत्याकांड प्रकरणी सावरकारांविरुद्ध खटला चालला होता. जरी ते यातून निर्दोष सुटले होते, तरी त्यांच्या जीवनकाळातच त्यांच्या चौकशीसाठी कपूर आयोग बसवला होता. या आयोगाच्या अहवालात संशयाची सुई सावरकरांकडे होती. अशा नेत्याला सार्वजनिकरित्या इतका मोठा सन्मान देणे मोदीकडून मोठे प्रतीकात्मक पाऊल होते.

नाशिक कलेक्टरच्या हत्येप्रकरणी अटक -

आपल्या जहाल राजकीय विचारांमुळे सावरकरांना पुण्यातील फर्ग्यसन कॉलेजमधून निलंबित करण्यात आले होते. १९१० मध्ये सावरकरांना नाशिक कलेक्टरच्या हत्येप्रकरणी लंडनमधून अटक करण्यात आली होती. कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येप्रकरणी सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर यांना अटक करण्यात आली आहे.

विनायक सावरकरांवर आरोप होता, की त्यांनी भावासाठी लंडनहून एक पिस्तूल पाठवली होती. त्यानेच जिल्हाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली होती. समुद्रातील त्या प्रसिद्ध उडीनंतर पुढील जवळपास २५ वर्षांपर्यंत सावरकर कोणत्या ना कोणत्या रुपात इंग्रजांचे कैदी राहिले. त्यांनी २५-२५ वर्षांचा दोन वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या व काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी सावरकरांनी अंदमानवर पाठवण्यात आले.

परंतु सेल्युलर जेलमध्ये भोगलेल्या ९ वर्षे १० महिन्यांच्या तुरुंगवासानंतर इंग्रजांचे सावरकरांविषयी मन बदलले.  असे म्हटले जाते की, ११ जुलै १९११ रोजी सावरकर अंदमानला पोहोचले व २९ ऑगस्तला त्यांनी आपला पहिला माफीनामा लिहिला. तेथील ९ वर्षाच्या कारावासात जवळपास ६ वेळा इंग्रजांकडे माफीनामा पाठवला.

अंदमानमध्ये दर महिन्याला ३-४ कैद्यांना फाशी दिली जात होती. याचा परिणाम सावरकरांवर झाला. त्यावेळी सावरकरांसोबत शिक्षा भोगत असलेले अन्य एक कैदी बरिंद्र घोष यांनी लिहिले आहे, की सावरकर बंधु आम्हाला जेलर विरुद्ध आंदोलन करण्यास प्रवृत्त करत परंतु ते सक्रीय सहभाग घेत नसत.

त्यानंतर सावरकर व त्यांच्या समर्थकांनी इंग्रजांची माफी मागण्याला एक रणनिती संबोधले. त्यामुळे तुरुंगात त्यांना काही सवलती मिळाल्या. सावरकरांनी आपल्या आत्मकथेत म्हटले आहे, की जर मी तुरुंगात आंदोलन केले असते तर भारतात पत्र पाठविण्याचा अधिकार मिळाला नसता. त्याचबरोबर त्यांची रणनिती होती, की भूमिगत राहूनही क्रांतीकारी चळवळ चालवली जाऊ शकते.



सावरकरांचे कडवे हिंदुत्व  -

अंदमानहून परत आल्यानंतर सावरकरांनी  'हिंदुत्व - हू इज़ हिंदू?' हे पुस्तक लिहून एक राजकीय विचारधारेचा वापर केला. हिंदुत्वाची व्याख्या सांगताना ते म्हणत की, देशातील प्रत्येक व्यक्ती पहिल्यांदा हिंदू आहे. देशाचा नागरिक तोच होऊ शकतो ज्याची पितृ भूमि, मातृ भूमि व पुण्यभूमी ही असेल. पितृ आणि मातृ भूमि कोणाचीही असू शकते परंतु पुण्य भूमि केवळ हिंदू, शीख, बौद्ध व जैनांची होऊ शकते त्यामुळे मुसलमान व खिश्चन या देशाचे नागरिक होऊ शकत नाहीत. १९२४ मध्ये सावरकरांनी येरवडा जेलमधून दोन अटींवर सोडण्यात आले. एक ते कोणत्याही राजकीय प्रक्रियेत सहभाग घेणार नाहीत व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुमतीशिवाय रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाहीत.

इतिहास संशोधक सांगतात की, सावरकरांनी लॉर्ड व्हायसरॉय लिनलिथगो यांच्याशी करार केला होता, की त्यांचा समान उद्देश्य आहे, गांधी, काँग्रेस व मुसलमानांचा विरोध. सावरकरांनी इंग्रजांकडून प्रतिमाह पेन्शनही मिळत होते.

३० जानेवारी १९४८ रोजी नथूराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर आठ लोकांबरोबरच सावरकरांनाही अटक केली होती. त्यानंतर संघाला गांधी हत्येचा डाग पुसण्यास खूप वर्षांचा काळ व्यतीत करावा लागला.

धनंजय कीर यांनी त्यांच्या 'सावरकर एंड हिज़ टाइम्स' पुस्तकात म्हणतात, की लाल किल्ल्यात चाललेल्या खटल्यात न्यायधीशांनी सावरकरांना मुक्त केले व नथूराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी सुनावली. त्यावेळी अनेक जण सावरकरांच्या पाया पडले व त्यांनी नारेबाजी केली.


Conclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.