मुंबई - प्रजा फाऊंडेशन नेहमीच लोकप्रतिनिधींच्या कामांचा लेखाजोखा आपल्या प्रगती पुस्तकातून सर्वांसमोर मांडत असते. प्रजा फाऊंडेशन ( Praja Foundation ) यांनी यावेळी मुंबई आणि उपनगर मधील 31 आमदारांच्या कामांचा लेखाजोखा ( MLAs Work Accounting ) समोर आणला आहे. प्रजा फाऊंडेशनने आमदारांचा गेल्या दोन वर्षांचा कामाचा सर्वे ( two years work survey )केला असून, यामध्ये कोणत्या आमदारांनी किती दिवस आपल्या कर्तव्याला न्याय दिला. तसेच कोणते आमदार आपलं काम योग्यरीत्या करू शकले नाही. याबाबतचा सर्वे प्रजा फाऊंडेशनने केला आहे. आमदारांच्या केलेल्या सर्वेनुसार काँग्रेस पक्षाचे मुंबईतील आमदार अनिल पटेल हे सर्वात अव्वल स्थानी आहेत. 81. 43 टक्के असे सर्वात चांगलं काम आमदार अमिन पटेल यांनी केले असल्याचा दावा प्रजा फाउंडेशन ने आपल्या सर्वेक्षणानुसार केला आहे.

काँग्रेसचे आमदार अनिल पटेल - काँग्रेसचे आमदार अनिल पटेल ( Congress MLA Anil Patel ) यांच्या पाठोपाठ भारतीय जनता पक्षाचे आमदार पराग अळवणी ( BJP MLA Parag Alwani ) यांनी 79.96% चांगले काम केले आहे. तर तिसर्या क्रमांकावर शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू ( Shiv Sena MLA Sunil Prabhu ) असून त्यांनी 77. 19% काम केले आहे. मात्र प्रजा फाऊंडेशन कडून हा सर्वे करत असताना मुंबईतील या आमदारांकडे मंत्रीपदे होती. त्यांच्या कामांचा सर्वे करण्यात आलेला नाही. त्यामुळे माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नवाब मलिक. आणि शिवसेनेचे आमदार रमेश लटके (मृत्यू ) यांच्या कामाचा आढावा या सर्वेत करण्यात आलेला नाही.

2021 पावसाळी अधिवेशनपर्यंतच्या कामांचा आढावा - प्रजा फाउंडेशनच्या प्रगती पुस्तकामध्ये हिवाळी अधिवेशन 2019 ते पावसाळी अधिवेशन 2021 पर्यंतच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. अधिवेशनात आमदारांनी केलेल्या कामानुसार त्यांना गुण देण्यात आले आहेत. एकूण 31 पैकी 13 आमदारांना 50% किंवा त्याहून कमी गुण मिळाले आहेत आणि केवळ एका आमदाराने 80% हून अधिक गुण प्राप्त केले आहेत. कोविडकाळात अधिवेशनाचे कामकाज कमी दिवस चालले, तरी सर्वसमावेशी निर्णय होण्यासाठी आमदारांनी अधिकाधिक प्रश्न व मुद्दे मांडून चर्चा करायला हवी होती. परंतू, बाराव्या विधानसभेच्या पहिल्या वर्षी (हिवाळी अधिवेशन 2009 - पावसाळी अधिवेशन 2010) आमदारांनी विचारलेल्या प्रश्नसंख्येच्या (7,955) तुलनेत, चौदाव्या विधानसभेच्या पहिल्या वर्षातील प्रश्नसंख्या (2,056) जवळपास 74% ने कमी झाले असल्याचे प्रजा फाऊंडेशन आणि आपल्या प्रगतीपुस्तकात मांडले आहे.

पहिले पाच मुंबईतील आमदार - अमीन पटेल (काँग्रेस), पराग फळवणी (भारतीय जनता पक्ष), सुनील प्रभू (शिवसेना), अमित साटम (भारतीय जनता पक्ष), अतूल भातखळकर (भारतीय जनता पक्ष)
खराब कामगिरी असलेले मुंबईतील पाच आमदार - रवींद्र वायकर (शिवसेना), प्रकाश सुर्वे (शिवसेना), राहुल नार्वेकर (भारतीय जनता पक्ष), मंगल प्रभात लोधा (भारतीय जनता पक्ष), झिशान सिद्धकी (काँग्रेस)
हेही वाचा -Uddhav Thackeray : एकनाथ शिंदें यांनी वाईट पद्धतीने मुख्यमंत्री पद मिळविले- उद्धव ठाकरे