मुंबई - उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, यावेळी बोलताना ठाकरे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे ;
- जणूकाही आभाळ फाटले आणि हे संकट ओढवले अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले.
- पूरस्थितीचा खंबीरपणे सामना करणे गरजेचे आहे, शिवसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे.
- पुराच्या संकटात आपण राजकारण बाजूला ठेवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.
- पूरग्रस्तांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा आहे, जवळपास १०० डॉक्टरांची टीम आम्ही पाठवली आहे.
- शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, आमदार राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलीक यांच्यासह शिवसैनिक नागरिकांसोबत पाण्यात राहून मदतकार्य करत आहेत.
निवडणुकांचा विचार डोक्यात तरी कसा येतो? उद्धव यांचा राज यांना टोला
महापूराचे संकट असताना निवडणुकांचा विचार डोक्यात तरी कसा येतो? असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. पूरस्थितीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी राज ठाकरें यांनी पत्रकार परिषदेत केली होती.