मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्यामध्ये जनावरांवर आलेल्या लम्पी रोगामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला (Shiv Sena leaders on issues of people of state) आहे. त्यातच राज्यातील कायदा व सुव्यवस्था या मुद्द्यावर शिवसेनेचे नेते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची सकाळी साडे आकाराच्या दरम्यान भेट घेणार आहेत.
राज्यातला शेतकरी अडचणीत आहे, यातच राज्य सरकारने देवू केलेली मदत अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तातडीने शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी, याबाबतचे निवेदन या भेटीतून राज्यपालांना दिले जाणार असल्याची माहिती मिळत (issues facing the people of state) आहे. या भेटीदरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत यांच्यासह काही नेते उपस्थित असणार आहेत.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नावर राज्यपालांसोबत चर्चा - तसेच राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, सत्ताधारी आमदार मारझोड करण्याच्या वार्ता सार्वजनिक ठिकाणी करत आहेत. तर दादरमध्ये एकनाथ शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशन परिसरात गोळीबार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याबाबत देखील चर्चा या भेटीदरम्यान होणार असल्याची माहिती मिळत (governor on issues facing the people of state) आहे.
परंपरेप्रमाणे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नाही - तसेच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र अद्यापही महानगरपालिकेकडून शिवसेनेला मेळावा घेण्यासाठी मैदानावर परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत दसऱ्याच्या दिवशी राज्यभरातून शिवसैनिक दादर येथील शिवाजी पार्क मैदानात जमा होऊ शकतो. असा इशारा शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी दिला आहे. त्यामुळे परंपरेप्रमाणे शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदान नाही, याबाबत देखील या भेटीत दरम्यान चर्चा होऊ (Shiv Sena leaders will meet governor) शकते.