मुंबई - राज्याने 9 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २.७६ कोटी आहे.
हेही वाचा - वाढदिवस भावाचा, जल्लोष गावाचा : 550 केक कापून बर्थ डे बॉयने दाखवला जलवा
अडीच कोटी नागरिकांना दोन डोस
दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २.७६ कोटी आहे. ही संख्या देशातील इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे अपर मुख्य सचिव डॉ. व्यास यांनी सांगितले.
लसीकरणाचा वेग वाढवणार
राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी 'कवच कुंडले अभियान' राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारकडून देशभरात येत्या १५ तारखेपर्यंत शंभर कोटी नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी 'कवच कुंडले' अभियानामध्ये सर्व विभागांचे अधिकारी- कर्मचारी यांना एकत्रित करून लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे.
हेही वाचा - आर्यनला 'जेल की बेल' उद्या कळणार; काय झालं न्यायालयात?