मुंबई - कोरोनाविरूद्ध जनजागृती करण्यासाठी सर्व भारतीयांनी आज ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील सर्व दिवे बंद करून आणि मेणबत्ती पेटवून देशाच्या एकजूटीचे दर्शन घडवावे, असे आवाहन मोदींनी केले होते. या आवाहनाला मुंबई शहरातून भरघोस प्रतिसाद मिळालेला दिसून आला आहे.
मोदींच्या आवाहनाला नरिमन पॉइंट येथील अग्निशमन दलाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रतिसाद दिला आहे. कोरोनाने जगभरासह भारतातही थैमान घातले असून या व्हायरसविरूद्धचे युद्ध आपणच जिंकणार असल्याचे प्रत्येक मुंबईकराने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.