ETV Bharat / city

VIDEO : जेनयूमधील हल्ला अन् विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया.. - जेएनयू समर्थनार्थ आंदोलन नाना पाटेकर प्रतिक्रिया

पाटेकर यांना आपली प्रतिक्रिया विचारली असता, हा हल्ला कोणी केला याची चौकशी अगोदर होणे गरजेचे आहे. ही चौकशी झाल्याशिवाय मी यावर बोलणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले. तसेच, विद्यार्थ्यानी हे विसरू नये, की आपले आई-वडील कोणत्या परिस्थितीतून आपल्याला शिकवत आहेत.

Nana Patekar on JNU attacks
VIDEO : जेनयूमधील हल्ला अन् विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया..
author img

By

Published : Jan 7, 2020, 1:29 AM IST

Updated : Jan 7, 2020, 7:56 AM IST

मुंबई - 'जेएनयू'मधील मारहाणी विरोधात 'गेटवे ऑफ इंडिया'वर गेल्या 24 तासांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला बरेच नेते-अभिनेते भेट देत आहेत. अभिनेते नाना पाटेकर यांना याबाबत विचारले असता, विद्यार्थ्यी शिक्षण घेण्यासाठी विद्यालयांमध्ये जातात, त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

VIDEO : जेनयूमधील हल्ला अन् विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया..

पाटेकर यांना आपली प्रतिक्रिया विचारली असता, हा हल्ला कोणी केला याची चौकशी अगोदर होणे गरजेचे आहे. ही चौकशी झाल्याशिवाय मी यावर बोलणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले. तसेच, विद्यार्थ्यानी हे विसरू नये, की आपले आई-वडील कोणत्या परिस्थितीतून आपल्याला शिकवत आहेत. केवळ एखाद्या राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून अशा प्रकारच्या आंदोलनांमध्ये आले असता, विद्यार्थ्यांविरूद्धच पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली जाते, राजकीय नेते मात्र नामानिराळे राहतात. याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांवरच होतो, त्यांना सोडवण्यासाठी मात्र कोणीही पुढे येत नाही. विद्यार्थ्यांना या सर्वाची झळ बसल्यावर आपोआप या गोष्टी कळतील. मात्र, त्यांनी आधीच सावध रहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, या भ्याड हल्ल्याची जबाबदारी 'हिंदू रक्षा दल' या हिंदूत्ववादी संघटनेने स्वीकारली आहे. दलाचा अध्यक्ष भूपेंद्र उर्फ पिंकी चौधरी याने मुलांना मारहाण करणारे त्याचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले आहे. देशाचे खाऊन परक्यांचे गीत गाणाऱ्या विद्यार्थ्यांवर असे हल्ले करत राहू, अशी धमकीही त्याने दिली आहे.

हेही वाचा : 'फ्री काश्मिर' बाबत समोर आले स्पष्टीकरण; हा फलक काश्मीरमुक्तीसाठी नव्हे, तर..

मुंबई - 'जेएनयू'मधील मारहाणी विरोधात 'गेटवे ऑफ इंडिया'वर गेल्या 24 तासांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला बरेच नेते-अभिनेते भेट देत आहेत. अभिनेते नाना पाटेकर यांना याबाबत विचारले असता, विद्यार्थ्यी शिक्षण घेण्यासाठी विद्यालयांमध्ये जातात, त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

VIDEO : जेनयूमधील हल्ला अन् विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया..

पाटेकर यांना आपली प्रतिक्रिया विचारली असता, हा हल्ला कोणी केला याची चौकशी अगोदर होणे गरजेचे आहे. ही चौकशी झाल्याशिवाय मी यावर बोलणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले. तसेच, विद्यार्थ्यानी हे विसरू नये, की आपले आई-वडील कोणत्या परिस्थितीतून आपल्याला शिकवत आहेत. केवळ एखाद्या राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून अशा प्रकारच्या आंदोलनांमध्ये आले असता, विद्यार्थ्यांविरूद्धच पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली जाते, राजकीय नेते मात्र नामानिराळे राहतात. याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांवरच होतो, त्यांना सोडवण्यासाठी मात्र कोणीही पुढे येत नाही. विद्यार्थ्यांना या सर्वाची झळ बसल्यावर आपोआप या गोष्टी कळतील. मात्र, त्यांनी आधीच सावध रहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, या भ्याड हल्ल्याची जबाबदारी 'हिंदू रक्षा दल' या हिंदूत्ववादी संघटनेने स्वीकारली आहे. दलाचा अध्यक्ष भूपेंद्र उर्फ पिंकी चौधरी याने मुलांना मारहाण करणारे त्याचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले आहे. देशाचे खाऊन परक्यांचे गीत गाणाऱ्या विद्यार्थ्यांवर असे हल्ले करत राहू, अशी धमकीही त्याने दिली आहे.

हेही वाचा : 'फ्री काश्मिर' बाबत समोर आले स्पष्टीकरण; हा फलक काश्मीरमुक्तीसाठी नव्हे, तर..

Intro:विद्यार्थी शिकायला जातात ,त्यांनी त्या ठिकाणी शिकावं. वाईट काही काम करून आपल्या आईवडिलांचं नाव खाली करू नये-नाना पाटेकर

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या वसतिगृहात काल दोन विद्यार्थी गटांमध्ये हाणामारी झाली यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा घडली आहे यावर देशातून सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करत आहेत यामध्येच प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे के विद्यापीठात गोंधळ घालणार यांची चौकशी करावी.

आम्ही विद्यार्थी होतो पण असं कधीही नाही केलं आपले आई-वडील आपल्याला कोणत्या परिस्थितीत शिकवतात याची जाणीव मुलांना असली पाहिजे.

ते त्यांनी विसरू नये. जर एखाद्या राजकीय पक्षांनी आपल्याला अशा प्रकारात लोटलं तर विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर बरबाद करावं लागतं. राजकीय पक्ष बाजूला होतात .विद्यार्थ्यांना आत मधे गेल्यावर सोडवायला कोणीही येत नाही. विद्यार्थ्यांना ते समजले पाहिजे.

"झल" लागल्यावरच विद्यार्थ्यांना कळेल का असा देखील प्रश्न पाटेकर यांनी यावेळी उपस्थित केला. विद्यार्थी आता ज्या ठिकाणी शिकायला जातात त्या ठिकाणी त्यांनी फक्त शिकावं असं काही करू नये ज्याने आपल्या स्वतःच्या आई-वडिलांचा नाव खाली जाईल अशी प्रतिक्रिया जेएनयूमध्ये घडलेल्या हिंसेवर प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली.


Body:।


Conclusion:।
Last Updated : Jan 7, 2020, 7:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.