ETV Bharat / city

मुंबईत संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या 11 हजार जणांवर कारवाई

टाळेबंदीच्या काळात संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या अकरा हजार जणांहून अधिक लोकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

author img

By

Published : May 7, 2020, 3:00 PM IST

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबई - कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस मुंबईत वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी करण्यात आली असून बाहेर फिरण्यास मनाई आहे. या काळात पोलिसांकडून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. 20 मार्च ते 6 मेच्या दरम्यान मुंबई शहरात अकरा हजारांहुन अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात टाळेबंदीच्या काळात 17 मेपर्यंत वाढवला गेला असून पोलिसांकडून कलम 144 शहरात लागू करण्यात आलेला आहे. 20 मार्च ते 6 मे या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघण करणाऱ्याच्या संदर्भात 5 हजार 902 प्रकरणात तब्बल 11 हजार 111 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1 हजार 356 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तब्बल 2 हजार 922 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे तर 6 हजार 833 आरोपींना पोलिसांनी जामिनावर सोडून दिले आहे.

मागील 24 तासात मुंबई शहरात कलम 144 नुसार पोलिसांनी तब्बल 54 जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये विनापरवाना हॉटेल, आस्थापन सुरू ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. दक्षिण मुंबईत दोघांवर वर कारवाई करण्यात आली असून, मध्य मुंबईत 22, पूर्व मुंबईत पाच जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर पश्चिम मुंबईत 17
व उत्तर मुंबईमध्ये पाच जणांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

हेही वाचा - मुंबई महानगरपालिका कर्मचारी फक्त २४ तास क्वारंटाईन; तातडीने कामावर येण्याचा फतवा

मुंबई - कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस मुंबईत वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी करण्यात आली असून बाहेर फिरण्यास मनाई आहे. या काळात पोलिसांकडून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. 20 मार्च ते 6 मेच्या दरम्यान मुंबई शहरात अकरा हजारांहुन अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात टाळेबंदीच्या काळात 17 मेपर्यंत वाढवला गेला असून पोलिसांकडून कलम 144 शहरात लागू करण्यात आलेला आहे. 20 मार्च ते 6 मे या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघण करणाऱ्याच्या संदर्भात 5 हजार 902 प्रकरणात तब्बल 11 हजार 111 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1 हजार 356 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तब्बल 2 हजार 922 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे तर 6 हजार 833 आरोपींना पोलिसांनी जामिनावर सोडून दिले आहे.

मागील 24 तासात मुंबई शहरात कलम 144 नुसार पोलिसांनी तब्बल 54 जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये विनापरवाना हॉटेल, आस्थापन सुरू ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. दक्षिण मुंबईत दोघांवर वर कारवाई करण्यात आली असून, मध्य मुंबईत 22, पूर्व मुंबईत पाच जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर पश्चिम मुंबईत 17
व उत्तर मुंबईमध्ये पाच जणांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

हेही वाचा - मुंबई महानगरपालिका कर्मचारी फक्त २४ तास क्वारंटाईन; तातडीने कामावर येण्याचा फतवा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.