ETV Bharat / city

Raj Thackeray 'तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा' PFI विषयावरून राज ठाकरेंची रोखठोक भूमिका

author img

By

Published : Sep 24, 2022, 6:54 PM IST

MNS President Raj Thackeray पीएफआयवर गुरुवारी झालेल्या कारवाईमुळे पीएफआयच्या समर्थकांनी देशभरात निदर्शने केली, त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला. पुण्यात पीएफआयच्या रॅलीच्या दरम्यान जमावात सहभागी काही लोकांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या आणि निषेध केला आहे. या घटनेने नवीनच खळबळ उडाली आहे. यादरम्यान पोलिसांनी कारवाई करत काही आंदोलकांना तात्काळ अटक केली आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray

मुंबई : पीएफआयवर गुरुवारी झालेल्या कारवाईमुळे पीएफआयच्या समर्थकांनी देशभरात निदर्शने केली, त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला. पुण्यात पीएफआयच्या रॅलीच्या दरम्यान जमावात सहभागी काही लोकांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या आणि निषेध केला आहे. या घटनेने नवीनच खळबळ उडाली आहे. यादरम्यान पोलिसांनी कारवाई करत काही आंदोलकांना तात्काळ अटक केली आहे. या सर्व प्रकरणावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray ) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपलं मत व्यक्त केलं असून, या संघटनेच्या कार्यकर्त्यांना 'तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा' असा थेट राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे.

  • माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर... आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे. @AmitShah @Dev_Fadnavis pic.twitter.com/BB88mEZ8hr

    — Raj Thackeray (@RajThackeray) September 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात की, एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे.

तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा ही अटक कशासाठी झाली ? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली, थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत.

ही कीड समूळ नष्टच करा माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे, की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा. यापुढे पाण्यासाठी देखील उच्चारता येणार नाही ! नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल. हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड संपूर्ण नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे. असा थेट इशाराच महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबई : पीएफआयवर गुरुवारी झालेल्या कारवाईमुळे पीएफआयच्या समर्थकांनी देशभरात निदर्शने केली, त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला. पुण्यात पीएफआयच्या रॅलीच्या दरम्यान जमावात सहभागी काही लोकांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या आणि निषेध केला आहे. या घटनेने नवीनच खळबळ उडाली आहे. यादरम्यान पोलिसांनी कारवाई करत काही आंदोलकांना तात्काळ अटक केली आहे. या सर्व प्रकरणावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray ) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपलं मत व्यक्त केलं असून, या संघटनेच्या कार्यकर्त्यांना 'तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा' असा थेट राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे.

  • माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर... आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे. @AmitShah @Dev_Fadnavis pic.twitter.com/BB88mEZ8hr

    — Raj Thackeray (@RajThackeray) September 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात की, एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे.

तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा ही अटक कशासाठी झाली ? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली, थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत.

ही कीड समूळ नष्टच करा माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे, की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा. यापुढे पाण्यासाठी देखील उच्चारता येणार नाही ! नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल. हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड संपूर्ण नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे. असा थेट इशाराच महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.