ETV Bharat / city

Javed Akhtar Defamation Case : जावेद अख्तर मानहानी प्रकरणाची सुनावणी तहकूब; 'या' तारखेला पुढील सुनावणी

author img

By

Published : Feb 1, 2022, 7:52 PM IST

ज्येष्ठ पटकथा लेखक कवी जावेद अख्तर ( Javed Akhtar Defamation ) यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकेवरून अंधेरी दंडाधिकारी न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र, आजची ( Javed Akhtar Defamation Case Hearing Postpond ) सुनावणी तहकूब करण्यात आली.

mumbai
mumbai

मुंबई - ज्येष्ठ पटकथा लेखक कवी जावेद अख्तर ( Javed Akhtar Defamation ) यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकेवरून अंधेरी दंडाधिकारी न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र, आजची सुनावणी तहकूब (Javed Akhtar Defamation Case Hearing Postpond ) करण्यात आली असून या याचिकेवर अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने कोर्टात पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण -

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एका मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली', अशी तक्रार गीतकार जावेद अख्तर यांनी वकील जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती.

काय म्हटले होते कंगनाने? -

कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते, की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही, तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्यायसुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकविण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल माध्यम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.

हेही वाचा - Restrictions relaxed in Mumbai : मुंबईतील निर्बंध शिथिल; नाईट कर्फ्यू हटवला

मुंबई - ज्येष्ठ पटकथा लेखक कवी जावेद अख्तर ( Javed Akhtar Defamation ) यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकेवरून अंधेरी दंडाधिकारी न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र, आजची सुनावणी तहकूब (Javed Akhtar Defamation Case Hearing Postpond ) करण्यात आली असून या याचिकेवर अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने कोर्टात पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण -

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एका मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली', अशी तक्रार गीतकार जावेद अख्तर यांनी वकील जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती.

काय म्हटले होते कंगनाने? -

कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते, की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही, तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्यायसुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकविण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल माध्यम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.

हेही वाचा - Restrictions relaxed in Mumbai : मुंबईतील निर्बंध शिथिल; नाईट कर्फ्यू हटवला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.