ETV Bharat / city

Heavy Rain in Maharashtra : मुंबई, कोकणासाठी पुढील दोन दिवस धोक्याचे, अती मुसळधार पावसाचा इशारा

author img

By

Published : Jul 7, 2022, 6:41 PM IST

Updated : Jul 7, 2022, 10:48 PM IST

पावसाचा जोर वाढत असल्याने आता मुंबईकरांच्या अडचणीत वाढ होत आहे. गुरुवारी शहर, उपनगरात काही ठिकाणी मुसळधार ( Warning of torrential rains in Mumbai ) ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उद्या, 8 जुलैला रेड अलर्ट ( Red alert ) जारी करण्यात आला आहे. उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस ( Heavy rain ) पडण्याची शक्याता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Heavy rains in Mumbai: The meteorological department has warned of heavy rains in Mumbai and Konkan tomorrow
मुंबई, कोकणासाठी उद्याचा दिवस धोक्याचा, हवामान विभागाने दिला अती मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई - गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला नाही. पावसाचा जोर वाढत असल्याने आता मुंबईकरांच्या अडचणीत वाढ होत आहे. शहरात सलग चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार ( Warning of torrential rains in Mumbai ) ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोबतच काही भागात रेड अलर्ट देखील जाहीर केला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उद्या, 8 जुलैसाठी रेड अलर्ट म्हणजेच अती मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील शुक्रवारपासून मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर वाढत आहे. त्यात हा पाऊस विश्रांती घेत बरसत असल्याने तेवढाच मुंबईकरांना दिलासा मिळत आहे.

Heavy rains in Mumbai : मुंबई, कोकणासाठी उद्याचा दिवस धोक्याचा, हवामान विभागाने दिला अती मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ काय सांगतात ? भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3-4 दिवसांत मान्सूनच्या अनुकूल परिस्थितीमुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात चांगला पाऊस झाला आहे. पुढील ४-५ दिवस अशीच स्थिती राहणार आहे. त्यात काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकण विभागाला रेड अलर्ट तर मुंबई आणि उपनगराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत दक्षिण मुंबईत 82 मिमी पाऊस झाला, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात 109 मिमी आणि 106 मिमी पाऊस झाला. तर गुरुवारी सकाळी 10 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत पालघरमध्ये सरासरी 89.27 मिमी पाऊस झाला असून वाडा तालुक्यात सर्वाधिक 135 मिमी पाऊस झाला आहे.

दरम्यान, राज्याच्या अनेक भागात ४ जुलैपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागांतून नद्या धोक्याच्या पातळी जवळून वाहत असून काही ठिकाणी सखल भागात पूर स्थिती निर्माण झाली आहे.मागील आठवड्यात गुरुवारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही अधून मधून मुंबईत सुरूच आहे. पुढील तीन ते चार दिवस देखील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी येथे पुढील 2 दिवस रेड अर्लटचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबर मुंबईला देखील उद्या सकाळपर्यंत रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार- रत्नागिरी जिल्ह्यात बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर समुद्र देखील खवळला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात एकूण ८०८.५०, तर सरासरी ८९.८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा - कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, 21 ते 24 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज, 70 ते 120 मिमी पावसाची शक्यता, पाऊस वाढल्याने नद्यांची पातळीही वाढणार, डोंगराळ भागात भू:स्खलन होण्याची भिती वाढली आहे.

सातारा जिल्ह्यात 24 तासात सरासरी 19.8 मिलीमीटर पाऊस- जिल्ह्यात बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण सरासरी 19.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर आतापर्यंत सरासरी 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत (24 तासात) झालेल्या चोविस तासात सातारा - 23.3 (91.7), जावळी - 47 (154.8), पाटण - 35 (157.5), कराड -14 (75.0), कोरेगाव - 9.7 (84.7), खटाव - 7.8 (46), माण - 3.6 (118.3), फलटण - 0.7 (65.4), खंडाळा - 2.7 (45), वाई - 18.3 (120.4), महाबळेश्वर - 85.6 (636.3) पावसाची नोंद झाली आहे.

नाशिकमध्येही पावसाची हजेरी- शहरात मध्यरात्री पासून संततधार पाऊस सुरू असून, सकाळनंतर रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. त्याचबरोबर इगतपुरी तालुक्यात पावसाच्या संततधार पावसाला सुरूवात झाला आहे. सर्व राज्यात समाधानकारक पाऊस पडत असला तरीही, शुक्रवारी शहरात पाणी कपात करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 28 टक्के पाऊस पडला आहे. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 33 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. नाशिक जिल्ह्यात 24 धरणात एकूण 29 टक्के पाणीसाठा आहे. तर 7 धरणांत 10 टक्के पेक्षा कमी पाणी उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - Heavy Rain In Mumbai: पावसाचा दणका! तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस, २४ तासात ३ जखमी, वेगवान वारे वाहणार

मुंबई - गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला नाही. पावसाचा जोर वाढत असल्याने आता मुंबईकरांच्या अडचणीत वाढ होत आहे. शहरात सलग चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार ( Warning of torrential rains in Mumbai ) ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोबतच काही भागात रेड अलर्ट देखील जाहीर केला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उद्या, 8 जुलैसाठी रेड अलर्ट म्हणजेच अती मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील शुक्रवारपासून मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर वाढत आहे. त्यात हा पाऊस विश्रांती घेत बरसत असल्याने तेवढाच मुंबईकरांना दिलासा मिळत आहे.

Heavy rains in Mumbai : मुंबई, कोकणासाठी उद्याचा दिवस धोक्याचा, हवामान विभागाने दिला अती मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ काय सांगतात ? भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3-4 दिवसांत मान्सूनच्या अनुकूल परिस्थितीमुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात चांगला पाऊस झाला आहे. पुढील ४-५ दिवस अशीच स्थिती राहणार आहे. त्यात काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकण विभागाला रेड अलर्ट तर मुंबई आणि उपनगराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत दक्षिण मुंबईत 82 मिमी पाऊस झाला, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात 109 मिमी आणि 106 मिमी पाऊस झाला. तर गुरुवारी सकाळी 10 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत पालघरमध्ये सरासरी 89.27 मिमी पाऊस झाला असून वाडा तालुक्यात सर्वाधिक 135 मिमी पाऊस झाला आहे.

दरम्यान, राज्याच्या अनेक भागात ४ जुलैपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागांतून नद्या धोक्याच्या पातळी जवळून वाहत असून काही ठिकाणी सखल भागात पूर स्थिती निर्माण झाली आहे.मागील आठवड्यात गुरुवारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही अधून मधून मुंबईत सुरूच आहे. पुढील तीन ते चार दिवस देखील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी येथे पुढील 2 दिवस रेड अर्लटचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबर मुंबईला देखील उद्या सकाळपर्यंत रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार- रत्नागिरी जिल्ह्यात बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर समुद्र देखील खवळला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात एकूण ८०८.५०, तर सरासरी ८९.८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा - कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, 21 ते 24 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज, 70 ते 120 मिमी पावसाची शक्यता, पाऊस वाढल्याने नद्यांची पातळीही वाढणार, डोंगराळ भागात भू:स्खलन होण्याची भिती वाढली आहे.

सातारा जिल्ह्यात 24 तासात सरासरी 19.8 मिलीमीटर पाऊस- जिल्ह्यात बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण सरासरी 19.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर आतापर्यंत सरासरी 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत (24 तासात) झालेल्या चोविस तासात सातारा - 23.3 (91.7), जावळी - 47 (154.8), पाटण - 35 (157.5), कराड -14 (75.0), कोरेगाव - 9.7 (84.7), खटाव - 7.8 (46), माण - 3.6 (118.3), फलटण - 0.7 (65.4), खंडाळा - 2.7 (45), वाई - 18.3 (120.4), महाबळेश्वर - 85.6 (636.3) पावसाची नोंद झाली आहे.

नाशिकमध्येही पावसाची हजेरी- शहरात मध्यरात्री पासून संततधार पाऊस सुरू असून, सकाळनंतर रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. त्याचबरोबर इगतपुरी तालुक्यात पावसाच्या संततधार पावसाला सुरूवात झाला आहे. सर्व राज्यात समाधानकारक पाऊस पडत असला तरीही, शुक्रवारी शहरात पाणी कपात करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 28 टक्के पाऊस पडला आहे. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 33 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. नाशिक जिल्ह्यात 24 धरणात एकूण 29 टक्के पाणीसाठा आहे. तर 7 धरणांत 10 टक्के पेक्षा कमी पाणी उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - Heavy Rain In Mumbai: पावसाचा दणका! तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस, २४ तासात ३ जखमी, वेगवान वारे वाहणार

Last Updated : Jul 7, 2022, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.