ETV Bharat / city

CM Uddhav Thackeray : 'या' महापुरुषांचे दर्शन घेतल्यानंतरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतात कार्यालयात प्रवेश

author img

By

Published : May 5, 2022, 3:22 PM IST

Updated : May 5, 2022, 3:54 PM IST

मुख्यमंत्री ( Chief Minister Uddhav Thackeray ) मंत्रालयात प्रवेश ( Enters in Mantralaya ) करताच सर्वप्रथम प्रवेशद्वारा शेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj ) प्रतिमेला वंदन करतात. त्यानंतर शेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या प्रतिमेला वंदन करूनच ते आपल्या कार्यालयात जातात. मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा नेहमीचा शिरस्ता आहे.

CM thakeray file photo
CM thakeray file photo

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही महिन्यांपासून मंत्रालयात जात नव्हते. मात्र आता ते मंत्रालयात नियमित येत असून मंत्रालयाच्या आवारात प्रवेश करताच दोन महापुरुषांचे दर्शन घेतल्याशिवाय ते आपल्या कार्यालयात जात नाहीत. मुख्यमंत्री ( Chief Minister Uddhav Thackeray ) मंत्रालयात प्रवेश ( Enters in Mantralaya ) करताच सर्वप्रथम प्रवेशद्वारा शेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj ) प्रतिमेला वंदन करतात. त्यानंतर शेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या प्रतिमेला वंदन करूनच ते आपल्या कार्यालयात जातात. मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा नेहमीचा शिरस्ता आहे. मंत्रालयात आल्यानंतर एकही दिवस या दोन महापुरुषांचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांनी कामकाजाला सुरुवात केली नसल्याचे पाहायला मिळते.

प्रतिक्रिया देताना राजकीय विश्लेषक


केवळ बोलण्यातून नाही तर कृतीतून व्यक्त : छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर महापुरुषांचे विचार आपल्या भाषणांमधून मांडताना आणि वारंवार त्यांचा उल्लेख करताना आपण अनेक नेत्यांना पाहतो. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ भाषणा पुरते महापुरुषांचे स्मरण करत नाहीत, तर दररोज त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय कामकाजाला सुरुवात करत नाहीत. हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

'हा प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा मंत्रालयात येतात तेव्हा ते आल्या आल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर आंबेडकर यांचे दर्शन घेतात. हा त्यांच्यावरील प्रबोधनकारांच्या विचारांचा असलेला वारसा जाणवतो. तर महाराष्ट्रा प्रती असलेले त्यांचे प्रेम आणि महापुरुषांबद्दल असलेला आदर यातून व्यक्त होतो. पूर्वीचे अनेक मुख्यमंत्री जेव्हा मंत्रालयात यायचे तेव्हा त्यांना लॉबीमध्ये कोणत्या महापुरुषांच्या प्रतिमा आहेत, याची फारशी जाणीवही नसायची. फक्त जयंती आणि पुण्यतिथी वेळी पुष्पचक्र अर्पण करत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी दररोज महापुरुषांचे दर्शन घेऊन आपले वेगळेपण सिद्ध केले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Raj Thackeray Politics : राज ठाकरे बाळासाहेबांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करत आहे का?

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही महिन्यांपासून मंत्रालयात जात नव्हते. मात्र आता ते मंत्रालयात नियमित येत असून मंत्रालयाच्या आवारात प्रवेश करताच दोन महापुरुषांचे दर्शन घेतल्याशिवाय ते आपल्या कार्यालयात जात नाहीत. मुख्यमंत्री ( Chief Minister Uddhav Thackeray ) मंत्रालयात प्रवेश ( Enters in Mantralaya ) करताच सर्वप्रथम प्रवेशद्वारा शेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj ) प्रतिमेला वंदन करतात. त्यानंतर शेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या प्रतिमेला वंदन करूनच ते आपल्या कार्यालयात जातात. मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा नेहमीचा शिरस्ता आहे. मंत्रालयात आल्यानंतर एकही दिवस या दोन महापुरुषांचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांनी कामकाजाला सुरुवात केली नसल्याचे पाहायला मिळते.

प्रतिक्रिया देताना राजकीय विश्लेषक


केवळ बोलण्यातून नाही तर कृतीतून व्यक्त : छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर महापुरुषांचे विचार आपल्या भाषणांमधून मांडताना आणि वारंवार त्यांचा उल्लेख करताना आपण अनेक नेत्यांना पाहतो. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ भाषणा पुरते महापुरुषांचे स्मरण करत नाहीत, तर दररोज त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय कामकाजाला सुरुवात करत नाहीत. हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

'हा प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा मंत्रालयात येतात तेव्हा ते आल्या आल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर आंबेडकर यांचे दर्शन घेतात. हा त्यांच्यावरील प्रबोधनकारांच्या विचारांचा असलेला वारसा जाणवतो. तर महाराष्ट्रा प्रती असलेले त्यांचे प्रेम आणि महापुरुषांबद्दल असलेला आदर यातून व्यक्त होतो. पूर्वीचे अनेक मुख्यमंत्री जेव्हा मंत्रालयात यायचे तेव्हा त्यांना लॉबीमध्ये कोणत्या महापुरुषांच्या प्रतिमा आहेत, याची फारशी जाणीवही नसायची. फक्त जयंती आणि पुण्यतिथी वेळी पुष्पचक्र अर्पण करत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी दररोज महापुरुषांचे दर्शन घेऊन आपले वेगळेपण सिद्ध केले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Raj Thackeray Politics : राज ठाकरे बाळासाहेबांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करत आहे का?

Last Updated : May 5, 2022, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.