ETV Bharat / city

BMC Election 2022 : मुंबईत ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा लॉटरी, पालिका आयुक्तांनी घेतला आढावा

author img

By

Published : Jun 1, 2022, 10:25 PM IST

मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची आरक्षण लॉटरी ओबीसी वगळून काढण्यात आली आहे. आता पुन्हा ओबीसी आरक्षण द्यायचे झाल्यास लॉटरी कशा प्रकारे काढली जाऊ शकते याबाबत पालिका आयुक्तांनी आढावा बैठक घेतल्याचे समजते. भाजपच्या दबावामुळे ही बैठक झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच आम्ही या प्रस्तावीत बदलाचे स्वागत करू तसेच त्यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवू, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दि

महापालिका
महापालिका

मुंबई - मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची आरक्षण लॉटरी ओबीसी वगळून काढण्यात आली आहे. आता पुन्हा ओबीसी आरक्षण द्यायचे झाल्यास लॉटरी कशा प्रकारे काढली जाऊ शकते याबाबत पालिका आयुक्तांनी आढावा बैठक घेतल्याचे समजते. भाजपच्या दबावामुळे ही बैठक झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच आम्ही या प्रस्तावीत बदलाचे स्वागत करू तसेच त्यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवू, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिली.

आढावा बैठक - देशभरात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. राज्यातील महापालिकांच्या प्रभाग आरक्षण लॉटरी ओबीसी आरक्षण शिवाय काढण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यात ओबीसी आरक्षण मिळवण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहेत. यामुळे ओबीसी आरक्षण मिळण्याची शक्यता असल्याने न्यायालयाचे आदेश आल्यास पुन्हा ओबीसीसाठी प्रभाग आरक्षण लॉटरी काढावी लागणार आहे. ही लॉटरी कशी काढावी याबाबत एक आढावा बैठक पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी घेतली. या बैठकीत एकदा लॉटरी काढल्यावर दुसऱ्यांदा कशी लॉटरी काढायची याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

काय आहे भाजपाचे म्हणणे - ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात, अशी आग्रही भूमिका भाजपने घेतली असून याबाबत रस्त्यावर उतरून आंदोलनही करण्यात आले. मात्र, ठाकरे सरकार न्यायालयात अपयशी ठरल्यानंतर मंगळवारी (दि. 31 मे) ओबीसी आरक्षण वगळून सोडती जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर ही भाजपने आरक्षण मिळालेच पाहिजे, असा आग्रह धरला आहे. पक्षाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी कालच याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही पक्षातंर्गत ओबीसींंना न्याय देऊ, असेही पक्षाने जाहीर केले त्यामुळे सत्ताधारी पक्षावरील दबाव कायम ठेवण्यात भाजपला यश आल्याचा दावा करण्यात आला आहे.

पाठपुरावा सुरुच ठेवू - शेलार - ओबीसींना वगळून महापालिका आरक्षणे निघाली. पण, आम्ही ओबीसीसोबत आहोत. सत्ताधाऱ्यांचा वॉर्ड रचनेपासूनच रडीचा डाव सुरू असून काँग्रेसचा तर रडारडीचा डाव आहे. या लढाईत भाजपाचे कार्यकर्ते डगमगणार नाहीत. प्रत्येकवेळा पक्षाला जिंकून आणण्यासाठी लढतो, यावेळी आम्ही मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार, भ्रष्टाचाराला हरवणार, है तयार हम, असे जाहीर केले. भाजपचा हा ओबीसींंच्या बाजूने वाढता दबाव कामी आला आहे. आज मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ओबीसी आरक्षणासह पुन्हा सोडत काढायची झाल्यास प्रशासनाने करायच्या उपाययोजनांंबाबत बैठक घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. आम्ही या प्रस्तावीत बदलाचे स्वागत करू तसेच त्यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवू, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिली.

हेही वाचा - राज्यातील 94 हजार शिक्षकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात; वरिष्ठ व निवडश्रेणी मिळून फायदा होणार

मुंबई - मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची आरक्षण लॉटरी ओबीसी वगळून काढण्यात आली आहे. आता पुन्हा ओबीसी आरक्षण द्यायचे झाल्यास लॉटरी कशा प्रकारे काढली जाऊ शकते याबाबत पालिका आयुक्तांनी आढावा बैठक घेतल्याचे समजते. भाजपच्या दबावामुळे ही बैठक झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच आम्ही या प्रस्तावीत बदलाचे स्वागत करू तसेच त्यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवू, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिली.

आढावा बैठक - देशभरात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. राज्यातील महापालिकांच्या प्रभाग आरक्षण लॉटरी ओबीसी आरक्षण शिवाय काढण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यात ओबीसी आरक्षण मिळवण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहेत. यामुळे ओबीसी आरक्षण मिळण्याची शक्यता असल्याने न्यायालयाचे आदेश आल्यास पुन्हा ओबीसीसाठी प्रभाग आरक्षण लॉटरी काढावी लागणार आहे. ही लॉटरी कशी काढावी याबाबत एक आढावा बैठक पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी घेतली. या बैठकीत एकदा लॉटरी काढल्यावर दुसऱ्यांदा कशी लॉटरी काढायची याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

काय आहे भाजपाचे म्हणणे - ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात, अशी आग्रही भूमिका भाजपने घेतली असून याबाबत रस्त्यावर उतरून आंदोलनही करण्यात आले. मात्र, ठाकरे सरकार न्यायालयात अपयशी ठरल्यानंतर मंगळवारी (दि. 31 मे) ओबीसी आरक्षण वगळून सोडती जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर ही भाजपने आरक्षण मिळालेच पाहिजे, असा आग्रह धरला आहे. पक्षाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी कालच याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही पक्षातंर्गत ओबीसींंना न्याय देऊ, असेही पक्षाने जाहीर केले त्यामुळे सत्ताधारी पक्षावरील दबाव कायम ठेवण्यात भाजपला यश आल्याचा दावा करण्यात आला आहे.

पाठपुरावा सुरुच ठेवू - शेलार - ओबीसींना वगळून महापालिका आरक्षणे निघाली. पण, आम्ही ओबीसीसोबत आहोत. सत्ताधाऱ्यांचा वॉर्ड रचनेपासूनच रडीचा डाव सुरू असून काँग्रेसचा तर रडारडीचा डाव आहे. या लढाईत भाजपाचे कार्यकर्ते डगमगणार नाहीत. प्रत्येकवेळा पक्षाला जिंकून आणण्यासाठी लढतो, यावेळी आम्ही मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार, भ्रष्टाचाराला हरवणार, है तयार हम, असे जाहीर केले. भाजपचा हा ओबीसींंच्या बाजूने वाढता दबाव कामी आला आहे. आज मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ओबीसी आरक्षणासह पुन्हा सोडत काढायची झाल्यास प्रशासनाने करायच्या उपाययोजनांंबाबत बैठक घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. आम्ही या प्रस्तावीत बदलाचे स्वागत करू तसेच त्यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवू, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिली.

हेही वाचा - राज्यातील 94 हजार शिक्षकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात; वरिष्ठ व निवडश्रेणी मिळून फायदा होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.