ETV Bharat / city

..सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या शिवसेनेला लोकांनी ओळखलंय - राम कदम

author img

By

Published : Jan 5, 2021, 3:08 PM IST

Updated : Jan 5, 2021, 5:27 PM IST

शिवसेना मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. त्यासाठी शिवसेनेने फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता मुंबईच्या गुजराती मतदारांना साद घालायचे ठरवत, गुजराती बॅनर करत गुजराती मेळावा आयोजित केला आहे. यावर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर निवडणूक पाहून सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांना लोकांनी ओळखलंय अशी टीका केली आहे.

मुंबई
मुंबई

मुंबई - भाजपकडून निर्माण झालेल्या तगड्या आव्हानामुळे आता शिवसेना मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. त्यासाठी शिवसेनेने फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता मुंबईच्या गुजराती मतदारांना साद घालायचे ठरवत, गुजराती बॅनर करत गुजराती मेळावा आयोजित केला आहे. यावर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर निवडणूक पाहून सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांना लोकांनी ओळखलंय अशी टीका केली आहे.

मुंबई
निवडणूक येताच शिवसेनेला मराठी व गुजराती अन्य प्रांतातील लोकांची आठवणनिवडणूक येताच शिवसेनेला मराठी, गुजराती अन्य प्रांतातील लोकांची आठवण येते. पण, निवडणूक होताच यांची दृष्टी इतकी कमजोर आहे की, हे लगेच लोकांना विसरतात. निवडणुकी अगोदर हिंदुत्वावर बोलत होते. मात्र, निवडणूक झाल्यानंतर फिरले. ज्या काँग्रेसने हिंदुत्वाला नेहमी विरोध केला त्यांचासोबत सत्तेत आले. त्यामुळे निवडणूक पाहून सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या शिवसेनेला लोकांनी ओळखलंय, असे भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे.
मुंबई
मुंबई
मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मुंबईत ही मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती मिळत आहे. 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद घालण्यासाठी मेळावा मुंबईत आयोजित केला आहे.

मुंबई - भाजपकडून निर्माण झालेल्या तगड्या आव्हानामुळे आता शिवसेना मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. त्यासाठी शिवसेनेने फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता मुंबईच्या गुजराती मतदारांना साद घालायचे ठरवत, गुजराती बॅनर करत गुजराती मेळावा आयोजित केला आहे. यावर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर निवडणूक पाहून सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांना लोकांनी ओळखलंय अशी टीका केली आहे.

मुंबई
निवडणूक येताच शिवसेनेला मराठी व गुजराती अन्य प्रांतातील लोकांची आठवणनिवडणूक येताच शिवसेनेला मराठी, गुजराती अन्य प्रांतातील लोकांची आठवण येते. पण, निवडणूक होताच यांची दृष्टी इतकी कमजोर आहे की, हे लगेच लोकांना विसरतात. निवडणुकी अगोदर हिंदुत्वावर बोलत होते. मात्र, निवडणूक झाल्यानंतर फिरले. ज्या काँग्रेसने हिंदुत्वाला नेहमी विरोध केला त्यांचासोबत सत्तेत आले. त्यामुळे निवडणूक पाहून सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या शिवसेनेला लोकांनी ओळखलंय, असे भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे.
मुंबई
मुंबई
मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मुंबईत ही मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती मिळत आहे. 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद घालण्यासाठी मेळावा मुंबईत आयोजित केला आहे.

Last Updated : Jan 5, 2021, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.