ETV Bharat / city

BJP's Mission 134 on BMC Election : मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्याचे लक्ष्य; भाजपचे मिशन 134

author img

By

Published : Jul 12, 2022, 8:27 AM IST

Updated : Jul 12, 2022, 9:31 AM IST

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेत ( BMC ) भाजपची ताकद वाढली ( BJP's Strength Increased in BMC ) आहे. त्यामुळे भाजप आता मुंबई महापालिकेत आक्रमक ( BJP is aggressive in BMC ) झाल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेत तर भाजप विरोधी पक्षात होता. परंतु, राज्यातील सत्तांतरानंतर भाजपला बळ मिळाल्याने त्यांनी महापालिकेतील मागील सत्ताधाऱ्यांनी आणि पालिका प्रशासनाने घेतलेले निर्णय मागे घेण्यास सुरुवात केली ( Shiv Sena Decision Started to Reversed ) आहे. आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांचेही अनेक प्रकल्प हे भाजपच्या रडारवर आले आहेत.

Mumbai Municipal Corporation
मुंबई महापालिका

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत शिवसेना सत्तेत तर भाजप विरोधी पक्षात होता. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार गेले. शिवसेनेत बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे व भाजपचे सरकार आले. त्यानंतर पालिकेमध्ये ( BJP Strength Increased in BMC ) भाजप आक्रमक ( BJP is aggressive in BMC ) झाली आहे. मागील सत्ताधाऱ्यांनी आणि पालिका प्रशासनाने घेतलेले निर्णय मागे घेण्यास ( Shiv Sena Decision Started to Reversed ) आयुक्तांना भाग पाडले आहे. आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांचेही अनेक प्रकल्प हे भाजपच्या रडारवर आले आहेत. यावर मुंबईकरांच्या प्रश्नांवर आक्रमक असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. तर निवडणुकीत मतदार जो काय तो निर्णय घेतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करण्याचे लक्ष्य : मुंबई महापालिकेत गेले २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने मिशन १३४ जाहीर केले आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होताच भाजपा कामाला लागली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसून कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा नगरसेवक निवडून आणा, असे आदेश माजी नगरसेवकांना देण्यात आले आहेत.

प्रभाकर शिंदे, माजी गटनेते, भाजप

पालिकेवर शिवसेनेची २५ वर्षे सत्ता : मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार होती. मात्र कोरोना मुळे निवडणुकीला उशीर झाला आहे. या निवडणुका ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे. पालिकेत गेले २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या काळात भाजपा शिवसेनेचा मित्र पक्ष राहिला आहे. २०१४ च्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यावर २०१७ ची पालिका निवडणुक शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले. भाजपाचे ८२ तर शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले. तेव्हापासून पालिकेवर भाजपाचा महापौर बसवण्याचा संकल्प भाजपाने केला आहे.


भाजपचे मिशन १३४ : मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्यासाठी मिशन १३४ जाहीर करण्यात आले आहे. पालिकेच्या २३६ पैकी १३४ जागा निवडून आणण्याचा संकल्प भाजपाने केला आहे. मुंबई महापालिकेला १३४ वर्षे पूर्ण होत असल्याने हा संकल्प करण्यात आला आहे. महापालिकेत या संदर्भात सोमवारी भाजपाच्या माजी नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत भाजप आमदार मिहिर कोटेचा, भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, माजी नगरसेवक व गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक व पक्षनेते विनोद मिश्रा आदींनी मार्गदर्शन केले.

पाणी कपात रद्द : मुंबईमध्ये जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १० टक्के पाणी शिल्लक असल्याने पालिकेने २७ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू केली. २९ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. आठच दिवसांत पाणीसाठा वाढू लागला. भाजपच्या माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळ पालिका आयुक्तांना भेटले. पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली. धरणात ५० टक्क्यांहून अधिक साठा जमा झाल्यावर पाणी कपात रद्द केली जाते. मात्र, आयुक्तांनी २५ टक्के पाणीसाठा असतानाच कपात रद्द केली आहे.


पोयसरनदीचे पाणी इमारतीमध्ये : पोयसर नदी येथे संरक्षण भिंत बांधल्याने बाजूला असलेल्या जीवन विद्या मिशन मार्गावरील हौसिंग सोसायटीमध्ये ३ ते ४ फूट पाणी शिरले होते. मुंबई महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही याची गंभीर नोंद घेतली जात नव्हती. त्यासाठी भाजपचे चारकोप कांदिवलीचे आमदार योगेश सागर यांनी पालिका आयुक्तांच्या बंगल्यावर आंदोलन करण्याचा तसेच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. याची दखल पालिका आयुक्तांनी घेऊन त्वरित अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना पाठवून समस्या काय आहे जाणून घेतले.

या निविदांनाही स्थगिती : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने अत्याधुनिक टनेल लाँड्री उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयात घोटाळा झाल्याचा संशय भाजप आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला होता. तरीही प्रशासनाकडून सारवासारव करीत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी हे १६० कोटींचे कंत्राट रद्द करावे आणि संपूर्ण निविदा प्रक्रियेची नि:पक्षपातीपणे तपासणी करीत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अमित साटम यांनी लेखी पत्राद्वारे महानगरपालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आले आहे. राणीच्या बागेत २९० करोड रुपये खर्च करून प्राण्यांसाठी पिंजरे बनवले जाणार होते. यात भ्रष्टाचार असल्याचे सांगत त्याविरोधात माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आले.


हे प्रकल्प भाजपच्या रडारवर : राज्यात सत्तांतरानंतर सरकारमध्ये असलेल्या भाजपने शिवसेनेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना लक्ष्य करण्याची तयारी सुरू केली आहे. पवई तलावाभोवतीचा सायकल ट्रॅक, आश्रय योजनांतर्गत कर्मचा-यांच्या घरांसाठीचा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आदी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना भाजपकडून लक्ष केले जाते आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला भाजपने सुरुवातीलाच तीव्र विरोध केला होता. राज्यात झालेल्या सत्तांतरांनंतर या प्रकल्पांना रोखण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.


मुंबईकरांच्या प्रश्नावर आक्रमक : आयुक्तांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. भाजपच्या मागण्या या मुंबईकरांच्या होत्या. १० टक्के पाणी कपातीच्या नावाने काही ठिकाणी पूर्ण पाणी कपात लागू केली. हा प्रकार निदर्शनास आणल्यावर आयुक्तांनी पाणी कपात रद्द केली. धोकादायक इमारती कोसळतात. त्यात लोकांचा मृत्यू होतो. त्यासाठी भाजपने धोरण बनवण्याची मागणी केली होती. भाजप गेले पाच वर्षे मुंबईकरांच्या प्रश्नावर आक्रमक राहिला आहे. आयुक्तांनी न्याय देण्याची भूमिका घेतली. मुंबईकरांच्या प्रश्नावर आयुक्त यापुढेही अशीच भूमिका घेतील, अशी आशा बाळगतो असे भाजपचे पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांना म्हटले आहे.


हे जनता ठरवेल : आता ते सत्तेत आले आहेत, त्यामुळे ते निर्णय घेतील. मात्र, निवडणुकीत मतदार ठरवणार आहेत, हे लक्षात घ्यावे. शिवसेनेने जे काही केले, ते शहरासाठी चांगले होते की नाही हे जनता ठरवेल. आदित्य ठाकरे यांच्या दूरदृष्टीने शहरासाठी जे आवश्यक होते त्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे, असे माजी महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.


हेही वाचा : MLA Bhaskar Jadhav questions PM : भाजपने रडीचा डाव खेळत आमदार फोडले-भास्कर जाधव

हेही वाचा : Raosaheb Danve : शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचा खळबळजनक दावा

हेही वाचा : CM Eknath Shinde Gadchiroli : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला गडचिरोलीतील पूरपरिस्थितीचा आढावा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत शिवसेना सत्तेत तर भाजप विरोधी पक्षात होता. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार गेले. शिवसेनेत बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे व भाजपचे सरकार आले. त्यानंतर पालिकेमध्ये ( BJP Strength Increased in BMC ) भाजप आक्रमक ( BJP is aggressive in BMC ) झाली आहे. मागील सत्ताधाऱ्यांनी आणि पालिका प्रशासनाने घेतलेले निर्णय मागे घेण्यास ( Shiv Sena Decision Started to Reversed ) आयुक्तांना भाग पाडले आहे. आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांचेही अनेक प्रकल्प हे भाजपच्या रडारवर आले आहेत. यावर मुंबईकरांच्या प्रश्नांवर आक्रमक असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. तर निवडणुकीत मतदार जो काय तो निर्णय घेतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करण्याचे लक्ष्य : मुंबई महापालिकेत गेले २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने मिशन १३४ जाहीर केले आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होताच भाजपा कामाला लागली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसून कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा नगरसेवक निवडून आणा, असे आदेश माजी नगरसेवकांना देण्यात आले आहेत.

प्रभाकर शिंदे, माजी गटनेते, भाजप

पालिकेवर शिवसेनेची २५ वर्षे सत्ता : मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार होती. मात्र कोरोना मुळे निवडणुकीला उशीर झाला आहे. या निवडणुका ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे. पालिकेत गेले २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या काळात भाजपा शिवसेनेचा मित्र पक्ष राहिला आहे. २०१४ च्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यावर २०१७ ची पालिका निवडणुक शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले. भाजपाचे ८२ तर शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले. तेव्हापासून पालिकेवर भाजपाचा महापौर बसवण्याचा संकल्प भाजपाने केला आहे.


भाजपचे मिशन १३४ : मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्यासाठी मिशन १३४ जाहीर करण्यात आले आहे. पालिकेच्या २३६ पैकी १३४ जागा निवडून आणण्याचा संकल्प भाजपाने केला आहे. मुंबई महापालिकेला १३४ वर्षे पूर्ण होत असल्याने हा संकल्प करण्यात आला आहे. महापालिकेत या संदर्भात सोमवारी भाजपाच्या माजी नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत भाजप आमदार मिहिर कोटेचा, भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, माजी नगरसेवक व गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक व पक्षनेते विनोद मिश्रा आदींनी मार्गदर्शन केले.

पाणी कपात रद्द : मुंबईमध्ये जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १० टक्के पाणी शिल्लक असल्याने पालिकेने २७ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू केली. २९ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. आठच दिवसांत पाणीसाठा वाढू लागला. भाजपच्या माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळ पालिका आयुक्तांना भेटले. पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली. धरणात ५० टक्क्यांहून अधिक साठा जमा झाल्यावर पाणी कपात रद्द केली जाते. मात्र, आयुक्तांनी २५ टक्के पाणीसाठा असतानाच कपात रद्द केली आहे.


पोयसरनदीचे पाणी इमारतीमध्ये : पोयसर नदी येथे संरक्षण भिंत बांधल्याने बाजूला असलेल्या जीवन विद्या मिशन मार्गावरील हौसिंग सोसायटीमध्ये ३ ते ४ फूट पाणी शिरले होते. मुंबई महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही याची गंभीर नोंद घेतली जात नव्हती. त्यासाठी भाजपचे चारकोप कांदिवलीचे आमदार योगेश सागर यांनी पालिका आयुक्तांच्या बंगल्यावर आंदोलन करण्याचा तसेच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. याची दखल पालिका आयुक्तांनी घेऊन त्वरित अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना पाठवून समस्या काय आहे जाणून घेतले.

या निविदांनाही स्थगिती : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने अत्याधुनिक टनेल लाँड्री उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयात घोटाळा झाल्याचा संशय भाजप आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला होता. तरीही प्रशासनाकडून सारवासारव करीत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी हे १६० कोटींचे कंत्राट रद्द करावे आणि संपूर्ण निविदा प्रक्रियेची नि:पक्षपातीपणे तपासणी करीत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अमित साटम यांनी लेखी पत्राद्वारे महानगरपालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आले आहे. राणीच्या बागेत २९० करोड रुपये खर्च करून प्राण्यांसाठी पिंजरे बनवले जाणार होते. यात भ्रष्टाचार असल्याचे सांगत त्याविरोधात माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आले.


हे प्रकल्प भाजपच्या रडारवर : राज्यात सत्तांतरानंतर सरकारमध्ये असलेल्या भाजपने शिवसेनेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना लक्ष्य करण्याची तयारी सुरू केली आहे. पवई तलावाभोवतीचा सायकल ट्रॅक, आश्रय योजनांतर्गत कर्मचा-यांच्या घरांसाठीचा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आदी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना भाजपकडून लक्ष केले जाते आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला भाजपने सुरुवातीलाच तीव्र विरोध केला होता. राज्यात झालेल्या सत्तांतरांनंतर या प्रकल्पांना रोखण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.


मुंबईकरांच्या प्रश्नावर आक्रमक : आयुक्तांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. भाजपच्या मागण्या या मुंबईकरांच्या होत्या. १० टक्के पाणी कपातीच्या नावाने काही ठिकाणी पूर्ण पाणी कपात लागू केली. हा प्रकार निदर्शनास आणल्यावर आयुक्तांनी पाणी कपात रद्द केली. धोकादायक इमारती कोसळतात. त्यात लोकांचा मृत्यू होतो. त्यासाठी भाजपने धोरण बनवण्याची मागणी केली होती. भाजप गेले पाच वर्षे मुंबईकरांच्या प्रश्नावर आक्रमक राहिला आहे. आयुक्तांनी न्याय देण्याची भूमिका घेतली. मुंबईकरांच्या प्रश्नावर आयुक्त यापुढेही अशीच भूमिका घेतील, अशी आशा बाळगतो असे भाजपचे पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांना म्हटले आहे.


हे जनता ठरवेल : आता ते सत्तेत आले आहेत, त्यामुळे ते निर्णय घेतील. मात्र, निवडणुकीत मतदार ठरवणार आहेत, हे लक्षात घ्यावे. शिवसेनेने जे काही केले, ते शहरासाठी चांगले होते की नाही हे जनता ठरवेल. आदित्य ठाकरे यांच्या दूरदृष्टीने शहरासाठी जे आवश्यक होते त्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे, असे माजी महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.


हेही वाचा : MLA Bhaskar Jadhav questions PM : भाजपने रडीचा डाव खेळत आमदार फोडले-भास्कर जाधव

हेही वाचा : Raosaheb Danve : शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचा खळबळजनक दावा

हेही वाचा : CM Eknath Shinde Gadchiroli : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला गडचिरोलीतील पूरपरिस्थितीचा आढावा

Last Updated : Jul 12, 2022, 9:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.