ETV Bharat / city

पालिकेतील नाराजीनाट्य, ठिय्या आंदोलनावरून भाजपा-काँग्रेसची सत्ताधारी शिवसेनेवर टीका - Bmc news

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकावरून भाजप आणि काँग्रेसने सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. महापौरांनी आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. हा प्रकार दुर्दैवी असून सत्ताधारी विकलांग, महापौर हतबल आणि प्रशासन उद्दाम झाले असल्याची टीका भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

भाजपा-काँग्रेसची सत्ताधारी शिवसेनेवर टीका
भाजपा-काँग्रेसची सत्ताधारी शिवसेनेवर टीका
author img

By

Published : Oct 14, 2020, 6:02 PM IST

मुंबई - महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकांदरम्यान पालिका अधिकारी अनुपस्थित राहिले. अधिकारी अनुपस्थित असल्याने सभागृह नेत्यांनी पालिका आयुक्तांना फोन केला. मात्र आयुक्तांनी उद्धट वागणूक दिली, त्यामुळे महापौरांनी आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. हा प्रकार दुर्दैवी असून सत्ताधारी विकलांग, महापौर हतबल आणि प्रशासन उद्दाम झाले असल्याची टीका भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. तर पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वाचक राहिला नसल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.

दुर्दैवी चित्र मुंबईकरांच्या समोर आले आहे. महापौरांचा सभागृह नेत्यांचा अपमान याचा भाजपा निषेध करत आहे. महापौर सभरूच नेते नव्हे तर कोणत्याही लोकप्रतिनिधींचा अपमान होता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. मात्र आज जो पालिकेत प्रकार घडला आहे. त्यावरून सत्ताधारी पक्ष विकलांग आहे, महापौर हतबल आहेत आणि प्रशासन उद्दाम झाले असल्याचे चित्र समोर आले आहे, अशी टिका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

जो बुंद से गई वो हौद से नाही आती

महापौरांचा कर्मचारी वर्गही आज उपस्थित नव्हता. अधिकारी कर्मचारी का उपस्थित राहिले नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत चिटणीस विभागाने निवडणुकीसाठी या अधिकाऱ्यांना निमंत्र दिले होते का? याची चौकशी करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. महापौरांच्या अपमानाला जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. भविष्यात कोणत्याही लोकप्रतिनिधींचा अपमान होणार नाही याची पालिका प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे. आयुक्तांनी माफी मागितली असली तरी जो बुंद से गई वो हौद से नाही आती असे शिंदे यांनी म्हटले आहे. प्रशासन कशा प्रकारे वागत आहे हे भाजपा सत्ताधारी शिवसेनेच्या वारंवार निदर्शनास आणत आहे. मात्र त्याकडे दुर्लसख केले जात असल्याने आजचा प्रकार घडल्याचे शिंदे म्हणाले.

महापालिका प्रशासन फक्त मंत्रालयाचे ऐकते

तर महापालिकेत प्रभाग समितीच्या निवडणुका होत्या. प्रभाग समित्यांना वैधानिकी दर्जा आहे. या बैठकांना सहाय्यक आयुक्त उपायुक्त आदी अधिकारी उपस्थित असतात. आज तसा प्रकार घडलेला नाही. यामुळे महापौरांना ठिय्या आंदोलन करावे लागले. याचे दुःख वाटतं आहे. पालिका प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा जो वचक राहिला पाहिजे तो वचक राहिलेला दिसत नाही. महापालिका प्रशासन फक्त मंत्रालयाचे ऐकत आहे पालिकेत कोणाला जुमानत नाही ही गंभीर बाब आहे. मुंबई महानगरपालिकेचे काही नियम आहेत, त्याप्रमाणे सर्व आयएएस अधिकाऱ्यांनी वागायला पाहिजे. जे काही आज घडले ते दुर्दैवी बाब आहे. महापौरांना ठिय्या आंदोलन करावे लागते हे शोभनीय नाही. आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना समाज द्यायला हवी असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.

नेमके काय आहे प्रकरण

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका आज (14 ऑक्टोबर) पार पडणार होत्या. सकाळी 10 वाजता ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी महापौर आणि नगरसेवक सकाळी 9.30 पासून हजर होते. पण या निवडणूक कामकाजासाठी सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी गैरहजर राहिले. संबंधित वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याने महापौर आक्रमक झाल्या. कर्मचारी गैरहजर राहिल्याने निवडणुका घ्यायच्या कशा? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. पालिकेचे अधिकारी वेळेचे बंधन पाळत नाही याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावं म्हणून सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आयुक्त इकबाल सिंह चहल यांना फोन केला असता, आयुक्त त्यांच्यावर भडकले. यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक सभागृह नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर भडकल्या आणि त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.

मुंबई - महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकांदरम्यान पालिका अधिकारी अनुपस्थित राहिले. अधिकारी अनुपस्थित असल्याने सभागृह नेत्यांनी पालिका आयुक्तांना फोन केला. मात्र आयुक्तांनी उद्धट वागणूक दिली, त्यामुळे महापौरांनी आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. हा प्रकार दुर्दैवी असून सत्ताधारी विकलांग, महापौर हतबल आणि प्रशासन उद्दाम झाले असल्याची टीका भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. तर पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वाचक राहिला नसल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.

दुर्दैवी चित्र मुंबईकरांच्या समोर आले आहे. महापौरांचा सभागृह नेत्यांचा अपमान याचा भाजपा निषेध करत आहे. महापौर सभरूच नेते नव्हे तर कोणत्याही लोकप्रतिनिधींचा अपमान होता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. मात्र आज जो पालिकेत प्रकार घडला आहे. त्यावरून सत्ताधारी पक्ष विकलांग आहे, महापौर हतबल आहेत आणि प्रशासन उद्दाम झाले असल्याचे चित्र समोर आले आहे, अशी टिका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

जो बुंद से गई वो हौद से नाही आती

महापौरांचा कर्मचारी वर्गही आज उपस्थित नव्हता. अधिकारी कर्मचारी का उपस्थित राहिले नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत चिटणीस विभागाने निवडणुकीसाठी या अधिकाऱ्यांना निमंत्र दिले होते का? याची चौकशी करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. महापौरांच्या अपमानाला जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. भविष्यात कोणत्याही लोकप्रतिनिधींचा अपमान होणार नाही याची पालिका प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे. आयुक्तांनी माफी मागितली असली तरी जो बुंद से गई वो हौद से नाही आती असे शिंदे यांनी म्हटले आहे. प्रशासन कशा प्रकारे वागत आहे हे भाजपा सत्ताधारी शिवसेनेच्या वारंवार निदर्शनास आणत आहे. मात्र त्याकडे दुर्लसख केले जात असल्याने आजचा प्रकार घडल्याचे शिंदे म्हणाले.

महापालिका प्रशासन फक्त मंत्रालयाचे ऐकते

तर महापालिकेत प्रभाग समितीच्या निवडणुका होत्या. प्रभाग समित्यांना वैधानिकी दर्जा आहे. या बैठकांना सहाय्यक आयुक्त उपायुक्त आदी अधिकारी उपस्थित असतात. आज तसा प्रकार घडलेला नाही. यामुळे महापौरांना ठिय्या आंदोलन करावे लागले. याचे दुःख वाटतं आहे. पालिका प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा जो वचक राहिला पाहिजे तो वचक राहिलेला दिसत नाही. महापालिका प्रशासन फक्त मंत्रालयाचे ऐकत आहे पालिकेत कोणाला जुमानत नाही ही गंभीर बाब आहे. मुंबई महानगरपालिकेचे काही नियम आहेत, त्याप्रमाणे सर्व आयएएस अधिकाऱ्यांनी वागायला पाहिजे. जे काही आज घडले ते दुर्दैवी बाब आहे. महापौरांना ठिय्या आंदोलन करावे लागते हे शोभनीय नाही. आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना समाज द्यायला हवी असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.

नेमके काय आहे प्रकरण

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका आज (14 ऑक्टोबर) पार पडणार होत्या. सकाळी 10 वाजता ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी महापौर आणि नगरसेवक सकाळी 9.30 पासून हजर होते. पण या निवडणूक कामकाजासाठी सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी गैरहजर राहिले. संबंधित वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याने महापौर आक्रमक झाल्या. कर्मचारी गैरहजर राहिल्याने निवडणुका घ्यायच्या कशा? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. पालिकेचे अधिकारी वेळेचे बंधन पाळत नाही याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावं म्हणून सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आयुक्त इकबाल सिंह चहल यांना फोन केला असता, आयुक्त त्यांच्यावर भडकले. यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक सभागृह नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर भडकल्या आणि त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.