ETV Bharat / city

Davos World Economic Forum : राज्यात परदेशी कंपन्यांची मोठी गुंतवणूक.. ६६ हजार नवे रोजगार निर्माण होणार

author img

By

Published : May 24, 2022, 7:59 AM IST

राज्यामध्ये परदेशी कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली ( Foreign Investment In Maharashtra ) आहे. या माध्यमातून सुमारे ६६ हजार नवे रोजगार निर्माण होणार आहेत. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत ( Davos World Economic Forum ) ही गुंतवणूक करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले.

Davos World Economic Forum
दावोस जागतिक आर्थिक परिषद

मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस याठिकाणी नुकतीच जागतिक आर्थिक परिषद पार ( Davos World Economic Forum ) पडली. या परिषदेत परदेशातील २३ कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले ( Foreign Investment In Maharashtra ) आहेत. यामाध्यमातून राज्यभरातील सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

दावोस येथील विविध सामंजस्य करारावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी.मलिकनेर आदी उपस्थित होते.

या विविध गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक ही सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान या देशांतील आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टील, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक आदी क्षेत्रांचा समावेश असल्याचेही देसाई म्हणाले.


हेही वाचा : Aditya Thackeray Criticized BJP : मी फालतू विषयांवर बोलत नाही - आदित्य ठाकरे

मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस याठिकाणी नुकतीच जागतिक आर्थिक परिषद पार ( Davos World Economic Forum ) पडली. या परिषदेत परदेशातील २३ कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले ( Foreign Investment In Maharashtra ) आहेत. यामाध्यमातून राज्यभरातील सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

दावोस येथील विविध सामंजस्य करारावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी.मलिकनेर आदी उपस्थित होते.

या विविध गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक ही सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान या देशांतील आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टील, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक आदी क्षेत्रांचा समावेश असल्याचेही देसाई म्हणाले.


हेही वाचा : Aditya Thackeray Criticized BJP : मी फालतू विषयांवर बोलत नाही - आदित्य ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.