ETV Bharat / city

कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग होणार सुरू? मुख्यमंत्र्यांचे शिक्षणविभागाला निर्देश - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावातील इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करता येतील का, याची शक्यता शिक्षण विभागाने तपासून पाहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत.

Chief Minister uddhav thackeray
Chief Minister uddhav thackeray
author img

By

Published : Jun 22, 2021, 8:18 PM IST

मुंबई - जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावातील इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करता येतील का, याची शक्यता शिक्षण विभागाने तपासून पाहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यात दहावी-बारावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोनामुक्त गावात दहावी बारावीचे वर्ग सुरू होणार ?

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यात ही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावांमधील दहावी तसेच बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत, त्या गावात दहावी- बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिली आहे.

अनाथ विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च शासन उचलणार -

कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

बारावीच्या मुल्यांकनाबाबत प्रस्ताव -

बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मुल्याकंन करताना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या बारावीच्या मुल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने इयत्ता दहावीसाठी मुल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करून बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मुल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुंबई - जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावातील इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करता येतील का, याची शक्यता शिक्षण विभागाने तपासून पाहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यात दहावी-बारावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोनामुक्त गावात दहावी बारावीचे वर्ग सुरू होणार ?

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यात ही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावांमधील दहावी तसेच बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत, त्या गावात दहावी- बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिली आहे.

अनाथ विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च शासन उचलणार -

कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

बारावीच्या मुल्यांकनाबाबत प्रस्ताव -

बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मुल्याकंन करताना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या बारावीच्या मुल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने इयत्ता दहावीसाठी मुल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करून बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मुल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.