ETV Bharat / city

Raj Thackeray Aurangabad Sabha : अखेर राज ठाकरेंची तोफ धडाडणार; औरंगाबादच्या सभेसाठी परवानगी

author img

By

Published : Apr 28, 2022, 8:43 PM IST

Updated : Apr 28, 2022, 10:22 PM IST

राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले होते. या सभेसाठी राज ठाकरे यांना अटी आणि शर्तींवर पोलिसांनी परवानगी दिली (Police Permission to Raj Thackeray Aurangabad Rally) आहे. संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागून आहे.

Raj Thackeray
राज ठाकरे

औरंगाबाद - राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले होते. या सभेसाठी राज ठाकरे यांना अटी आणि शर्तींवर पोलिसांनी परवानगी दिली (Police Permission to Raj Thackeray Aurangabad Rally) आहे. संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागून आहे. राज्यात काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे 1 मे रोजी होणारी सभा चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेला अयोध्येतून 2500 कार्यकर्ते येणार असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची धडाडणार तोफ - राज ठाकरे यांची 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला पोलिसांनी सुरुवातीला परवानगी दिली नव्हती. पण मनसे नेते बाळा नांदगावकर आणि इतर प्रमुख नेते औरंगाबादला गेले होते. मनसेच्या प्रमुख नेत्यांची पोलिसांसोबत बैठक झाली. अखेर या सभेला परवानगी मिळाली आहे.

हेही वाचा - Loudspeaker Controversy : 'कुठं योगी आणि कुठं भोगी', भोंग्यांचा मुद्द्यावरून राज्य सरकारवर मनसे आणि अमृता फडणवीसांची टीका

राज ठाकरेंनी मानले योगींचे आभार - राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या मागणीवरुन चांगलाच वाद पेटला आहे. आरोप प्रत्यारोपांसह कलगीतुरा पहायला मिळत आहे. यातच राज ठाकरे यांनी सरकारला 3 तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी बैठका घेत मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. मात्र, हा वाद शमलेला नाही, यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेथील मशिदीवरचे भोंगे उतरवले आहेत. या बद्दल राज ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.

सभेला अयोध्येतून येणार कार्यकर्ते - राज्यात काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे 1 मे रोजी होणारी सभा चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेला अयोध्येतून 2500 कार्यकर्ते येणार असून, ते सगळे आमच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.

राज ठाकरे यांच्या सभेसाठीचे नियम -
1. सदर जाहीर सभा दिनांक 01/05/2022 रोजी 16.30 ते 21.45 या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.

2. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.

3. सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहरा बाहेर प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावे. सभेला आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन ) पाकोंगसाटो निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पाकोग करण्याच्या सुचना द्याव्यात. सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रैली काढू नये. त्याच प्रमाणे श्री. राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असुन आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरुन परत जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढु नये.

4. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदोचा भंग करु नये.

5. अट क्र. 2.3.4 बाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरीकांना कळविण्याची जबाबदारी संयोजकांची राहील, सदर कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरुन निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांची शहर / गावांना अनुसरून संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग, येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहीती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक सिटीचांक यांचे कडे द्यावी.

7. सभा स्थानाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा 15000 इतकी असल्यामुळे त्याठिकाणी 15000 पेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकलो, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जवाबदार धरले जाईल,

8. सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी निर्देशोत केलेल्या ठिकाणी मजबुत बॅरीकेटस उभारावे. सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरीकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी (Frisking) करण्याचा अधिकार पोलीसांना राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी.

9. सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा परंपरा या वरून कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही अगर त्याविरुध्द चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.

10. सभेसाठी वापरण्यात येणाचा ध्वनिक्षेपका बाबत मा. सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुण ( नियंत्रण व नियमन) नियम 2000 नुसार परिशिष्ट नियम 3 (1), 4 (1) अन्वये आवाजाची मर्यादा असावी. वरील अटींचा भंग केल्यास पर्यावरण (सरंक्षण) कायदा 1986 च्या कलम 15 अन्वये 5 वर्ष इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची आणि रु. एक लाख फक्त इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

11. सदर कार्यक्रमा दरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अॅम्बुलन्स, दवाखाना, मेडीकल, विजपुरवठा, पाणीपुरवठा, दळव-वळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.

12. सभेच्या दिवशी वाहतुक नियमनासाठी या कार्यालया कडुन काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वयेची अधिसुचना सर्व संयोजक, वक्ते व सभेला येणाऱ्या नागरीकांना बंधनकारक राहील.

13. सभेसाठी येणाऱ्या महिला व पुरुपासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहची व्यवस्था करावी.

14. सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थीतीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही विघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची) व्यवस्था अगोदरच करावी.

15. सदर कार्यक्रमा दरम्यान मिठाई व अन्नदान वाटप होत असल्यास अन्न व मिठाईतुन कोणासही विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

16. हा कार्यक्रम सुव्यवस्थीतपणे पार पाडण्यासाठी आपणास घालुन दिलेल्या उपरोक्त अटींचे व शर्तीचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमाचे सर्व संयोजक व वक्ते यांच्यावर प्रचलित विधी, उपविधी व नियमानुसार कारवाई केली जाईल व अशा कारवाई दरम्यान ही नोटीस मा. न्यायालयात पुरावा म्हणुन वापरली जाईल याची नोंद घ्यावी. जा.क्र. विशा- 5/आदेश/आ. बाद/ 2022-2575 औरंगाबाद शहर दिनांक 22/04/2022 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 (1) (3) अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाला अनुसरून ही परवानगी देण्यात येत

हेही वाचा - Raj Thackeray Aurangabad Rally : 'राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला अयोध्येहून येणार अडीच हजार कार्यकर्ते'

औरंगाबाद - राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले होते. या सभेसाठी राज ठाकरे यांना अटी आणि शर्तींवर पोलिसांनी परवानगी दिली (Police Permission to Raj Thackeray Aurangabad Rally) आहे. संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागून आहे. राज्यात काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे 1 मे रोजी होणारी सभा चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेला अयोध्येतून 2500 कार्यकर्ते येणार असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची धडाडणार तोफ - राज ठाकरे यांची 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला पोलिसांनी सुरुवातीला परवानगी दिली नव्हती. पण मनसे नेते बाळा नांदगावकर आणि इतर प्रमुख नेते औरंगाबादला गेले होते. मनसेच्या प्रमुख नेत्यांची पोलिसांसोबत बैठक झाली. अखेर या सभेला परवानगी मिळाली आहे.

हेही वाचा - Loudspeaker Controversy : 'कुठं योगी आणि कुठं भोगी', भोंग्यांचा मुद्द्यावरून राज्य सरकारवर मनसे आणि अमृता फडणवीसांची टीका

राज ठाकरेंनी मानले योगींचे आभार - राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या मागणीवरुन चांगलाच वाद पेटला आहे. आरोप प्रत्यारोपांसह कलगीतुरा पहायला मिळत आहे. यातच राज ठाकरे यांनी सरकारला 3 तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी बैठका घेत मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. मात्र, हा वाद शमलेला नाही, यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेथील मशिदीवरचे भोंगे उतरवले आहेत. या बद्दल राज ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.

सभेला अयोध्येतून येणार कार्यकर्ते - राज्यात काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे 1 मे रोजी होणारी सभा चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेला अयोध्येतून 2500 कार्यकर्ते येणार असून, ते सगळे आमच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.

राज ठाकरे यांच्या सभेसाठीचे नियम -
1. सदर जाहीर सभा दिनांक 01/05/2022 रोजी 16.30 ते 21.45 या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.

2. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.

3. सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहरा बाहेर प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावे. सभेला आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन ) पाकोंगसाटो निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पाकोग करण्याच्या सुचना द्याव्यात. सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रैली काढू नये. त्याच प्रमाणे श्री. राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असुन आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरुन परत जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढु नये.

4. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदोचा भंग करु नये.

5. अट क्र. 2.3.4 बाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरीकांना कळविण्याची जबाबदारी संयोजकांची राहील, सदर कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरुन निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांची शहर / गावांना अनुसरून संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग, येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहीती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक सिटीचांक यांचे कडे द्यावी.

7. सभा स्थानाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा 15000 इतकी असल्यामुळे त्याठिकाणी 15000 पेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकलो, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जवाबदार धरले जाईल,

8. सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी निर्देशोत केलेल्या ठिकाणी मजबुत बॅरीकेटस उभारावे. सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरीकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी (Frisking) करण्याचा अधिकार पोलीसांना राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी.

9. सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा परंपरा या वरून कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही अगर त्याविरुध्द चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.

10. सभेसाठी वापरण्यात येणाचा ध्वनिक्षेपका बाबत मा. सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुण ( नियंत्रण व नियमन) नियम 2000 नुसार परिशिष्ट नियम 3 (1), 4 (1) अन्वये आवाजाची मर्यादा असावी. वरील अटींचा भंग केल्यास पर्यावरण (सरंक्षण) कायदा 1986 च्या कलम 15 अन्वये 5 वर्ष इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची आणि रु. एक लाख फक्त इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

11. सदर कार्यक्रमा दरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अॅम्बुलन्स, दवाखाना, मेडीकल, विजपुरवठा, पाणीपुरवठा, दळव-वळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.

12. सभेच्या दिवशी वाहतुक नियमनासाठी या कार्यालया कडुन काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वयेची अधिसुचना सर्व संयोजक, वक्ते व सभेला येणाऱ्या नागरीकांना बंधनकारक राहील.

13. सभेसाठी येणाऱ्या महिला व पुरुपासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहची व्यवस्था करावी.

14. सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थीतीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही विघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची) व्यवस्था अगोदरच करावी.

15. सदर कार्यक्रमा दरम्यान मिठाई व अन्नदान वाटप होत असल्यास अन्न व मिठाईतुन कोणासही विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

16. हा कार्यक्रम सुव्यवस्थीतपणे पार पाडण्यासाठी आपणास घालुन दिलेल्या उपरोक्त अटींचे व शर्तीचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमाचे सर्व संयोजक व वक्ते यांच्यावर प्रचलित विधी, उपविधी व नियमानुसार कारवाई केली जाईल व अशा कारवाई दरम्यान ही नोटीस मा. न्यायालयात पुरावा म्हणुन वापरली जाईल याची नोंद घ्यावी. जा.क्र. विशा- 5/आदेश/आ. बाद/ 2022-2575 औरंगाबाद शहर दिनांक 22/04/2022 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 (1) (3) अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाला अनुसरून ही परवानगी देण्यात येत

हेही वाचा - Raj Thackeray Aurangabad Rally : 'राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला अयोध्येहून येणार अडीच हजार कार्यकर्ते'

Last Updated : Apr 28, 2022, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.