ETV Bharat / city

शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत कमी - मकरंद अनासपुरे

author img

By

Published : Nov 21, 2019, 7:17 PM IST

शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत कमी असल्याचे मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली. राज्यात ओला दुष्काळ पडला असून शेतकऱयांची अवस्था बिकट झाली आहे.

मकरंद अनासपुरे

औरंगाबाद - शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अल्प असल्याचे मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले आहे. राज्यात ओला दुष्काळ पडला असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. लवकरच सरकार स्थापन होईल आणि शेतकऱ्यांना मदत मिळेल, असा विश्वास मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला.

मकरंद अनासपुरे - ज्येष्ठ अभिनेते

हेही वाचा - साध्वी प्रज्ञांकडे तारक मारक अस्त्र; म्हणून त्यांची संरक्षण समितीवर निवड

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी आमच्यापरीने कामं करत आहोत. शेतकऱ्यांना मदत तातडीने देण्याचे काम प्रशासनाच आहे. त्यांनी मदत केल्यास शेतकऱ्यांना मदत होईल, असे देखील मकरंद अनासपुरे यांनी औरंगाबादेत सांगितले.

'नाम'ने पश्चिम महाराष्ट्रात 500 कुटुंबासाठी काम सुरु केले आहे. नाम सारख्या अनेक संस्था पुढे आल्या आहेत. शासकांची जबाबदारी असते. त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले तर शेतकऱ्यांच्या समस्या दूर होऊ शकतात. त्यामुळे शासनाने तसे निर्णय घेतले पाहिजे. आज हेक्टरी आठ हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही मदत खूप कमी आहे. अनेक द्राक्षे बागायत शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे केलेला खर्च पाहता ही मदत खूपच कमी आहे. शासनाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता तातडीने मोठी मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.

राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजारांची मदत जाहीर केली. त्या मदतीवर अनेकांनी टीका केली. मात्र, लवकरच सरकार स्थापन होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अशा मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद - शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अल्प असल्याचे मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले आहे. राज्यात ओला दुष्काळ पडला असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. लवकरच सरकार स्थापन होईल आणि शेतकऱ्यांना मदत मिळेल, असा विश्वास मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला.

मकरंद अनासपुरे - ज्येष्ठ अभिनेते

हेही वाचा - साध्वी प्रज्ञांकडे तारक मारक अस्त्र; म्हणून त्यांची संरक्षण समितीवर निवड

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी आमच्यापरीने कामं करत आहोत. शेतकऱ्यांना मदत तातडीने देण्याचे काम प्रशासनाच आहे. त्यांनी मदत केल्यास शेतकऱ्यांना मदत होईल, असे देखील मकरंद अनासपुरे यांनी औरंगाबादेत सांगितले.

'नाम'ने पश्चिम महाराष्ट्रात 500 कुटुंबासाठी काम सुरु केले आहे. नाम सारख्या अनेक संस्था पुढे आल्या आहेत. शासकांची जबाबदारी असते. त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले तर शेतकऱ्यांच्या समस्या दूर होऊ शकतात. त्यामुळे शासनाने तसे निर्णय घेतले पाहिजे. आज हेक्टरी आठ हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही मदत खूप कमी आहे. अनेक द्राक्षे बागायत शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे केलेला खर्च पाहता ही मदत खूपच कमी आहे. शासनाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता तातडीने मोठी मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.

राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजारांची मदत जाहीर केली. त्या मदतीवर अनेकांनी टीका केली. मात्र, लवकरच सरकार स्थापन होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अशा मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.

Intro:शेतकर्यांसाठी जाहिर केलेली मदत कमी असल्याच मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केल. राज्यात ओला दुष्काळ पडला असून शेतकर्यांची अवस्था बिकट झाली आहे. लवकरच सरकार स्थापन होइल आणि शेतकर्याना मदत मिळेल असा विश्वास मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला. Body:राज्यात परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाम फ़ौंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी आमच्या परीने काम करत आहोत. शेत्कार्याना मदत तातडीने देण्याच काम प्रशासनाच आहे. त्यानी मदत केल्यास शेतकऱ्यांना मदत होईल अस देखील मकरंद अनासपुरे यांनी औरंगाबादेत सांगितलं. Conclusion:नाम ने पच्छिम महाराष्ट्रात पाचशे कुटुंबासाठी काम सुरु केल आहे. नाम सारख्या अनेक संस्था पुढे आल्या आहेत. शासकांची जबाबदारी असते. त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले तर शेतकऱ्यांच्या समस्या दूर होऊ शकते. त्यामुळे शासनाने तसे निर्णय घेतले पाहिजे. आज हेक्टरी आठ हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र हि मदत खूप कमी आहे. अनेक द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना मोठ नुकसान झाल आहे केलेला खर्च पाहता हि मदत खूपच कमी आहे. शासनाने शेतकऱ्यांच झालेले नुकसान पाहता तातडीने मोठी मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे अस मत जेष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केल. राज्यातराष्ट्रपती राजवट असल्याने राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी आठहजारांची मदत जाहीर केली. त्या मदतीवर अनेकांनी टीका केली. मात्र लवकरच सरकारस्थापन होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अशा मकरंद अनासपुरे यांनी व्यक्तकेली.  
byte - मकरंद अनासपुरे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.