ETV Bharat / city

देशात दंगली घडवून भाजपाला 2024ची निवडणूक लढवायची आहे - संजय राऊत

देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. फक्त औरंगाबादेतच नाहीतर संपूर्ण देशात महागाईची परवड बसतेय, त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात निषेध म्हणून विराट मोर्चाचे आयोजन औरंगाबादमध्ये केले आहे अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. तर देशात सर्वच ठिकाणी अशांतता अस्थिरता निर्माण होऊन त्यातून 2024 च्या निवडणुकांमध्ये भाजपाला उतरायचे आहे असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केला आहे.

author img

By

Published : Nov 13, 2021, 3:37 AM IST

Updated : Nov 13, 2021, 4:02 AM IST

shivsena MP Sanjay Raut
संजय राऊत

औरंगाबाद - त्रिपुरामध्ये (Tripura Violence) झालेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात दगडफेक करण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रात सर्व समाजांच्या विषयी सद्भावना असलेले सरकार राज्यात आहे. कायदा सुव्यवस्थेला असे संकट निर्माण करून काय सिद्ध करतात. त्रिपुरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आम्हाला चिंता आहे. राज्यात शांतता असावी अशी आमची भूमिका आहे. जे काही घडतंय ते त्याच्या ठिणग्या महाराष्ट्रात उडू नये. या प्रकरणात भाजपाने घेतलेली भूमिकेमुळे असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे देशात सर्वच ठिकाणी अशांतता अस्थिरता निर्माण होऊन त्यातून 2024 च्या निवडणुकांमध्ये भाजपाला उतरायचा आहे असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केला आहे.

औरंगाबादेत केंद्राविरोधात विराट मोर्चा -

केंद्र सरकारच्या विरोधात निषेध म्हणून विराट मोर्चाचे आयोजन औरंगाबादमध्ये केले आहे अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. फक्त औरंगाबादमध्येच नाही तर देशभरात महागाईची परवड बसत आहे. मात्र कोणीही आवाज उठवायला तयार नाही. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रात आंदोलन केले हा मोठा विनोद आहे. महागाईच्या निर्मात्यांनी महागाई विरोधात आंदोलन करावे हे आश्चर्य आहे. मात्र औरंगाबादमध्ये होणारे आंदोलन मराठवाड्यातून महागाई बाबत आक्रोश राज्यकर्त्यांनी पर्यंत पोहोचणार आहे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

एसटी प्रश्न सुटेल -

राज्याचे मुख्यमंत्री दोन दिवसात बरे होऊन परत येतील. संपातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याची इच्छा आहे. त्याचा संदेश संघटनांनी आम्हाला पोहोचला आहे. त्यामुळे एसटीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. भाजपा आंदोलनात उतरली आहे, मात्र भाजपा नंतर त्यांचे कपडे उतरतील अशी परिस्थिती आहे. हे राज्य आपले आहे आणि राज्य मोडून काढण्यासाठी ते उतरत आहेत. मात्र जनता त्यांना मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. कामगारांबाबत सर्वांना सहानुभूती आहे. शिवसेनेचा जन्म हा कामगारांच्या आंदोलनातून झालेला आहे. त्यामुळे कामगारांची चळवळ, आंदोलन आणि प्रश्न पण मोडून पाडावे असे शिवसेनेला कधीच वाटणार नाही. राज्याची परिस्थिती पाहायला पाहिजे, काही कायदेशीर अडचणी आहे, त्याकडेही पाहिल पाहिजे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा - Tripura Violence : अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा; गृहमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन

औरंगाबाद - त्रिपुरामध्ये (Tripura Violence) झालेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात दगडफेक करण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रात सर्व समाजांच्या विषयी सद्भावना असलेले सरकार राज्यात आहे. कायदा सुव्यवस्थेला असे संकट निर्माण करून काय सिद्ध करतात. त्रिपुरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आम्हाला चिंता आहे. राज्यात शांतता असावी अशी आमची भूमिका आहे. जे काही घडतंय ते त्याच्या ठिणग्या महाराष्ट्रात उडू नये. या प्रकरणात भाजपाने घेतलेली भूमिकेमुळे असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे देशात सर्वच ठिकाणी अशांतता अस्थिरता निर्माण होऊन त्यातून 2024 च्या निवडणुकांमध्ये भाजपाला उतरायचा आहे असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केला आहे.

औरंगाबादेत केंद्राविरोधात विराट मोर्चा -

केंद्र सरकारच्या विरोधात निषेध म्हणून विराट मोर्चाचे आयोजन औरंगाबादमध्ये केले आहे अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. फक्त औरंगाबादमध्येच नाही तर देशभरात महागाईची परवड बसत आहे. मात्र कोणीही आवाज उठवायला तयार नाही. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रात आंदोलन केले हा मोठा विनोद आहे. महागाईच्या निर्मात्यांनी महागाई विरोधात आंदोलन करावे हे आश्चर्य आहे. मात्र औरंगाबादमध्ये होणारे आंदोलन मराठवाड्यातून महागाई बाबत आक्रोश राज्यकर्त्यांनी पर्यंत पोहोचणार आहे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

एसटी प्रश्न सुटेल -

राज्याचे मुख्यमंत्री दोन दिवसात बरे होऊन परत येतील. संपातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याची इच्छा आहे. त्याचा संदेश संघटनांनी आम्हाला पोहोचला आहे. त्यामुळे एसटीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. भाजपा आंदोलनात उतरली आहे, मात्र भाजपा नंतर त्यांचे कपडे उतरतील अशी परिस्थिती आहे. हे राज्य आपले आहे आणि राज्य मोडून काढण्यासाठी ते उतरत आहेत. मात्र जनता त्यांना मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. कामगारांबाबत सर्वांना सहानुभूती आहे. शिवसेनेचा जन्म हा कामगारांच्या आंदोलनातून झालेला आहे. त्यामुळे कामगारांची चळवळ, आंदोलन आणि प्रश्न पण मोडून पाडावे असे शिवसेनेला कधीच वाटणार नाही. राज्याची परिस्थिती पाहायला पाहिजे, काही कायदेशीर अडचणी आहे, त्याकडेही पाहिल पाहिजे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा - Tripura Violence : अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा; गृहमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन

Last Updated : Nov 13, 2021, 4:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.