ETV Bharat / business

Budget 2021: निर्मला सीतारामण यांनी बंगालच्या या कविची ही कविता वाचली

author img

By

Published : Feb 1, 2021, 2:05 PM IST

Updated : Feb 1, 2021, 3:07 PM IST

बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी शेरो-शायरीची परंपरा कायम ठेवत रवींद्रनाथ टागोरांची कविता वाचली. "विश्वास वह पक्षी है जो प्रकाश को महसूस करता है और जब भोर अंधेरा होता है तो गाता है." असे या कवितेचे बोल आहेत.

Nirmala Sitharaman presents Union Budget 2021, quotes Rabindranath Tagore
Nirmala Sitharaman presents Union Budget 2021, quotes Rabindranath Tagore

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत तिसरा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सभागृहातील विरोधी सदस्यांनी गदारोळ सुरू केला. गदारोळ असतानाही सीतारमण यांनी भाषण वाचण्यास सुरवात केली. यावेळी त्यांनी शेरो-शायरीची परंपरा कायम ठेवत रवींद्रनाथ टागोरांची कविता वाचली.

बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी कविता वाचली

'मी रवींद्रनाथ टागोर यांच्या एका ओळीचा उल्लेख करते, असे त्या म्हणाल्या. 'Faith is the bird that feels the light and sings when the dawn is still dark." अर्थात "विश्वास एक असा पक्षी आहे, जो पहाटेच्या अंधकारातही प्रकाश अनुभवतो आणि गातो, असे या कवितेचे बोल आहेत. (विश्वास वह पक्षी है जो प्रकाश को महसूस करता है और जब भोर अंधेरा होता है तो गाता है) रविंद्रनाथ टागोर हे मुळचे बंगालचे होते आणि आगामी काळात बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.

कोरोना संकटकाळात केंद्र सरकारने गरिबांना मदत केली. कोरोना संकटाच्या वेळी लघु व मध्यम उद्योगांच्या सरकारने 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत एकूण 27.1 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. कोरोना विषाणूच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये अभूतपूर्व मंदी आली असूनही भारताने चांगली कामगिरी केली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे, असे त्या म्हणाल्या.

देशातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जल जीवन मिशन योजनेसाठी 2 लाख 87 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसे आरोग्य विभागासाठी या अर्थसंकल्पात पुढील सहा वर्षांसाठी दोन लाख 23 हजार 846 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर कोविड लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.

'वही खात्या'ऐवजी 'टॅब' -

यावर्षी पहिल्यांदाच अर्थसंकल्प पेपरलेस पद्धतीने सादर झाला आहे. त्यामुळे दरवर्षी ज्या वही खात्यातून अर्थसंकल्प वाचला जातो, त्याऐवजी सीतारमण यांच्या हातात एक टॅब्लेट दिसून आला. तसेच निर्मला सीतारमण यांनी 'युनियन बजेट मोबाईल अ‌ॅप'ही लॉंच करण्यात आले आहे. सर्व खासदारांना आणि जनतेलाही अर्थसंकल्पातील सर्व बाबी सहजरित्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे अ‌ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‌ॅपमध्ये अर्थसंकल्पातील सर्व गोष्टी उपलब्ध असतील. यामध्ये अ‌ॅनुअल फायनान्शिअल स्टेटमेंट (अर्थसंकल्प), डिमांड फॉर ग्रँट्स (डीजी) आणि फायनान्स बिल उपलब्ध असेल.

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत तिसरा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सभागृहातील विरोधी सदस्यांनी गदारोळ सुरू केला. गदारोळ असतानाही सीतारमण यांनी भाषण वाचण्यास सुरवात केली. यावेळी त्यांनी शेरो-शायरीची परंपरा कायम ठेवत रवींद्रनाथ टागोरांची कविता वाचली.

बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी कविता वाचली

'मी रवींद्रनाथ टागोर यांच्या एका ओळीचा उल्लेख करते, असे त्या म्हणाल्या. 'Faith is the bird that feels the light and sings when the dawn is still dark." अर्थात "विश्वास एक असा पक्षी आहे, जो पहाटेच्या अंधकारातही प्रकाश अनुभवतो आणि गातो, असे या कवितेचे बोल आहेत. (विश्वास वह पक्षी है जो प्रकाश को महसूस करता है और जब भोर अंधेरा होता है तो गाता है) रविंद्रनाथ टागोर हे मुळचे बंगालचे होते आणि आगामी काळात बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.

कोरोना संकटकाळात केंद्र सरकारने गरिबांना मदत केली. कोरोना संकटाच्या वेळी लघु व मध्यम उद्योगांच्या सरकारने 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत एकूण 27.1 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. कोरोना विषाणूच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये अभूतपूर्व मंदी आली असूनही भारताने चांगली कामगिरी केली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे, असे त्या म्हणाल्या.

देशातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जल जीवन मिशन योजनेसाठी 2 लाख 87 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसे आरोग्य विभागासाठी या अर्थसंकल्पात पुढील सहा वर्षांसाठी दोन लाख 23 हजार 846 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर कोविड लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.

'वही खात्या'ऐवजी 'टॅब' -

यावर्षी पहिल्यांदाच अर्थसंकल्प पेपरलेस पद्धतीने सादर झाला आहे. त्यामुळे दरवर्षी ज्या वही खात्यातून अर्थसंकल्प वाचला जातो, त्याऐवजी सीतारमण यांच्या हातात एक टॅब्लेट दिसून आला. तसेच निर्मला सीतारमण यांनी 'युनियन बजेट मोबाईल अ‌ॅप'ही लॉंच करण्यात आले आहे. सर्व खासदारांना आणि जनतेलाही अर्थसंकल्पातील सर्व बाबी सहजरित्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे अ‌ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‌ॅपमध्ये अर्थसंकल्पातील सर्व गोष्टी उपलब्ध असतील. यामध्ये अ‌ॅनुअल फायनान्शिअल स्टेटमेंट (अर्थसंकल्प), डिमांड फॉर ग्रँट्स (डीजी) आणि फायनान्स बिल उपलब्ध असेल.

Last Updated : Feb 1, 2021, 3:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.