नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २१ लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज पाच टप्प्यांत जाहीर केले आहेत. कोरोनाचे संकट आणि टाळेबंदी या कारणांनी विविध क्षेत्रांचे नुकसान झाले आहे. आर्थिक पॅकेजमध्ये एमएमसएमई, कृषी, लघु उद्योग अशा विविध क्षेत्रांना दिलासा देणारे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर सलग पाच दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेत आर्थिक पॅकेज जाहीर केले आहेत.
असे आहे २१ लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज
- पहिल्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज हे ५ लाख ९४ हजार ५०० कोटी रुपये
- दुसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज ३ लाख १० हजार कोटी रुपये
- तिसऱ्या टप्प्यातील पॅकेज १.५ लाख कोटी रुपये
- चौथ्या व पाचव्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज ४८ हजार १०० कोटी रुपये
- एकूण पॅकेज २० लाख ९७ हजार ५३ कोटी रुपये -
- यामध्ये आरबीआयने जाहीर केलेल्या ८ लाख १ हजार ६०३ कोटींच्या पॅकेजचा समावेश आहे.
- पशुसंवर्धन
- शिक्षण
- लघु कुटीर उद्योग
- गरीब कल्याण योजना
- आण्विक ऊर्जा
- संरक्षण उत्पादन
- अंतराळ
- कृषी
- आरोग्य
- एमएसएमई
- कॉर्पोरेट प्रशासनात बदल