नवी दिल्ली - गेल्या सात वर्षात प्रथमच एप्रिल-जूनदरम्यान जीडीपीचा नीचांक नोंदविण्यात आला आहे. एप्रिल जूनदरम्यान ५ टक्के जीडीपी राहिला आहे. उत्पादन क्षेत्रामधून घटलेले उत्पादन व कृषी उत्पन्नामधील घट याचा परिणाम जीडीपीवर झाल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसून आले आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा २०१२-१३ मध्यी एप्रिल-जूनदरम्यान ४.९ टक्के जीडीपी नोंदविण्यात आला होता. तर आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये ८ टक्के जीडीपीची नोंद झाली होती.
आरबीआयने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जीडीपी हा ७ टक्के राहिल असा अंदाज जूनच्या तिमाहीदरम्यान वर्तविला होता. यामध्ये बदल करून जीडीपी हा ६.९ टक्के राहिल, असा अंदाज वर्तविला आहे.
![जीडीपी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4289065_gdp.jpg)
विकास दर उंचावण्यासाठी मागणी वाढविण्यावर भर द्यावा, असे आरबीआयने अधोरेखित केले होते.