ETV Bharat / briefs

जळगावात रस्त्यांची दुर्दशा; खड्ड्यांमध्ये कमळाची फुले सोडून शिवसेनेचे आंदोलन

रस्त्यांची दुर्दशा झालेली असताना महापालिका प्रशासन मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. याच विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी शिवसेनेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कमळाची कृत्रिम फुले सोडून शिवसेनेने महापालिका प्रशासन तसेच सत्ताधारी भाजपचा निषेध नोंदवला.

author img

By

Published : Aug 8, 2020, 4:16 PM IST

शिवसेना आंदोलन
शिवसेना आंदोलन

जळगाव - शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. पावसामुळे सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. खड्डेमय रस्त्यांवरून वाहन चालवताना खूप तारेवरची कसरत करावी लागते. अशी परिस्थिती असताना महापालिका प्रशासन मात्र, रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेतील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेच्या वतीने शनिवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कमळाची फुले सोडून महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला.

जळगाव शहरातील सर्वच रस्ते अतिशय खराब झाले आहेत. मध्यंतरी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे पाईप टाकण्यासाठी शहरासह प्रमुख उपनगरांमध्ये प्रमुख रस्त्यांसह गल्ली-बोळातील रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले होते. हे काम संथगतीने सुरू असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली होती. रस्त्यांवरील खड्डे, धूळ यामुळे जळगावकर नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल ओरड होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र, आता पावसामुळे शहरातील रस्त्यांचे पुन्हा एकदा तीनतेरा वाजले आहेत.

सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होऊन नागरिकांना दुखापत होत आहे. अनेक वाहन चालकांना पाठीचे, मानेचे तसेच मणक्याचे विकार जडत आहेत. यात भर म्हणजे, रस्त्यांवरून वाहन चालताना धूळ उडत असल्याने श्वसनाचे विकार देखील नागरिकांना जडत आहेत.

रस्त्यांची अशी दुर्दशा झालेली असताना महापालिका प्रशासन मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. याच विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी शिवसेनेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कमळाची आर्टिफिशियल फुले सोडून शिवसेनेने महापालिका प्रशासन तसेच सत्ताधारी भाजपचा निषेध नोंदवला.

अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार-

जळगावकरांनी एकहाती सत्ता देऊनही भाजपला शहराच्या विकासाचा विसर पडला आहे. वर्षभरात शहराचा विकास करण्याचे भाजपचे आश्वासन हवेत विरले आहे. विकास तर सोडा पण रस्ते, पाणी, स्वच्छता अशा मूलभूत सुविधा पुरवणे देखील भाजपला जमत नाहीये. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, नागरिकांना दररोज या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती येत्या 8 दिवसात झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिला.

जळगाव - शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. पावसामुळे सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. खड्डेमय रस्त्यांवरून वाहन चालवताना खूप तारेवरची कसरत करावी लागते. अशी परिस्थिती असताना महापालिका प्रशासन मात्र, रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेतील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेच्या वतीने शनिवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कमळाची फुले सोडून महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला.

जळगाव शहरातील सर्वच रस्ते अतिशय खराब झाले आहेत. मध्यंतरी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे पाईप टाकण्यासाठी शहरासह प्रमुख उपनगरांमध्ये प्रमुख रस्त्यांसह गल्ली-बोळातील रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले होते. हे काम संथगतीने सुरू असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली होती. रस्त्यांवरील खड्डे, धूळ यामुळे जळगावकर नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल ओरड होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र, आता पावसामुळे शहरातील रस्त्यांचे पुन्हा एकदा तीनतेरा वाजले आहेत.

सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होऊन नागरिकांना दुखापत होत आहे. अनेक वाहन चालकांना पाठीचे, मानेचे तसेच मणक्याचे विकार जडत आहेत. यात भर म्हणजे, रस्त्यांवरून वाहन चालताना धूळ उडत असल्याने श्वसनाचे विकार देखील नागरिकांना जडत आहेत.

रस्त्यांची अशी दुर्दशा झालेली असताना महापालिका प्रशासन मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. याच विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी शिवसेनेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कमळाची आर्टिफिशियल फुले सोडून शिवसेनेने महापालिका प्रशासन तसेच सत्ताधारी भाजपचा निषेध नोंदवला.

अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार-

जळगावकरांनी एकहाती सत्ता देऊनही भाजपला शहराच्या विकासाचा विसर पडला आहे. वर्षभरात शहराचा विकास करण्याचे भाजपचे आश्वासन हवेत विरले आहे. विकास तर सोडा पण रस्ते, पाणी, स्वच्छता अशा मूलभूत सुविधा पुरवणे देखील भाजपला जमत नाहीये. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, नागरिकांना दररोज या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती येत्या 8 दिवसात झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.