ETV Bharat / briefs

उल्हासनगरात लॉकडाऊन झुगारून 80 जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

author img

By

Published : Jun 24, 2020, 8:35 PM IST

या लग्न समारंभसाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी वर उल्लेख केलेल्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ulhasnagar police station
Ulhasnagar police station

ठाणे - कोरोनाचा प्रार्दुभाव असताना व लॉकडाऊन आणि कर्फ्यूचे सर्व नियम झुगारून उल्हासनगरच्या एका सभागृहात लग्न समारंभ पार पडल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या लग्न समारंभात जवळपास 70 ते 80 जण उपस्थित होते. या संदर्भात स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच कारवाई करून उल्हासनगर पोलीस ठाण्यात 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू पुरुषोत्तम नरसिंघानी, मोहनलाल पिरवानी (67) आणि नासिर शेख (42) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. उल्हासनगर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजारच्या वर गेली आहे. अनेक क्षेत्र कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. अशी परिस्थिती असताना उल्हासनगर - 1 या ठिकाणी हेमराज डेअरी जवळ असलेल्या पंचायत हॉल या ठिकाणी काल दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे, पोलीस नाईक बी.बी आव्हाड व पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली.

या लग्न समारंभसाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी वर उल्लेख केलेल्या 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नसमारंभात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एखादा कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या संदर्भात मनपाचे प्रभाग समिती 1 चे सहाय्यक आयुक्त अजय एडके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मनपातर्फे लग्न समारंभाला सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून फक्त 50 लोकांची उपस्थिती असणे बंधनकारक आहे. जर या लोकांमध्ये कोरोनाचे लक्षण असणारा किंवा हाय रिस्क रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले, तर उपस्थित असलेल्या लोकांचे स्वॅब टेस्ट, इतर वैद्यकीय चाचण्या, उपचार, विलगीकरण करण्यात येईल, असे एडके यांनी सांगितले.

ठाणे - कोरोनाचा प्रार्दुभाव असताना व लॉकडाऊन आणि कर्फ्यूचे सर्व नियम झुगारून उल्हासनगरच्या एका सभागृहात लग्न समारंभ पार पडल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या लग्न समारंभात जवळपास 70 ते 80 जण उपस्थित होते. या संदर्भात स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच कारवाई करून उल्हासनगर पोलीस ठाण्यात 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू पुरुषोत्तम नरसिंघानी, मोहनलाल पिरवानी (67) आणि नासिर शेख (42) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. उल्हासनगर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजारच्या वर गेली आहे. अनेक क्षेत्र कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. अशी परिस्थिती असताना उल्हासनगर - 1 या ठिकाणी हेमराज डेअरी जवळ असलेल्या पंचायत हॉल या ठिकाणी काल दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे, पोलीस नाईक बी.बी आव्हाड व पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली.

या लग्न समारंभसाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी वर उल्लेख केलेल्या 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नसमारंभात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एखादा कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या संदर्भात मनपाचे प्रभाग समिती 1 चे सहाय्यक आयुक्त अजय एडके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मनपातर्फे लग्न समारंभाला सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून फक्त 50 लोकांची उपस्थिती असणे बंधनकारक आहे. जर या लोकांमध्ये कोरोनाचे लक्षण असणारा किंवा हाय रिस्क रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले, तर उपस्थित असलेल्या लोकांचे स्वॅब टेस्ट, इतर वैद्यकीय चाचण्या, उपचार, विलगीकरण करण्यात येईल, असे एडके यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.