ETV Bharat / briefs

लॉकडाऊन काळात राज्यभरात पोलिसांची धडक कारवाई, आतापर्यंत 2 लाख 15 हजार गुन्हे दाखल

author img

By

Published : Jul 30, 2020, 7:39 PM IST

राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 2 लाख 15 हजार 900 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 824 जणांवर कारवाई केलेली आहे.

Maharashtra police crime
Maharashtra police crime

मुंबई- राज्यात कोरोना विषाणू संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले असून याचे व संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 2 लाख 15 हजार 900 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 824 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरातील 323 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी 883 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यातील आतापर्यंत 9 हजार 96 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 937 पोलीस अधिकारी, तर 8 हजार 159 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 1 हजार 912 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून ते उपचार घेत आहे. यात 207 पोलीस अधिकारी तर 1 हजार 705 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आतापर्यंत राज्यातील 7 हजार 84 पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून यामध्ये 722 पोलीस अधिकारी तर 6 हजार 362 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 100 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 8 पोलीस अधिकारी तसेच 92 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यात अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आलेली असून आतापर्यंत 32 हजार 310 आरोपींना अनधिकृत वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 94 हजार 102 वाहने जप्त केली असून तब्बल 17 कोटी 42 लाख 16 हजारांचा दंड वसूल केलेला आहे. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 86 पोलीस जखमी झाले आहेत, तसेच वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 56 घटना घडलेल्या आहेत.

मुंबई- राज्यात कोरोना विषाणू संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले असून याचे व संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 2 लाख 15 हजार 900 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 824 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरातील 323 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी 883 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यातील आतापर्यंत 9 हजार 96 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 937 पोलीस अधिकारी, तर 8 हजार 159 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 1 हजार 912 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून ते उपचार घेत आहे. यात 207 पोलीस अधिकारी तर 1 हजार 705 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आतापर्यंत राज्यातील 7 हजार 84 पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून यामध्ये 722 पोलीस अधिकारी तर 6 हजार 362 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 100 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 8 पोलीस अधिकारी तसेच 92 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यात अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आलेली असून आतापर्यंत 32 हजार 310 आरोपींना अनधिकृत वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 94 हजार 102 वाहने जप्त केली असून तब्बल 17 कोटी 42 लाख 16 हजारांचा दंड वसूल केलेला आहे. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 86 पोलीस जखमी झाले आहेत, तसेच वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 56 घटना घडलेल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.