ETV Bharat / bharat

One year of Railway Journey : ७६२ किलोमीटरचा प्रवास करण्याकरिता रेल्वेने घेतले वर्ष, गरिबांना मिळणारे धान्य वॅगनमध्ये सडले

author img

By

Published : May 27, 2022, 7:50 PM IST

प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ईटीव्ही इंडियाची टीम गुरुवारी रात्री येथे पोहोचली. रेल्वे कर्मचारी आणि स्टेशन मास्तर यांच्याशी बोलल्यानंतर 2021 मध्येच वॅगनमध्ये तांदूळ भरल्याचे दिसून आले. मात्र तांत्रिक कारणामुळे ही वॅगन येथे पोहोचू शकली नाही. वॅगनमध्ये एक हजार पोती आहे. त्यामध्ये दोनशे ते तीनशे पोती धान्य खराब झाल्याचेही ( three hundred bags of grain spoiled ) आढळून आले.

छत्तीसगडहून गिरिडीहला पोहोचले
छत्तीसगडहून गिरिडीहला पोहोचले

गिरिडीह ( छत्तीसगड ) - न्यू गिरिडीह रेल्वे स्थानकाच्या फलाटावर ( New Giridih railway station ) तांदळाची एक नव्हे तर एक हजार पोती पडून आहेत. हे धान्य अवघ्या दहा दिवसांपूर्वी छत्तीसगडहून गिरिडीहला पोहोचले आहे. तुम्हाला वाटेल की यात मोठे काय आहे. पण हे प्रकरण जाणून घेतले तर धक्का बसेल. कारण, आपल्या रेल्वे यंत्रणेला छत्तीसगड ते गिरिडीह असा ७६२ किलोमीटरचा प्रवास ( 762 km from Chhattisgarh to Giridih ) करण्यासाठी एक वर्ष ( one year for train reach Giridih ) लागले. सरकारी यंत्रणेच्या या दुर्लक्षामुळे गोरगरिबांना मिळणारे धान्य आता सडले आहे.

2021 मध्येच तांदूळ रेल्वेत भरला होता: या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ईटीव्ही इंडियाची टीम गुरुवारी रात्री येथे पोहोचली. रेल्वे कर्मचारी आणि स्टेशन मास्तर यांच्याशी बोलल्यानंतर 2021 मध्येच वॅगनमध्ये तांदूळ भरल्याचे दिसून आले. मात्र तांत्रिक कारणामुळे ही वॅगन येथे पोहोचू शकली नाही. वॅगनमध्ये एक हजार पोती आहे. त्यामध्ये दोनशे ते तीनशे पोती धान्य खराब झाल्याचेही ( three hundred bags of grain spoiled ) आढळून आले.

धान्य दाखविताना अधिकारी
धान्य दाखविताना अधिकारी

जुने धान्य कसे घ्यावे- या प्रकरणी एफसीआय ( Food Corporation of India ) गोदामाच्या सेन्सरचे संजय शर्मा यांच्याशी बोलणे झाले. वॅगनमध्ये आलेला तांदूळ दीड वर्षांचा असून तो खराब झाल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत त्यांनी हे धान्यही घेतले नाही. कदाचित दीड वर्षांपूर्वीच धान्य पाठवायला आले असते. पण काही कारणास्तव वेळेवर पोहोचू शकले नाही, असे सांगितले.

झाकलेले धान्य
झाकलेले धान्य

टीम तपास करणार- स्टेशन मास्तर - या प्रकरणी स्टेशन मास्तर पंकज कुमार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, १७ मे रोजी लोखंडी रेकसोबत एफसीआयची धान्याने भरलेली वॅगनही आली होती. एफसीआय सेन्सरने धान्य खराब असल्याने घेतले नाही. तेव्हापासून रॅक पॉइंटवरच धान्य पडून आहे. ३१ मे रोजी रेल्वेचे अधिकारी पोहोचतील. त्यानंतर पुढील तपास केला जाईल, असे स्टेशन मास्तरने सांगितले.

७६२ किलोमीटरचा प्रवास करण्याकरिता रेल्वेने घेतले वर्ष

हे धान्य एफसीआयचे (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) आहे- हे धान्य मोकळ्या आकाशाखाली पडून आहे. संरक्षणासाठी या गोण्यांवर तळवट टाकण्यात आले आहे. असे असतानाही पावसाचे पाणी या पोत्यांमध्ये शिरत आहे. तांदूळ खूप जुना आणि मोठ्या प्रमाणात कुजला आहे. हे धान्य पाहिल्यावर स्पष्ट होते. या प्रकरणाची चौकशी केली असता 17 मे रोजी धान्याची एकच वॅगन छत्तीसगडहून न्यू गिरिडीह रेल्वे स्थानकावर आल्याचे स्पष्ट झाले. हे धान्य गिरिडीह येथील एफसीआयच्या गोदामात जाणार होते.

धान्य आल्यानंतर एफसीआयचे कर्मचारी, सेन्सर, धान्य तपासण्यासाठी आलेले वॅगन उघडले असता अनेक पोती धान्य सडल्याचे दिसून आले. सर्व धान्य वॅगनमधून काढून रॅक पॉईंटवर ठेवण्यात आले. रॅक पॉइंटवर हजारो पोती धान्य ठेवल्यानंतर एफसीआय आणि गोदामातील सेन्सरने धान्य स्वीकारण्यास नकार दिला. हे धान्य एक वर्ष जुने असून सडल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून धान्य खुल्या आकाशाखाली आहे.

यादरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले की, वॅगन उघडल्यानंतर एफसीआयच्या लोकांनी धान्य तपासले आणि सांगितले की, धान्य जुने असून ते खराब होत आहे. यानंतर धान्याची सर्व पोती उतरवली असून, त्यानंतरच ती घेतली जाईल, असे सांगण्यात आले. कामगारांचे म्हणणे आहे की सर्व पोती उतरवण्यात आली. तेव्हा सेन्सर आणि एफसीआयशी संबंधित लोकांनी थेट धान्य घेण्यास नकार दिला.

दोषींवर कारवाई करावी- शिवनाथ - महेशलुंडी पंचायतीचे नवनिर्वाचित प्रमुख शिवनाथ साव म्हणाले की, वर्षभरापूर्वी धान्य भरले होते. तर ते गोदामात का पोहोचवले नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे. तसेच वॅगन उघडल्यानंतरच तांदूळ जुना असून खराब झाल्याचे समजल्यानंतर एफसीआयच्या लोकांनी कोणत्या परिस्थितीत वॅगन रिकामी करून सर्व धान्य खुल्या आकाशाखाली ठेवले, याची चौकशी करून कारवाई करावी.

हेही वाचा-Depressed man sinks BMW : आईच्या मृत्यूने नैराश्यावस्था, तरुणाने नदीत बुडविली बीएमडब्ल्यू कार

हेही वाचा-Beer From Urine : लघवीपासून तयार होत आहे बिअर; तुम्हाला घेऊन पहायची आहे का ?

हेही वाचा-First Woman Combat Aviator : देशातील पहिल्या महिला लढाऊ विमानचालक अभिलाषा बडक, वाचा कशी घेतली भरारी

गिरिडीह ( छत्तीसगड ) - न्यू गिरिडीह रेल्वे स्थानकाच्या फलाटावर ( New Giridih railway station ) तांदळाची एक नव्हे तर एक हजार पोती पडून आहेत. हे धान्य अवघ्या दहा दिवसांपूर्वी छत्तीसगडहून गिरिडीहला पोहोचले आहे. तुम्हाला वाटेल की यात मोठे काय आहे. पण हे प्रकरण जाणून घेतले तर धक्का बसेल. कारण, आपल्या रेल्वे यंत्रणेला छत्तीसगड ते गिरिडीह असा ७६२ किलोमीटरचा प्रवास ( 762 km from Chhattisgarh to Giridih ) करण्यासाठी एक वर्ष ( one year for train reach Giridih ) लागले. सरकारी यंत्रणेच्या या दुर्लक्षामुळे गोरगरिबांना मिळणारे धान्य आता सडले आहे.

2021 मध्येच तांदूळ रेल्वेत भरला होता: या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ईटीव्ही इंडियाची टीम गुरुवारी रात्री येथे पोहोचली. रेल्वे कर्मचारी आणि स्टेशन मास्तर यांच्याशी बोलल्यानंतर 2021 मध्येच वॅगनमध्ये तांदूळ भरल्याचे दिसून आले. मात्र तांत्रिक कारणामुळे ही वॅगन येथे पोहोचू शकली नाही. वॅगनमध्ये एक हजार पोती आहे. त्यामध्ये दोनशे ते तीनशे पोती धान्य खराब झाल्याचेही ( three hundred bags of grain spoiled ) आढळून आले.

धान्य दाखविताना अधिकारी
धान्य दाखविताना अधिकारी

जुने धान्य कसे घ्यावे- या प्रकरणी एफसीआय ( Food Corporation of India ) गोदामाच्या सेन्सरचे संजय शर्मा यांच्याशी बोलणे झाले. वॅगनमध्ये आलेला तांदूळ दीड वर्षांचा असून तो खराब झाल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत त्यांनी हे धान्यही घेतले नाही. कदाचित दीड वर्षांपूर्वीच धान्य पाठवायला आले असते. पण काही कारणास्तव वेळेवर पोहोचू शकले नाही, असे सांगितले.

झाकलेले धान्य
झाकलेले धान्य

टीम तपास करणार- स्टेशन मास्तर - या प्रकरणी स्टेशन मास्तर पंकज कुमार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, १७ मे रोजी लोखंडी रेकसोबत एफसीआयची धान्याने भरलेली वॅगनही आली होती. एफसीआय सेन्सरने धान्य खराब असल्याने घेतले नाही. तेव्हापासून रॅक पॉइंटवरच धान्य पडून आहे. ३१ मे रोजी रेल्वेचे अधिकारी पोहोचतील. त्यानंतर पुढील तपास केला जाईल, असे स्टेशन मास्तरने सांगितले.

७६२ किलोमीटरचा प्रवास करण्याकरिता रेल्वेने घेतले वर्ष

हे धान्य एफसीआयचे (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) आहे- हे धान्य मोकळ्या आकाशाखाली पडून आहे. संरक्षणासाठी या गोण्यांवर तळवट टाकण्यात आले आहे. असे असतानाही पावसाचे पाणी या पोत्यांमध्ये शिरत आहे. तांदूळ खूप जुना आणि मोठ्या प्रमाणात कुजला आहे. हे धान्य पाहिल्यावर स्पष्ट होते. या प्रकरणाची चौकशी केली असता 17 मे रोजी धान्याची एकच वॅगन छत्तीसगडहून न्यू गिरिडीह रेल्वे स्थानकावर आल्याचे स्पष्ट झाले. हे धान्य गिरिडीह येथील एफसीआयच्या गोदामात जाणार होते.

धान्य आल्यानंतर एफसीआयचे कर्मचारी, सेन्सर, धान्य तपासण्यासाठी आलेले वॅगन उघडले असता अनेक पोती धान्य सडल्याचे दिसून आले. सर्व धान्य वॅगनमधून काढून रॅक पॉईंटवर ठेवण्यात आले. रॅक पॉइंटवर हजारो पोती धान्य ठेवल्यानंतर एफसीआय आणि गोदामातील सेन्सरने धान्य स्वीकारण्यास नकार दिला. हे धान्य एक वर्ष जुने असून सडल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून धान्य खुल्या आकाशाखाली आहे.

यादरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले की, वॅगन उघडल्यानंतर एफसीआयच्या लोकांनी धान्य तपासले आणि सांगितले की, धान्य जुने असून ते खराब होत आहे. यानंतर धान्याची सर्व पोती उतरवली असून, त्यानंतरच ती घेतली जाईल, असे सांगण्यात आले. कामगारांचे म्हणणे आहे की सर्व पोती उतरवण्यात आली. तेव्हा सेन्सर आणि एफसीआयशी संबंधित लोकांनी थेट धान्य घेण्यास नकार दिला.

दोषींवर कारवाई करावी- शिवनाथ - महेशलुंडी पंचायतीचे नवनिर्वाचित प्रमुख शिवनाथ साव म्हणाले की, वर्षभरापूर्वी धान्य भरले होते. तर ते गोदामात का पोहोचवले नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे. तसेच वॅगन उघडल्यानंतरच तांदूळ जुना असून खराब झाल्याचे समजल्यानंतर एफसीआयच्या लोकांनी कोणत्या परिस्थितीत वॅगन रिकामी करून सर्व धान्य खुल्या आकाशाखाली ठेवले, याची चौकशी करून कारवाई करावी.

हेही वाचा-Depressed man sinks BMW : आईच्या मृत्यूने नैराश्यावस्था, तरुणाने नदीत बुडविली बीएमडब्ल्यू कार

हेही वाचा-Beer From Urine : लघवीपासून तयार होत आहे बिअर; तुम्हाला घेऊन पहायची आहे का ?

हेही वाचा-First Woman Combat Aviator : देशातील पहिल्या महिला लढाऊ विमानचालक अभिलाषा बडक, वाचा कशी घेतली भरारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.