ETV Bharat / bharat

Halla Bol Rally: हल्ला बोल रॅलीतून राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात; वाचा सविस्तर

महागाईविरोधात रविवारी काँग्रेसच्या हल्लाबोल रॅलीत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आता सर्व रस्ते बंद झाले आहेत. (Halla Bol Rally) ते म्हणाले की, सरकार मला संसदेत बोलू देत नाही, माईक बंद करते. मोदी सरकार फक्त दोन उद्योगपतींसाठी काम करते असा आरोपही त्यांनी केला आहे.

author img

By

Published : Sep 4, 2022, 5:54 PM IST

राहुल गांधी हल्ला बोल रॅलीत बोलताना
राहुल गांधी हल्ला बोल रॅलीत बोलताना

नवी दिल्ली - दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसच्या महागाईविरोधातील हल्लाबोल रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. (Congress party Halla Bol rally) ते म्हणाले की यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीने चौकशी केली आहे. त्यांनी माझी 55 तास चौकशी केली, पण 5 वर्षे 55 तास चौकशी केली तरी मी घाबरणार नाही. असा घणाघात त्यांनी केला आहे.

हल्ला बोल रॅलीत राहुल गांधी बोलताना

भारताला कमकुवत केले - रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर महागाईविरोधात काँग्रेसची हल्लाबोल रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले. (Rahul Gandhi strongly criticized the Modi government) पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान द्वेष पसरवून भारताला कमकुवत करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हल्ला बोल रॅली
हल्ला बोल रॅली

मीडियाने देशातील जनतेला घाबरवले - आरएसएस-भाजप देशात फूट पाडून राज्य करत आहेत. गेल्या 8 वर्षांत कुणालाही फायदा झाला नाही. मीडियाने देशातील जनतेला घाबरवले. देशातील दोन उद्योगपतींनी द्वेष आणि भीतीचा फायदा घेतला. "तेल, विमानतळ, मोबाईल हे संपूर्ण क्षेत्र या दोन उद्योगपतींना दिले जात आहे. विमानतळ असो की सेल फोन असो की तेल याचा फायदा या दोन उद्योगपतींना होत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा - टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा पालघरमधील रस्ते अपघातात मृत्यू, सोबत असलेल्या व्यक्तीचाही मृत्यू

नवी दिल्ली - दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसच्या महागाईविरोधातील हल्लाबोल रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. (Congress party Halla Bol rally) ते म्हणाले की यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीने चौकशी केली आहे. त्यांनी माझी 55 तास चौकशी केली, पण 5 वर्षे 55 तास चौकशी केली तरी मी घाबरणार नाही. असा घणाघात त्यांनी केला आहे.

हल्ला बोल रॅलीत राहुल गांधी बोलताना

भारताला कमकुवत केले - रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर महागाईविरोधात काँग्रेसची हल्लाबोल रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले. (Rahul Gandhi strongly criticized the Modi government) पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान द्वेष पसरवून भारताला कमकुवत करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हल्ला बोल रॅली
हल्ला बोल रॅली

मीडियाने देशातील जनतेला घाबरवले - आरएसएस-भाजप देशात फूट पाडून राज्य करत आहेत. गेल्या 8 वर्षांत कुणालाही फायदा झाला नाही. मीडियाने देशातील जनतेला घाबरवले. देशातील दोन उद्योगपतींनी द्वेष आणि भीतीचा फायदा घेतला. "तेल, विमानतळ, मोबाईल हे संपूर्ण क्षेत्र या दोन उद्योगपतींना दिले जात आहे. विमानतळ असो की सेल फोन असो की तेल याचा फायदा या दोन उद्योगपतींना होत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा - टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा पालघरमधील रस्ते अपघातात मृत्यू, सोबत असलेल्या व्यक्तीचाही मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.