ETV Bharat / bharat

ACCIDENT IN SAMBALPUR : ओडिशात जीप कालव्यात पडून 7 ठार 4 जखमी, लग्न करुन परतताना काळाचा घाला - संबलपूरमध्ये वाहन कोसळल्याने 7 जण ठार

संबलपूर जिल्ह्यातील सासन कालव्यात गुरुवारी रात्री उशिरा लग्नावरुन परत येणारी बोलेरो जीप कालव्यात पडली. या अपघातात 7 जण ठार तर 4 जखमी झाले. गाडीत एकूण 11 जण होते.

ACCIDENT IN SAMBALPUR
संबलपूरमध्ये वाहन कोसळल्याने 7 जण ठार तर 4 जखमी
author img

By

Published : Mar 31, 2023, 2:37 PM IST

संबलपूर (ओडिशा) : या अपघातात, वाहनातून बाहेर पडू न शकल्याने गुदमरून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले. सर्व 4 जखमींवर संबलपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मृत झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर ब्लॉक अंतर्गत बडाधरा गावातील होते. अजित खमारी, दिव्या लोहा, सुबल भोई, सुमंत भोई, सरोज सेठ, रमाकांत भोई आणि बोलेरो चालक शत्रुघ्न भोई अशी त्यांची नावे आहेत. वाहनात एकूण 11 जण होते.

गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले : मिळालेल्या माहितीनुसार, संबलपूरमधील परमणपूर येथे एका लग्नासाठी 11 जण गेले होते. लग्न आटोपून रात्री एक वाजण्याच्या सुमारास ते घरी परतत होते. मात्र गाडीचा रस्त्यावरील तोल सुटला आणि ती कालव्यात पडली. त्यावेळी कालव्यातून तीन जण बाहेर आले, तर इतरांना बाहेर पडता आले नाही. बऱ्याच वेळानंतर स्थानिक लोकांनी येऊन त्यांना वाचवले. गंभीर जखमींना संबलपूर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला : बचावकार्यात उशीर झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी असेही सांगितले की, कोणतीही रुग्णवाहिका किंवा ऑक्सिजन त्वरित पोहोचू शकत नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

ईशान्य दिल्लीमध्ये घडली ही धक्कादायक घटना : ईशान्य दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे एका घरात एकाच कुटुंबातील 6 जणांचा धक्कादायक मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी ईशान्य दिल्ली जिल्हा पोलीस अधिकार्‍यांनी माहिती दिली आहे. दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी माहिती दिली की, शुक्रवारी सकाळी शास्त्री पार्क पोलीस स्टेशनला एक पीसीआर कॉल आला होता.

हेही वाचा : Mumbai Ram Navami Clashes: मालाड परिसरात रामनवमी शोभायात्रेदरम्यान झालेल्या हाणामारीत २० जणांना अटक; ३०० हून अधिक जणांविरूद्ध गुन्हा दाखल

संबलपूर (ओडिशा) : या अपघातात, वाहनातून बाहेर पडू न शकल्याने गुदमरून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले. सर्व 4 जखमींवर संबलपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मृत झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर ब्लॉक अंतर्गत बडाधरा गावातील होते. अजित खमारी, दिव्या लोहा, सुबल भोई, सुमंत भोई, सरोज सेठ, रमाकांत भोई आणि बोलेरो चालक शत्रुघ्न भोई अशी त्यांची नावे आहेत. वाहनात एकूण 11 जण होते.

गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले : मिळालेल्या माहितीनुसार, संबलपूरमधील परमणपूर येथे एका लग्नासाठी 11 जण गेले होते. लग्न आटोपून रात्री एक वाजण्याच्या सुमारास ते घरी परतत होते. मात्र गाडीचा रस्त्यावरील तोल सुटला आणि ती कालव्यात पडली. त्यावेळी कालव्यातून तीन जण बाहेर आले, तर इतरांना बाहेर पडता आले नाही. बऱ्याच वेळानंतर स्थानिक लोकांनी येऊन त्यांना वाचवले. गंभीर जखमींना संबलपूर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला : बचावकार्यात उशीर झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी असेही सांगितले की, कोणतीही रुग्णवाहिका किंवा ऑक्सिजन त्वरित पोहोचू शकत नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

ईशान्य दिल्लीमध्ये घडली ही धक्कादायक घटना : ईशान्य दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे एका घरात एकाच कुटुंबातील 6 जणांचा धक्कादायक मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी ईशान्य दिल्ली जिल्हा पोलीस अधिकार्‍यांनी माहिती दिली आहे. दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी माहिती दिली की, शुक्रवारी सकाळी शास्त्री पार्क पोलीस स्टेशनला एक पीसीआर कॉल आला होता.

हेही वाचा : Mumbai Ram Navami Clashes: मालाड परिसरात रामनवमी शोभायात्रेदरम्यान झालेल्या हाणामारीत २० जणांना अटक; ३०० हून अधिक जणांविरूद्ध गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.