ETV Bharat / bharat

Rahul Gandhi: अदानी प्रकरणावर पंतप्रधान घाबरले असल्याने मला सभागृहात बोलू देणार नाहीत -राहुल गांधी

author img

By

Published : Mar 16, 2023, 4:38 PM IST

Updated : Mar 16, 2023, 4:44 PM IST

ब्रिटनमध्ये असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी देशातील स्थितीबाबत काही विधाने केली. त्यावरून राहुल सध्या भाजपच्या निशाण्यावर आहेत. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांची भेट घेतली. राहुल म्हणाले की, 'पंतप्रधान अदानी मुद्द्यावर घाबरले आहेत, त्यामुळे मला सभागृहात बोलू दिले जाणार नाही, असही ते म्हणाले आहेत.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

राहुल गांधी माध्यमांशी बोलताना

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात एकीकडे सत्ताधारी पक्ष राहुल गांधींकडून माफी मागण्याची मागणी करत असताना दुसरीकडे राहुल यांनी काहीही चुकीचं बोललं नसल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. माफीचा प्रश्न उद्भवत नाही. यावरून भाजप आणि काँग्रेसचे नेते संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ करत आहेत. ब्रिटनमधील वक्तव्यानंतर राहुल गांधी गुरुवारी देशात पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले होते.

बोलण्याची संधी दिली जाईल असे वाटत नाही : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप नेते आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. संसदेत झालेल्या आरोपांना मी आधी संसदेत उत्तर देईन, असे म्हटले असले तरी. आपण सभागृहात बोलण्यासाठी वेळ मागितली पण ती मिळाली नाही, असे राहुल म्हणाले आहेत. राहुल म्हणाले की, 'पंतप्रधान अदानी प्रकरणावर घाबरले आहेत, अशा परिस्थितीत मला सभागृहात बोलण्याची संधी दिली जाईल असे वाटत नाही अस राहुल म्हणाले आहेत.

मला सभागृहात बोलण्याचा पूर्ण अधिकार : अदानी आणि पीएमचे नाते काय असा प्रश्न राहुल यांनी पुन्हा उपस्थित केला. अदानी मुद्द्यावर सरकार घाबरले आहे, असे राहुल म्हणाले. या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी हे संपूर्ण प्रकरण आहे. मला सभागृहात बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे राहुल म्हणाले आहेत.

आरोपांबाबत बोलण्यासाठी वेळ देण्याची विनंती : राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तत्पूर्वी, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची संसदेत भेट घेतली आणि त्यांना भाजपने लावलेल्या आरोपांबाबत बोलण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली.

सत्तेचा प्रचंड वापर केल्याने विरोधकांची टीका थांबली : विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी लंडनमधील भाषणात चीनचे कौतुक केले होते. एवढेच नाही तर भारतात लोकशाही धोक्यात असल्याचे त्यांनी म्हटले होते. एवढेच नाही तर आपल्या फोनवर पाळत ठेवण्यात आली असून, सरकारने सत्तेचा प्रचंड वापर केल्याने विरोधकांची टीका थांबली असल्याचे राहुल यांनी सांगितले.

परदेशात भारताची बदनामी करत असल्याचा आरोप : त्यांनी आरोप केला की, नोटाबंदी, जीएसटीशी संबंधित समस्या किंवा शेतकरी कायदे किंवा भारताच्या सीमेवर चीनच्या आक्रमणासारख्या वादग्रस्त बाबींवर संसदेत चर्चा होऊ दिली जात नाही. राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. राहुल परदेशात भारताची बदनामी करत असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Mahua Moitra: लोकसभा अध्यक्ष फक्त भाजप सदस्यांना बोलू देतात, महुआ मोईत्रांचा थेट आरोप

राहुल गांधी माध्यमांशी बोलताना

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात एकीकडे सत्ताधारी पक्ष राहुल गांधींकडून माफी मागण्याची मागणी करत असताना दुसरीकडे राहुल यांनी काहीही चुकीचं बोललं नसल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. माफीचा प्रश्न उद्भवत नाही. यावरून भाजप आणि काँग्रेसचे नेते संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ करत आहेत. ब्रिटनमधील वक्तव्यानंतर राहुल गांधी गुरुवारी देशात पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले होते.

बोलण्याची संधी दिली जाईल असे वाटत नाही : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप नेते आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. संसदेत झालेल्या आरोपांना मी आधी संसदेत उत्तर देईन, असे म्हटले असले तरी. आपण सभागृहात बोलण्यासाठी वेळ मागितली पण ती मिळाली नाही, असे राहुल म्हणाले आहेत. राहुल म्हणाले की, 'पंतप्रधान अदानी प्रकरणावर घाबरले आहेत, अशा परिस्थितीत मला सभागृहात बोलण्याची संधी दिली जाईल असे वाटत नाही अस राहुल म्हणाले आहेत.

मला सभागृहात बोलण्याचा पूर्ण अधिकार : अदानी आणि पीएमचे नाते काय असा प्रश्न राहुल यांनी पुन्हा उपस्थित केला. अदानी मुद्द्यावर सरकार घाबरले आहे, असे राहुल म्हणाले. या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी हे संपूर्ण प्रकरण आहे. मला सभागृहात बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे राहुल म्हणाले आहेत.

आरोपांबाबत बोलण्यासाठी वेळ देण्याची विनंती : राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तत्पूर्वी, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची संसदेत भेट घेतली आणि त्यांना भाजपने लावलेल्या आरोपांबाबत बोलण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली.

सत्तेचा प्रचंड वापर केल्याने विरोधकांची टीका थांबली : विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी लंडनमधील भाषणात चीनचे कौतुक केले होते. एवढेच नाही तर भारतात लोकशाही धोक्यात असल्याचे त्यांनी म्हटले होते. एवढेच नाही तर आपल्या फोनवर पाळत ठेवण्यात आली असून, सरकारने सत्तेचा प्रचंड वापर केल्याने विरोधकांची टीका थांबली असल्याचे राहुल यांनी सांगितले.

परदेशात भारताची बदनामी करत असल्याचा आरोप : त्यांनी आरोप केला की, नोटाबंदी, जीएसटीशी संबंधित समस्या किंवा शेतकरी कायदे किंवा भारताच्या सीमेवर चीनच्या आक्रमणासारख्या वादग्रस्त बाबींवर संसदेत चर्चा होऊ दिली जात नाही. राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. राहुल परदेशात भारताची बदनामी करत असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Mahua Moitra: लोकसभा अध्यक्ष फक्त भाजप सदस्यांना बोलू देतात, महुआ मोईत्रांचा थेट आरोप

Last Updated : Mar 16, 2023, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.