ETV Bharat / bharat

Jharkhand Bus Accident : झारखंडमध्ये बस नदीत कोसळून चार जणांचा मृत्यू, फरार चालकाचा शोध सुरू

author img

By

Published : Aug 5, 2023, 9:51 PM IST

Updated : Aug 6, 2023, 9:51 AM IST

झारखंडमधील गिरिडीहमध्ये एक प्रवासी बस नदीत कोसळली. ही बस रांचीहून गिरिडीहला जात होती. पोलीस आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळ धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. या घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू व 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. (Jharkhand Bus Accident).

Etv Bharat
Etv Bharat
पहा व्हिडिओ

गिरिडीह(झारखंड) : झारखंडमधील गिरिडीहमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. रांचीहून गिरिडीहकडे येणारी प्रवासी बस बराकर नदीत कोसळली. त्यावेळी बसमध्ये सुमारे 30 जण प्रवास करत होते. या घटनेत किती लोकांचे प्राण गेले आणि किती मालमत्तेचे नुकसान झाले आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. (Jharkhand Bus Accident).

बस नदीत पडल्यानंतर बचावकार्य पथकाकडून तीन तास काम सुरू होते. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. रात्रीच जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार मृतांपैकी एकाची अद्याप ओळख पटलेली नाही. बसचा चालक अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंड सरकारच्या मंत्री बेबी देवी यांनी मध्यरात्री रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत प्रकृती जाणून घेतली. मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बस नदीच्या पुलावर येताच चालकाचा तोल गेला : बस नदीत कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेत प्रवाशांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आलिशान (सम्राट) नावाची ही बस रांचीहून गिरिडीहला जात असताना बराकर नदीत कोसळली. बस नदीच्या पुलावर येताच चालकाचा तोल गेला आणि बस नदीत पडली, असे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी बस अतिशय वेगात होती, असेही सांगितले जात आहे.

स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू : या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. लोक ओरडू लागले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची गर्दी झाली. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू झाले. लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. डीसी नमन प्रियेश लकडा आणि एसपी दीपक शर्मा घटनास्थळी पोहोचले आहेत.

मंत्र्यांसह आमदार घटनास्थळी पोहोचले : घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुदिव्य कुमार हे घटनास्थळी पोहोचले. ते गावकऱ्यांसोबत स्वतःही बचाव कार्यात सहभागी झाले. यासह केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. डीसी-एसपी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाचे अधिकारी बचावकार्यात गुंतले आहेत.

हेही वाचा :

  1. Police Station Set On Fire : पोलिसांवर गांजा तस्करीचा आरोप, कारवाई न झाल्याने जमावाने पोलीस स्टेशनच पेटवले
  2. Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; रसायन घेऊन जाणारा ट्रक जळून खाक
  3. Tractor and dumper Accident in Hathras: हाथरसमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली आणि डंपरची समोरासमोर धडक; 5 ठार, 16 जण जखमी

पहा व्हिडिओ

गिरिडीह(झारखंड) : झारखंडमधील गिरिडीहमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. रांचीहून गिरिडीहकडे येणारी प्रवासी बस बराकर नदीत कोसळली. त्यावेळी बसमध्ये सुमारे 30 जण प्रवास करत होते. या घटनेत किती लोकांचे प्राण गेले आणि किती मालमत्तेचे नुकसान झाले आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. (Jharkhand Bus Accident).

बस नदीत पडल्यानंतर बचावकार्य पथकाकडून तीन तास काम सुरू होते. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. रात्रीच जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार मृतांपैकी एकाची अद्याप ओळख पटलेली नाही. बसचा चालक अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंड सरकारच्या मंत्री बेबी देवी यांनी मध्यरात्री रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत प्रकृती जाणून घेतली. मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बस नदीच्या पुलावर येताच चालकाचा तोल गेला : बस नदीत कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेत प्रवाशांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आलिशान (सम्राट) नावाची ही बस रांचीहून गिरिडीहला जात असताना बराकर नदीत कोसळली. बस नदीच्या पुलावर येताच चालकाचा तोल गेला आणि बस नदीत पडली, असे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी बस अतिशय वेगात होती, असेही सांगितले जात आहे.

स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू : या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. लोक ओरडू लागले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची गर्दी झाली. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू झाले. लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. डीसी नमन प्रियेश लकडा आणि एसपी दीपक शर्मा घटनास्थळी पोहोचले आहेत.

मंत्र्यांसह आमदार घटनास्थळी पोहोचले : घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुदिव्य कुमार हे घटनास्थळी पोहोचले. ते गावकऱ्यांसोबत स्वतःही बचाव कार्यात सहभागी झाले. यासह केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. डीसी-एसपी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाचे अधिकारी बचावकार्यात गुंतले आहेत.

हेही वाचा :

  1. Police Station Set On Fire : पोलिसांवर गांजा तस्करीचा आरोप, कारवाई न झाल्याने जमावाने पोलीस स्टेशनच पेटवले
  2. Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; रसायन घेऊन जाणारा ट्रक जळून खाक
  3. Tractor and dumper Accident in Hathras: हाथरसमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली आणि डंपरची समोरासमोर धडक; 5 ठार, 16 जण जखमी
Last Updated : Aug 6, 2023, 9:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.