ETV Bharat / bharat

Eknath Shinde : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांच्या स्मारकाला भेट

author img

By

Published : Feb 18, 2023, 7:38 AM IST

शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी हे सर्व बाळासाहेबांच्या आशीर्वादाने झाले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाने कायम ठेवल्याचा निकाल दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांना पुष्पहार अर्पण केला. एकनाथ शिंदे गटाकडून पक्षाचे नाव ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षाचे चिन्ह कायम ठेवण्याचा आदेश आयोगाने शुक्रवारी दिला आहे.

'बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सर्व झाले' : यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हे सर्व बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने झाले आहे. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सरकार स्थापन केले आणि त्यांची विचारधारा आम्ही पुढे नेत आहोत. निवडणूक आयोगाच्या या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. शिंदे यांनी गेल्या वर्षी ठाकरेंविरोधात बंड केल्यापासून शिवसेनेचे दोन्ही गट (एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे) पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हासाठी लढत आहेत.

निवडणूक आयोगाचे निरीक्षण : शिवसेना पक्षाची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे. आयोगाने म्हटले आहे की, कोणतीही निवडणूक न घेताच एका गटातील लोकांना पदाधिकारी म्हणून अलोकतांत्रिक पद्धतीने नियुक्त करण्याचा प्रकार घडला आहे. राजकीय पक्षांच्या घटनेत पदाधिकाऱ्यांच्या पदांच्या मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका तसेच त्यांचा अंतर्गत वाद सोडवण्यासाठी आणखी एक मुक्त आणि निष्पक्ष कार्यपद्धतीची तरतूद केली गेली पाहिजे.

उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया : निवडणुक आयोगाच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा महाराष्ट्रातील लोकांना आकर्षित करत नाही, त्यामुळे सत्ताधारी आघाडी राजकीय लाभ मिळवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरत आहे. ते म्हणाले, 'त्यांनी आधी बाळासाहेबांना समजून घ्यावं. त्यांना हे कळून चुकलं आहे की मोदींचा चेहरा आता महाराष्ट्रातल्या लोकांना आकर्षित करत नाही, म्हणून त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी बाळासाहेबांचा मुखवटा लावावा लागतो. मी म्हटलं होतं की आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या निकाला आधी निर्णय देऊ नये. आमदार आणि खासदारांच्या संख्येवर पक्षाचे अस्तित्व ठरवले तर कोणताही भांडवलदार आमदार, खासदार विकत घेऊन मुख्यमंत्री होऊ शकतो. 'आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जनता आमच्यासोबत आहे. आम्ही नवीन चिन्ह घेऊन या शिवसेनेला पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात उभे करू', असे खासदार संजय राऊत म्हणाले. त्यांनी सांगितले की त्यांचा गट मतदान पॅनेलच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाईल.

धनुष्यबाणासाठी संघर्ष : गेल्या महिन्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर नियंत्रण ठेवण्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांची लेखी निवेदने निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला 'दोन तलवारी आणि ढाल' चिन्ह तर उद्धव ठाकरे गटाला 'ज्वलंत मशाल' हे निवडणूक चिन्ह देण्यात आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, धनुष्य आणि बाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा : Governor Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन, आज घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाने कायम ठेवल्याचा निकाल दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांना पुष्पहार अर्पण केला. एकनाथ शिंदे गटाकडून पक्षाचे नाव ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षाचे चिन्ह कायम ठेवण्याचा आदेश आयोगाने शुक्रवारी दिला आहे.

'बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सर्व झाले' : यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हे सर्व बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने झाले आहे. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सरकार स्थापन केले आणि त्यांची विचारधारा आम्ही पुढे नेत आहोत. निवडणूक आयोगाच्या या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. शिंदे यांनी गेल्या वर्षी ठाकरेंविरोधात बंड केल्यापासून शिवसेनेचे दोन्ही गट (एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे) पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हासाठी लढत आहेत.

निवडणूक आयोगाचे निरीक्षण : शिवसेना पक्षाची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे. आयोगाने म्हटले आहे की, कोणतीही निवडणूक न घेताच एका गटातील लोकांना पदाधिकारी म्हणून अलोकतांत्रिक पद्धतीने नियुक्त करण्याचा प्रकार घडला आहे. राजकीय पक्षांच्या घटनेत पदाधिकाऱ्यांच्या पदांच्या मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका तसेच त्यांचा अंतर्गत वाद सोडवण्यासाठी आणखी एक मुक्त आणि निष्पक्ष कार्यपद्धतीची तरतूद केली गेली पाहिजे.

उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया : निवडणुक आयोगाच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा महाराष्ट्रातील लोकांना आकर्षित करत नाही, त्यामुळे सत्ताधारी आघाडी राजकीय लाभ मिळवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरत आहे. ते म्हणाले, 'त्यांनी आधी बाळासाहेबांना समजून घ्यावं. त्यांना हे कळून चुकलं आहे की मोदींचा चेहरा आता महाराष्ट्रातल्या लोकांना आकर्षित करत नाही, म्हणून त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी बाळासाहेबांचा मुखवटा लावावा लागतो. मी म्हटलं होतं की आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या निकाला आधी निर्णय देऊ नये. आमदार आणि खासदारांच्या संख्येवर पक्षाचे अस्तित्व ठरवले तर कोणताही भांडवलदार आमदार, खासदार विकत घेऊन मुख्यमंत्री होऊ शकतो. 'आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जनता आमच्यासोबत आहे. आम्ही नवीन चिन्ह घेऊन या शिवसेनेला पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात उभे करू', असे खासदार संजय राऊत म्हणाले. त्यांनी सांगितले की त्यांचा गट मतदान पॅनेलच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाईल.

धनुष्यबाणासाठी संघर्ष : गेल्या महिन्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर नियंत्रण ठेवण्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांची लेखी निवेदने निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला 'दोन तलवारी आणि ढाल' चिन्ह तर उद्धव ठाकरे गटाला 'ज्वलंत मशाल' हे निवडणूक चिन्ह देण्यात आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, धनुष्य आणि बाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा : Governor Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन, आज घेणार राज्यपालपदाची शपथ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.