ETV Bharat / bharat

Patra Chawl case: पत्राचाळ प्रकल्पात तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्याचा ईडीचा दावा

author img

By

Published : Sep 19, 2022, 8:54 PM IST

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात 2006-07 संजय राऊत यांनी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रा चाळच्या पुनर्विकासासाठी म्हाडा अधिकारी आणि इतरांसह बैठकांना आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील दुसर्‍या बैठकीस हजेरी लावली होती. (Patra Chawl case) असा दावा ईडीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रात केला आहे.

पत्रा चाळ
पत्रा चाळ

मुंबई - पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात 2006-07 संजय राऊत यांनी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रा चाळच्या पुनर्विकासासाठी म्हाडा अधिकारी आणि इतरांसह बैठकांना आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील दुसर्‍या बैठकीस हजेरी लावली होती. असा दावा ईडीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रात केला आहे. संजय राऊत हे प्रवीण राऊतयांच्या मार्फत गोरेगाव सिद्धार्थ नगरच्या पुनर्विकासात थेट सहभागी होते. संकल्पनेच्या टप्प्यापासून ते कार्यान्वित होईपर्यंत त्यांनी या प्रकल्पात सहभाग घेतला होता असे देखील ईडीने म्हटले आहे.

संजय राऊतांविरोधात ईडीनं दाखल केलेलं पुरवणी आरोपपत्र आणि खुलासे करण्यात आले आहे ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांना आरोपी नंबर 5 म्हणून दाखवलेलं आहे. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनमध्येही संजय राऊत यांचा सक्रिय सहभाग होता तसेच प्रविण राऊतच्या माध्यमातून मुख्य सूत्रधार या नात्यानं संजय राऊतचं सारे व्यवहार करत असल्याचा दावा देखील ईडीच्या वतीने करण्यात आला आहे.

संजय राऊतांनी दरम्यानच्या काळात या प्रकरणातील साक्षी पुराव्यांशी छेडछाड केली तसेच तपासयंत्रणेची दिशाभूल केली असल्याचा आरोप देखील ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. याशिवाय संजय राऊत यांनी याप्रकरणाती साक्षीदाराला थेट धमकवल्याचेही पुरावे आहेत त्यामुळे संजय राऊत यांना जामीन देण्यात येऊ नये राऊत यांना जामीन देण्यात आला तर या प्रकरणातील तपासावर त्याचा परिणाम होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच राऊत मोठे राष्ट्रीय नेते असल्याने त्याचा परिणाम तपासावर होण्याची शक्यता असल्याचं ईडीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

प्रविण राऊतला एचडीआयएकडून 112 कोटी मिळाले होते. ते संजय आणि वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात 2009 - 2011 या काळात 1 कोटी 06 लाख 44 हजार 375 रूपये प्रविण राऊतच्या खात्यातून पाठवण्यात आले होते असे देखील ईडीने म्हटपले आहे. ही रक्कम राऊत यांना कशासाठी मिळाली? याचा तपास होणं गरजेचं असल्याचे ईडीच्या वतीने म्हटले आहे.

मुंबई - पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात 2006-07 संजय राऊत यांनी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रा चाळच्या पुनर्विकासासाठी म्हाडा अधिकारी आणि इतरांसह बैठकांना आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील दुसर्‍या बैठकीस हजेरी लावली होती. असा दावा ईडीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रात केला आहे. संजय राऊत हे प्रवीण राऊतयांच्या मार्फत गोरेगाव सिद्धार्थ नगरच्या पुनर्विकासात थेट सहभागी होते. संकल्पनेच्या टप्प्यापासून ते कार्यान्वित होईपर्यंत त्यांनी या प्रकल्पात सहभाग घेतला होता असे देखील ईडीने म्हटले आहे.

संजय राऊतांविरोधात ईडीनं दाखल केलेलं पुरवणी आरोपपत्र आणि खुलासे करण्यात आले आहे ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांना आरोपी नंबर 5 म्हणून दाखवलेलं आहे. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनमध्येही संजय राऊत यांचा सक्रिय सहभाग होता तसेच प्रविण राऊतच्या माध्यमातून मुख्य सूत्रधार या नात्यानं संजय राऊतचं सारे व्यवहार करत असल्याचा दावा देखील ईडीच्या वतीने करण्यात आला आहे.

संजय राऊतांनी दरम्यानच्या काळात या प्रकरणातील साक्षी पुराव्यांशी छेडछाड केली तसेच तपासयंत्रणेची दिशाभूल केली असल्याचा आरोप देखील ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. याशिवाय संजय राऊत यांनी याप्रकरणाती साक्षीदाराला थेट धमकवल्याचेही पुरावे आहेत त्यामुळे संजय राऊत यांना जामीन देण्यात येऊ नये राऊत यांना जामीन देण्यात आला तर या प्रकरणातील तपासावर त्याचा परिणाम होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच राऊत मोठे राष्ट्रीय नेते असल्याने त्याचा परिणाम तपासावर होण्याची शक्यता असल्याचं ईडीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

प्रविण राऊतला एचडीआयएकडून 112 कोटी मिळाले होते. ते संजय आणि वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात 2009 - 2011 या काळात 1 कोटी 06 लाख 44 हजार 375 रूपये प्रविण राऊतच्या खात्यातून पाठवण्यात आले होते असे देखील ईडीने म्हटपले आहे. ही रक्कम राऊत यांना कशासाठी मिळाली? याचा तपास होणं गरजेचं असल्याचे ईडीच्या वतीने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.