ETV Bharat / bharat

पश्चिम बंगाल निवडणूक : दिलीप घोष यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी

author img

By

Published : Apr 15, 2021, 8:03 PM IST

निवडणूक आयोगाने मोठं पाउल उचलत भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी घातली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल, त्यांच्यावर 15 एप्रिल सांयकाळी 7 वाजल्यापासून ते 16 एप्रिल सायंकाळी 7 पर्यंत प्रचार बंदी घालण्यात आली आहे.

दिलीप घोष
दिलीप घोष

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळत असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रचार सभा घेण्यात येत आहेत. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर राजकारण तापत चाललं आहे. आता निवडणूक आयोगाने मोठं पाउल उचलत भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी घातली आहे.

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल, त्यांच्यावर 15 एप्रिल सांयकाळी 7 वाजल्यापासून ते 16 एप्रिल सायंकाळी 7 पर्यंत प्रचार बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने भाजपा नेता राहुल सिन्हावर 48 तासांसाठी प्रचार बंदी लावली होती. तर गेल्या सोमवारी निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर 24 तासांसाठी प्रचार बंदी घातली होती. अल्पसंख्याक मतांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली होती. ममतांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं होते.

आठ टप्प्यात मतदान -

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडला. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिला पार पडला आहे. तर पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल.

दीदींसमोर आव्हान -

गेल्या 10 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. आता ममता बॅनर्जी हॅटट्रीक करण्याच्या प्रयत्नात आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना एकाच वेळी दोन आव्हानांचा सामना करावा लागतोय. एक म्हणजे काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी आणि दुसरीकडे भाजपप्रणित एनडीए.

हेही वाचा - आंध्र प्रदेश: मुलीवर झालेल्या बलात्कारातून झाली एकाच कुटुंबातील ६ जणांची हत्या

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळत असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रचार सभा घेण्यात येत आहेत. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर राजकारण तापत चाललं आहे. आता निवडणूक आयोगाने मोठं पाउल उचलत भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी घातली आहे.

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल, त्यांच्यावर 15 एप्रिल सांयकाळी 7 वाजल्यापासून ते 16 एप्रिल सायंकाळी 7 पर्यंत प्रचार बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने भाजपा नेता राहुल सिन्हावर 48 तासांसाठी प्रचार बंदी लावली होती. तर गेल्या सोमवारी निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर 24 तासांसाठी प्रचार बंदी घातली होती. अल्पसंख्याक मतांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली होती. ममतांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं होते.

आठ टप्प्यात मतदान -

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडला. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिला पार पडला आहे. तर पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल.

दीदींसमोर आव्हान -

गेल्या 10 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. आता ममता बॅनर्जी हॅटट्रीक करण्याच्या प्रयत्नात आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना एकाच वेळी दोन आव्हानांचा सामना करावा लागतोय. एक म्हणजे काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी आणि दुसरीकडे भाजपप्रणित एनडीए.

हेही वाचा - आंध्र प्रदेश: मुलीवर झालेल्या बलात्कारातून झाली एकाच कुटुंबातील ६ जणांची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.