ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Security : भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधीच्या सुरक्षेत चूक, संतप्त कॉंग्रेसची प्रशासनावर टीका

author img

By

Published : Jan 28, 2023, 8:36 AM IST

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी संघटनेचे प्रभारी केसी वेणुगोपाल यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांनी यात्रे दरम्यान कथित सुरक्षा उल्लंघनावरून जम्मू-काश्मीर प्रशासनावर टीका केली आहे. काल सुरक्षा दलांनी काश्मीरमधील बनिहाल येथे अचानक यात्रा थांबवून राहुल गांधींना बुलेटप्रूफ कारमध्ये पुढे जाण्यास सांगितले होते.

Rahul Gandhi
राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसने शुक्रवारी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे दरम्यान सुरक्षेचा भंग झाल्याचा आरोप केला आहे. पक्षाने यावरून जम्मू-काश्मीर प्रशासनावर टीका केली आहे. काँग्रेसचे मीडिया प्रमुख पवन खेरा यांनी मीडिया ब्रीफिंगमध्ये पक्षाच्या जम्मू आणि काश्मीर प्रभारी रजनी पाटील यांच्या ट्विटचा उल्लेख करताना म्हटले की, 'आम्हाला माहित आहे की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला सुरक्षा प्रदान करण्यात जम्मू-काश्मीर प्रशासन अपयशी ठरले आहे. सुरक्षेतील त्रुटी प्रशासनाची अयोग्य आणि अपुरी तयारी दर्शवते. जेव्हा आमच्याकडे अधिक तपशील येतील तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू'.

  • राहुल गांधी की सुरक्षा में कमी के आदेश कौन दे रहा है? भारत जोड़ो यात्रा की सफलता के बाद उनकी सुरक्षा में सेंध लगना संयोग नहीं है। राहुल गांधी को मिली सुरक्षा फेल साबित हुई! पुलिस को उन्हें अपनी गाड़ी में ले जाना पड़ा। @OmarAbdullah #BharatJodoYatra pic.twitter.com/QecXUaKHGb

    — Bharat Jodo (@bharatjodo) January 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राहुल गांधींना बुलेटप्रूफ कारमध्ये जाण्यास सांगितले : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी संघटनेचे प्रभारी केसी वेणुगोपाल यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांनीही कथित सुरक्षा उल्लंघनावरून प्रशासनावर टीका केली आहे. काल सुरक्षा दलांनी काश्मीरमधील बनिहाल येथे अचानक यात्रा थांबवून राहुल गांधींना बुलेटप्रूफ कारमध्ये पुढे जाण्यास सांगितले होते. वेणुगोपाल म्हणाले, 'डी-क्षेत्रातून अचानकपणे सुरक्षा कर्मचार्‍यांच्या माघारीमुळे बनिहालमध्ये सुरक्षेचा भंग झाला आहे. हे आदेश कोणी दिले?. जबाबदार अधिकाऱ्यांनी या चुकांसाठी उत्तर दिले पाहिजे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत. प्रशासन राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जीवाशी खेळत आहे. ही तशी संवेदनशील जागा आहे. आम्ही सुरक्षेबद्दल खूप चिंतित आहोत.'

यात्रेला पायी जाण्यास परवानगी दिली नाही : रजनी पाटील यांनी राहुल गांधींना बुलेटप्रूफ कारमध्ये घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलाची छायाचित्रे ट्विट केली होती, ज्यामुळे यात्रा व्यवस्थापक गोंधळून गेले आणि काळजीत पडले. आतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने यात्रेला पायी जाण्यास परवानगी दिली नाही. यात्रेने जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती केंद्रशासित प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी देखील काँग्रेसने राहुल गांधींच्या सुरक्षेतील उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राहुल गांधींना निर्दोष सुरक्षा प्रदान करण्यासाठी पत्र लिहिले होते.

राहुल गांधींच्या सुरक्षेशी तडजोड नाही : त्यावेळी वेणुगोपाल म्हणाले होते की, पक्ष जम्मू आणि काश्मीरमध्ये जाण्यास घाबरत नाही, परंतु आम्ही केंद्र सरकारला आमच्या काळजीबद्दल माहिती दिली. एका प्रेस कॉन्फरन्स दरम्यान राहुल गांधींनी देखील सांगितले होते की बुलेटप्रूफ कारमध्ये यात्रा करणे त्यांना शक्य नाही, कारण यामुळे त्यांच्यात आणि सामान्य लोकांमध्ये अंतर निर्माण होईल. यात्रा जम्मूला पोहोचली असताना यात्रेच्या ठिकाणी दोन स्फोट झाल्यामुळे काँग्रेस चिंतेत होती. सुरक्षा व्यवस्थेबाबत समाधानी आहात का, असे विचारले असता आपले संरक्षण कसे करायचे हे प्रशासनाला चांगलेच ठाऊक असल्याचे राहुल यांनी नमूद केले. पक्षाचे नेते जयराम रमेश यांनीही सांगितले की, पक्ष राहुल गांधींच्या सुरक्षेशी कधीही तडजोड करणार नाही. तसेच सुरक्षा यंत्रणांकडून येणाऱ्या सूचनांचे ते पालन करतील.'

हेही वाचा : Bharat Jodo Yatra In Kashmir : भारत जोडो यात्रा पोहचली अंतिम टप्यात, यात्रेचा काश्मीर खोऱ्यात प्रवेश

नवी दिल्ली : काँग्रेसने शुक्रवारी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे दरम्यान सुरक्षेचा भंग झाल्याचा आरोप केला आहे. पक्षाने यावरून जम्मू-काश्मीर प्रशासनावर टीका केली आहे. काँग्रेसचे मीडिया प्रमुख पवन खेरा यांनी मीडिया ब्रीफिंगमध्ये पक्षाच्या जम्मू आणि काश्मीर प्रभारी रजनी पाटील यांच्या ट्विटचा उल्लेख करताना म्हटले की, 'आम्हाला माहित आहे की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला सुरक्षा प्रदान करण्यात जम्मू-काश्मीर प्रशासन अपयशी ठरले आहे. सुरक्षेतील त्रुटी प्रशासनाची अयोग्य आणि अपुरी तयारी दर्शवते. जेव्हा आमच्याकडे अधिक तपशील येतील तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू'.

  • राहुल गांधी की सुरक्षा में कमी के आदेश कौन दे रहा है? भारत जोड़ो यात्रा की सफलता के बाद उनकी सुरक्षा में सेंध लगना संयोग नहीं है। राहुल गांधी को मिली सुरक्षा फेल साबित हुई! पुलिस को उन्हें अपनी गाड़ी में ले जाना पड़ा। @OmarAbdullah #BharatJodoYatra pic.twitter.com/QecXUaKHGb

    — Bharat Jodo (@bharatjodo) January 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राहुल गांधींना बुलेटप्रूफ कारमध्ये जाण्यास सांगितले : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी संघटनेचे प्रभारी केसी वेणुगोपाल यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांनीही कथित सुरक्षा उल्लंघनावरून प्रशासनावर टीका केली आहे. काल सुरक्षा दलांनी काश्मीरमधील बनिहाल येथे अचानक यात्रा थांबवून राहुल गांधींना बुलेटप्रूफ कारमध्ये पुढे जाण्यास सांगितले होते. वेणुगोपाल म्हणाले, 'डी-क्षेत्रातून अचानकपणे सुरक्षा कर्मचार्‍यांच्या माघारीमुळे बनिहालमध्ये सुरक्षेचा भंग झाला आहे. हे आदेश कोणी दिले?. जबाबदार अधिकाऱ्यांनी या चुकांसाठी उत्तर दिले पाहिजे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत. प्रशासन राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जीवाशी खेळत आहे. ही तशी संवेदनशील जागा आहे. आम्ही सुरक्षेबद्दल खूप चिंतित आहोत.'

यात्रेला पायी जाण्यास परवानगी दिली नाही : रजनी पाटील यांनी राहुल गांधींना बुलेटप्रूफ कारमध्ये घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलाची छायाचित्रे ट्विट केली होती, ज्यामुळे यात्रा व्यवस्थापक गोंधळून गेले आणि काळजीत पडले. आतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने यात्रेला पायी जाण्यास परवानगी दिली नाही. यात्रेने जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती केंद्रशासित प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी देखील काँग्रेसने राहुल गांधींच्या सुरक्षेतील उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राहुल गांधींना निर्दोष सुरक्षा प्रदान करण्यासाठी पत्र लिहिले होते.

राहुल गांधींच्या सुरक्षेशी तडजोड नाही : त्यावेळी वेणुगोपाल म्हणाले होते की, पक्ष जम्मू आणि काश्मीरमध्ये जाण्यास घाबरत नाही, परंतु आम्ही केंद्र सरकारला आमच्या काळजीबद्दल माहिती दिली. एका प्रेस कॉन्फरन्स दरम्यान राहुल गांधींनी देखील सांगितले होते की बुलेटप्रूफ कारमध्ये यात्रा करणे त्यांना शक्य नाही, कारण यामुळे त्यांच्यात आणि सामान्य लोकांमध्ये अंतर निर्माण होईल. यात्रा जम्मूला पोहोचली असताना यात्रेच्या ठिकाणी दोन स्फोट झाल्यामुळे काँग्रेस चिंतेत होती. सुरक्षा व्यवस्थेबाबत समाधानी आहात का, असे विचारले असता आपले संरक्षण कसे करायचे हे प्रशासनाला चांगलेच ठाऊक असल्याचे राहुल यांनी नमूद केले. पक्षाचे नेते जयराम रमेश यांनीही सांगितले की, पक्ष राहुल गांधींच्या सुरक्षेशी कधीही तडजोड करणार नाही. तसेच सुरक्षा यंत्रणांकडून येणाऱ्या सूचनांचे ते पालन करतील.'

हेही वाचा : Bharat Jodo Yatra In Kashmir : भारत जोडो यात्रा पोहचली अंतिम टप्यात, यात्रेचा काश्मीर खोऱ्यात प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.