नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आज राम मंदिर बाबरी मशिद प्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, मात्र, निर्णयामुळे समाधानी नसल्याचे सुन्नी वक्फ बोर्डाच्या वकिलांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. सर्वोच्च न्यायालयात निकाला विरोधात पुनर्याचिका दाखल करण्याचे संकेत वकील जफरयाब जिलानी यांनी दिले.
-
Zafaryab Jilani, All India Muslim Personal Law Board: Respect the verdict but the judgement is not satisfactory. There should be no demonstration of any kind anywhere on it. #AyodhyaJudgment pic.twitter.com/g956DuJ5sB
— ANI (@ANI) November 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Zafaryab Jilani, All India Muslim Personal Law Board: Respect the verdict but the judgement is not satisfactory. There should be no demonstration of any kind anywhere on it. #AyodhyaJudgment pic.twitter.com/g956DuJ5sB
— ANI (@ANI) November 9, 2019Zafaryab Jilani, All India Muslim Personal Law Board: Respect the verdict but the judgement is not satisfactory. There should be no demonstration of any kind anywhere on it. #AyodhyaJudgment pic.twitter.com/g956DuJ5sB
— ANI (@ANI) November 9, 2019
पूर्ण निकाल लागल्यानंतरच पुनर्याचिका दाखल करायची की नाही हे ठरवण्यात येईल. वरिष्ठ वकिल आणि बोर्डाच्या सदस्यांशी याबाबत चर्चा करण्यात येईल. मात्र, प्रथमदर्शनी पुनर्याचिका दाखल करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.