ETV Bharat / bharat

'उत्तर प्रदेशात गुन्ह्यांचा वेग राज्यकारभाराच्या वेगाच्या तुलनेत दुप्पट'

author img

By

Published : Aug 25, 2020, 1:50 PM IST

प्रियांका यांनी ट्विटमध्ये एक ग्राफिक शेअर केला आहे. यामध्ये 23 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट रोजीच्या गुन्ह्यांची संख्या देऊन त्याला 'उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी मीटर" असे शीर्षक दिले आहे. तसेच, उत्तर प्रदेशातील भाजपप्रणित सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांना धमकावत असल्याचा आरोप प्रियांका यांनी शुक्रवारी केला होता.

प्रियांका गांधी
प्रियांका गांधी

लखनऊ - उत्तर प्रदेश (पूर्व) प्रभारी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. 'राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुन्ह्यांचा वेग राज्यकारभाराच्या वेगाच्या तुलनेत दुप्पट वाढला आहे,' अशी टीका प्रियांका यांनी ट्विटमधून केली.

  • यूपी के सीएम सरकार की स्पीड बताते हैं और अपराध का मीटर उससे दोगुनी स्पीड से भागने लगता है।

    प्रत्यक्षम् किम् प्रमाणम्

    ये यूपी में केवल दो दिनों का अपराध का मीटर है। यूपी सरकार बार-बार अपराध की घटनाओं पर पर्दा डालती है मगर अपराध चिंघाड़ते हुए प्रदेश की सड़कों पर तांडव कर रहा है। pic.twitter.com/vaN3J5wG2T

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमधील कारभारी प्रशासन वेगाने कार्यरत असल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यांच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने गुन्हेगारीचे मीटर धावत असल्याचे दिसत आहे," असे ट्विट त्यांनी केले आहे.

ट्विटसह प्रियांका यांनी एक ग्राफिक शेअर केला आहे. यामध्ये 23 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट रोजीच्या गुन्ह्यांची संख्या देऊन त्याला 'उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी मीटर" असे शीर्षक दिले आहे.

'हे उत्तर प्रदेशातील केवळ दोन दिवसांचे गुन्हेगारीचे मीटर आहे. राज्य सरकार वारंवार गुन्ह्यांच्या घटनांवर कव्हरेज करते. तरीही गुन्हेगारी राज्यातील रस्त्यांवर खुलेआम दिसून येत आहे,' असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील भाजपप्रणित सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांना धमकावत असल्याचा आरोप प्रियांका यांनी शुक्रवारी केला होता.

प्रियांका यांनी एका हिंदी वृत्तपत्रातील खतांच्या घोटाळ्याबद्दल मथळे असलेले कटिंग्ज पोस्ट केली. यूरियाने भरलेले दोन ट्रक बेपत्ता झाले असून, त्यापैकी एक ट्रक चंदौसीमध्ये खाली करत असल्याचे आढळल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेश (पूर्व) प्रभारी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. 'राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुन्ह्यांचा वेग राज्यकारभाराच्या वेगाच्या तुलनेत दुप्पट वाढला आहे,' अशी टीका प्रियांका यांनी ट्विटमधून केली.

  • यूपी के सीएम सरकार की स्पीड बताते हैं और अपराध का मीटर उससे दोगुनी स्पीड से भागने लगता है।

    प्रत्यक्षम् किम् प्रमाणम्

    ये यूपी में केवल दो दिनों का अपराध का मीटर है। यूपी सरकार बार-बार अपराध की घटनाओं पर पर्दा डालती है मगर अपराध चिंघाड़ते हुए प्रदेश की सड़कों पर तांडव कर रहा है। pic.twitter.com/vaN3J5wG2T

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमधील कारभारी प्रशासन वेगाने कार्यरत असल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यांच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने गुन्हेगारीचे मीटर धावत असल्याचे दिसत आहे," असे ट्विट त्यांनी केले आहे.

ट्विटसह प्रियांका यांनी एक ग्राफिक शेअर केला आहे. यामध्ये 23 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट रोजीच्या गुन्ह्यांची संख्या देऊन त्याला 'उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी मीटर" असे शीर्षक दिले आहे.

'हे उत्तर प्रदेशातील केवळ दोन दिवसांचे गुन्हेगारीचे मीटर आहे. राज्य सरकार वारंवार गुन्ह्यांच्या घटनांवर कव्हरेज करते. तरीही गुन्हेगारी राज्यातील रस्त्यांवर खुलेआम दिसून येत आहे,' असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील भाजपप्रणित सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांना धमकावत असल्याचा आरोप प्रियांका यांनी शुक्रवारी केला होता.

प्रियांका यांनी एका हिंदी वृत्तपत्रातील खतांच्या घोटाळ्याबद्दल मथळे असलेले कटिंग्ज पोस्ट केली. यूरियाने भरलेले दोन ट्रक बेपत्ता झाले असून, त्यापैकी एक ट्रक चंदौसीमध्ये खाली करत असल्याचे आढळल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.