ETV Bharat / bharat

पायी व असुरक्षितपणे ट्रकमधून प्रवास करून राज्यात येऊ नका, योगी आदित्यनाथांचे मजुरांना आवाहन

author img

By

Published : May 17, 2020, 1:32 PM IST

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन परराज्यातून परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्याचबरोबर मजुरांनी जीव धोक्यात घालून रस्त्यावरून पायी प्रवास करू नये तसेच असुरक्षित वाहनांमधून प्रवास न करण्याचे आवाहन केले.

entry of foot and truck is prohibited in UP border
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनौ – यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थलांरित मजुरांनी पायी, दुचाकीवरून व जीव धोक्यात घालून अन्य असुरक्षित वाहनांतून प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. आदित्यानाथ यांनी सरकारी वाहनांनी स्थलांतरितांना सुरक्षितपणे त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी म्हटले की, मजुरांच्या प्रवासासाठी प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्न करत आहे. राज्य सरकार स्थलांतरित मजुरांना रेल्वेच्या माध्यामातून मोफत प्रवासाची संधी देत आहे.

औरैया अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या सरकारी निवासस्थानी आयोजित समीक्षा बैठकीत योगींनी प्रशासनाला आदेश दिले, की राज्याच्या सीमेवरून कोणीही स्थलांतरित मजूर पायी किंवा धोकादायक रित्या प्रवास करून येऊ नये. असे आढळल्यास संबंधित वाहन जप्त करण्याचचे आदेश दिले आहेत. पायी प्रवास करणाऱ्यांना पोलिसांनी अडविले पाहिजे.

मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, की राज्यात दाखल होणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. मजुरांनी सुरक्षित व सन्मानपूर्वत त्यांच्या घरांपर्यंत पोहोचविले पाहिजे. सीमेवरील प्रत्येक जिल्ह्यात २०० बसेस तैनात करण्याबरोबरच त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे.

प्रवासी श्रमिकांसाठी विलगीकरण केंद्र व कम्युनिटी किचनची व्यवस्था तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कम्युनिटी किचनच्या माध्यमातून शुद्ध व आवश्यक भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी परिसरात निरीक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्याच्यामार्फत बाहेरून येणाऱ्या लोकांवर नजर ठेवली जात आहे.


मुख्यमंत्री योगींनी प्रत्येक गावात अल्ट्रारेड थर्मामीटरची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. टेस्टिंग क्षमता वाढवण्यावर जोर देण्याचे सांगण्यात आले आहे. एका आठवड्यात 10 हजार टेस्ट प्रतिदिन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोविड रुग्णालयात एक लाख बेड तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लखनौ – यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थलांरित मजुरांनी पायी, दुचाकीवरून व जीव धोक्यात घालून अन्य असुरक्षित वाहनांतून प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. आदित्यानाथ यांनी सरकारी वाहनांनी स्थलांतरितांना सुरक्षितपणे त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी म्हटले की, मजुरांच्या प्रवासासाठी प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्न करत आहे. राज्य सरकार स्थलांतरित मजुरांना रेल्वेच्या माध्यामातून मोफत प्रवासाची संधी देत आहे.

औरैया अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या सरकारी निवासस्थानी आयोजित समीक्षा बैठकीत योगींनी प्रशासनाला आदेश दिले, की राज्याच्या सीमेवरून कोणीही स्थलांतरित मजूर पायी किंवा धोकादायक रित्या प्रवास करून येऊ नये. असे आढळल्यास संबंधित वाहन जप्त करण्याचचे आदेश दिले आहेत. पायी प्रवास करणाऱ्यांना पोलिसांनी अडविले पाहिजे.

मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, की राज्यात दाखल होणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. मजुरांनी सुरक्षित व सन्मानपूर्वत त्यांच्या घरांपर्यंत पोहोचविले पाहिजे. सीमेवरील प्रत्येक जिल्ह्यात २०० बसेस तैनात करण्याबरोबरच त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे.

प्रवासी श्रमिकांसाठी विलगीकरण केंद्र व कम्युनिटी किचनची व्यवस्था तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कम्युनिटी किचनच्या माध्यमातून शुद्ध व आवश्यक भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी परिसरात निरीक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्याच्यामार्फत बाहेरून येणाऱ्या लोकांवर नजर ठेवली जात आहे.


मुख्यमंत्री योगींनी प्रत्येक गावात अल्ट्रारेड थर्मामीटरची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. टेस्टिंग क्षमता वाढवण्यावर जोर देण्याचे सांगण्यात आले आहे. एका आठवड्यात 10 हजार टेस्ट प्रतिदिन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोविड रुग्णालयात एक लाख बेड तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.