ETV Bharat / bharat

सेक्युलॅरिझमबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान, म्हणाले...

author img

By

Published : Nov 21, 2019, 11:51 AM IST

हा देश आणि या देशाची राज्यघटना ही सेक्युलर या शब्दावर आधारीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वतः सेक्युलर विचारधारा मानणारे आणि तसं वागणारे नेता होते, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत

नवी दिल्ली - काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात होणाऱ्या आघाडीच्या आड सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्षता हा शब्द येत आहे का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारल्यानंतर त्यांनी सेक्युलर शब्दाबाबत शिवसेनेला आक्षेप असण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले आहे. दिल्लीत येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी आपली ही भुमिका स्पष्ट केली.

  • Sanjay Raut, Shiv Sena: The process to form government has started. It will be completed before December 1. All three parties will hold meeting in Mumbai pic.twitter.com/vnxhUEKQpx

    — ANI (@ANI) November 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा... 'डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होईल'

मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जवळीक साधत आहे. मात्र कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या सेक्युलर विचारांच्या पक्षांसोबत कसे काय जुळवून घेणार, हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सेक्युलॅरिझमबाबत विचारणा केली असता, संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. 'सेक्युलर हा शब्द भारताच्या राज्यघटनेमध्येच आहे. येथील राज्यकारभार त्याच पद्धतीने चालतो. कोणाचेही काम करताना, त्याची जात अथवा धर्म पाहिला जात नाही, त्यामुळे त्याबाबत वेगळी चर्चा करण्याची गरज नाही', असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... 'येणारं सरकार तीन पक्षांचं मिळून असेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल'

बाळासाहेबांची करून दिली आठवण...

पत्रकारांच्या याच प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण करून दिली. 'देशातील शेतकऱ्यांना मदत देताना त्यांचा धर्म पाहिला जात नाही. नोकऱ्या देताना उमेदवारांना त्यांचा धर्म विचारला जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: तसा आदर्श घालून दिला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेबांनीही न्यायालयात धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेण्यास विरोध केला होता. राज्यघटनेवर हात ठेवून शपथ घेतली जावी, असे त्यांनी म्हटल्याची आठवण राऊत यांनी यावेळी दिली.

हेही वाचा... २०१४ प्रमाणेच पवार भाजपला बाहेरुन पाठिंबा देतील - आठवले

नवी दिल्ली - काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात होणाऱ्या आघाडीच्या आड सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्षता हा शब्द येत आहे का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारल्यानंतर त्यांनी सेक्युलर शब्दाबाबत शिवसेनेला आक्षेप असण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले आहे. दिल्लीत येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी आपली ही भुमिका स्पष्ट केली.

  • Sanjay Raut, Shiv Sena: The process to form government has started. It will be completed before December 1. All three parties will hold meeting in Mumbai pic.twitter.com/vnxhUEKQpx

    — ANI (@ANI) November 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा... 'डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होईल'

मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जवळीक साधत आहे. मात्र कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या सेक्युलर विचारांच्या पक्षांसोबत कसे काय जुळवून घेणार, हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सेक्युलॅरिझमबाबत विचारणा केली असता, संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. 'सेक्युलर हा शब्द भारताच्या राज्यघटनेमध्येच आहे. येथील राज्यकारभार त्याच पद्धतीने चालतो. कोणाचेही काम करताना, त्याची जात अथवा धर्म पाहिला जात नाही, त्यामुळे त्याबाबत वेगळी चर्चा करण्याची गरज नाही', असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... 'येणारं सरकार तीन पक्षांचं मिळून असेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल'

बाळासाहेबांची करून दिली आठवण...

पत्रकारांच्या याच प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण करून दिली. 'देशातील शेतकऱ्यांना मदत देताना त्यांचा धर्म पाहिला जात नाही. नोकऱ्या देताना उमेदवारांना त्यांचा धर्म विचारला जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: तसा आदर्श घालून दिला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेबांनीही न्यायालयात धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेण्यास विरोध केला होता. राज्यघटनेवर हात ठेवून शपथ घेतली जावी, असे त्यांनी म्हटल्याची आठवण राऊत यांनी यावेळी दिली.

हेही वाचा... २०१४ प्रमाणेच पवार भाजपला बाहेरुन पाठिंबा देतील - आठवले

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.