नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेस पक्षाला खुले पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांना काँग्रेसच अध्यक्ष करावे, असे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचा कारभार पाहावा. काँग्रेसनं भाजपसारखे बनू नये. आपले विचार आणि आपला दृष्ट्रीकोन न घाबरता मांडवा, असे त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
काँग्रेस पक्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या पराभवाचा सामना करू शकला नाही. कारण त्यांचा पक्षअध्यक्ष पद सोडून गेला होता. राहुल यांनी पुन्हा पक्षाचा अध्यक्ष व्हावे. विरोधक आणि माध्यमे काही म्हणू मात्र मला असे वाटते की, राहुल आमचे अध्यक्ष व्हावे. ज्यांना राजकारण आणि विश्वासाबद्दल काहीच माहिती नाही, ती लोक मला शिकवत आहेत. काही क्षणांसाठी मौन ठेवणे चांगले आहे. मात्र आवाज उठवत राहणे हे सर्वांच्या भविष्यासाठी गरजेचं आहे, असे सलमान खुर्शीद यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
हेही वाचा - चित्रपटांचा गल्ला कोट्यवधींचा, मग अर्थव्यवस्थेत मंदी कशी; कायदेमंत्र्यांचा अजब तर्क
राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पक्षावरील संकट आणखी वाढलं असून आमचे नेते सोडून गेले हीच पक्षासमोरील मोठी समस्या आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला पराभवाचा सामना का करावा लागला याचं एकत्रित विश्लेषणही आम्ही करू शकलो नाही, असे खुर्शीद काही दिवसांपुर्वी म्हणाले होते.
हेही वाचा - संयुक्त राष्ट्राचे सर्व कर्ज भारताने फेडले; यादीत पाकिस्तान-चीनचा उल्लेखही नाही