ETV Bharat / bharat

राहुल गांधींनी केले पुलित्झर पुरस्कार मिळालेल्या भारतीय छायाचित्रकारांचे अंभिनंदन

author img

By

Published : May 6, 2020, 8:40 AM IST

कोलंबिया विद्यापीठाने सोमवारी यावर्षीच्या पुलित्झर पारितोषिकांची घोषणा केली आहे. यावर्षी हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींंमध्ये तीन भारतीय छायाचित्रकारांचा समावेश आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय छायाचित्रकांराचे अभिनंदन केले आहे. दरम्यान यावरून भाजपने राहुल गांधींवर टीका केली आहे.

Rahul lauds three photojournalists from J-K who won 2020 Pulitzer Prize
Rahul lauds three photojournalists from J-K who won 2020 Pulitzer Prize

नवी दिल्ली - कोलंबिया विद्यापीठाने सोमवारी यावर्षीच्या पुलित्झर पारितोषिकांची घोषणा केली आहे. मध्ये पत्रकारितेचे १५, आणि साहित्य, नाटक आणि संगीत यामधील सात पुरस्कारांचा समावेश आहे. यावर्षी हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींंमध्ये तीन भारतीय छायाचित्रकारांचा समावेश आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय छायाचित्रकांराचे अभिनंदन केले आहे. दरम्यान यावरून भाजपने राहुल गांधींवर टीका केली आहे.

  • Congratulations to Indian photojournalists Dar Yasin, Mukhtar Khan and Channi Anand for winning a Pulitzer Prize for their powerful images of life in Jammu & Kashmir. You make us all proud. #Pulitzer https://t.co/A6Z4sOSyN4

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तीन छायाचित्रकारांना पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही. भारताने काश्मीर जबरदस्तीने काबीज केले आहे, असे हा पुरस्कार म्हणतो. राहुल यांनी तीन तथाकथित पत्रकारांचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे काश्मीरबद्दल काँग्रेसचे मत काय आहे, हे सोनिया गांधींनी स्पष्ट करावे, असे टि्वट भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले आहे.

  • आज तीन photographers को पुलिट्सर अवार्ड मिला।यह अवार्ड कहती है कश्मीर भारत का अभिन्न अंग नहीं है ..भारत ने जबरन कश्मीर को अपने क़ब्ज़े में रखा है।
    राहुल गांधी ने तीनो तथाकथित पत्रकारों को बधाई दी है।
    सोनिया जी को clarify करना होगा की कश्मीर को के कांग्रेस क्या सोचती है?? pic.twitter.com/5oiSJB4tij

    — Sambit Patra (@sambitswaraj) May 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुलित्झर हा पुरस्कार पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. चान्नी आनंद, मुख्तार खान आणि दार यासिन यांनी काश्मीरमधील गदारोळ सुरू असताना घेतलेल्या छायाचित्रांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

१९१७मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांचे हे १९१७वे वर्ष आहे. पुलित्झर पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्रासर १५ हजार डॉलर्सचे बक्षीसही देण्यात येते. सार्वजनिक सेवा विभागातील पुरस्कार वगळता इतरांनाच रोख रक्कम पुरस्कारात मिळते. सार्वजनिक सेवा विभागातील पुरस्कार विजेत्याला सुवर्णपदक देण्यात येते.

नवी दिल्ली - कोलंबिया विद्यापीठाने सोमवारी यावर्षीच्या पुलित्झर पारितोषिकांची घोषणा केली आहे. मध्ये पत्रकारितेचे १५, आणि साहित्य, नाटक आणि संगीत यामधील सात पुरस्कारांचा समावेश आहे. यावर्षी हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींंमध्ये तीन भारतीय छायाचित्रकारांचा समावेश आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय छायाचित्रकांराचे अभिनंदन केले आहे. दरम्यान यावरून भाजपने राहुल गांधींवर टीका केली आहे.

  • Congratulations to Indian photojournalists Dar Yasin, Mukhtar Khan and Channi Anand for winning a Pulitzer Prize for their powerful images of life in Jammu & Kashmir. You make us all proud. #Pulitzer https://t.co/A6Z4sOSyN4

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तीन छायाचित्रकारांना पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही. भारताने काश्मीर जबरदस्तीने काबीज केले आहे, असे हा पुरस्कार म्हणतो. राहुल यांनी तीन तथाकथित पत्रकारांचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे काश्मीरबद्दल काँग्रेसचे मत काय आहे, हे सोनिया गांधींनी स्पष्ट करावे, असे टि्वट भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले आहे.

  • आज तीन photographers को पुलिट्सर अवार्ड मिला।यह अवार्ड कहती है कश्मीर भारत का अभिन्न अंग नहीं है ..भारत ने जबरन कश्मीर को अपने क़ब्ज़े में रखा है।
    राहुल गांधी ने तीनो तथाकथित पत्रकारों को बधाई दी है।
    सोनिया जी को clarify करना होगा की कश्मीर को के कांग्रेस क्या सोचती है?? pic.twitter.com/5oiSJB4tij

    — Sambit Patra (@sambitswaraj) May 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुलित्झर हा पुरस्कार पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. चान्नी आनंद, मुख्तार खान आणि दार यासिन यांनी काश्मीरमधील गदारोळ सुरू असताना घेतलेल्या छायाचित्रांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

१९१७मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांचे हे १९१७वे वर्ष आहे. पुलित्झर पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्रासर १५ हजार डॉलर्सचे बक्षीसही देण्यात येते. सार्वजनिक सेवा विभागातील पुरस्कार वगळता इतरांनाच रोख रक्कम पुरस्कारात मिळते. सार्वजनिक सेवा विभागातील पुरस्कार विजेत्याला सुवर्णपदक देण्यात येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.