ETV Bharat / bharat

'मिशन शक्ती'चा कचरा ४५ दिवसात नष्ट होणार - सतीश रेड्डी

author img

By

Published : Apr 7, 2019, 5:50 AM IST

दोन वर्षापासून १५० वैज्ञानिकांनी या मिशनसाठी मेहनत घेतल्याची माहिती रेड्डी यांनी दिली.

डीआरडीओ प्रमुख जी. सतीश रेड्डी

नवी दिल्ली - भारताने २७ मार्चला ‘मिशन शक्ती’द्वारे अवकाशातील उपग्रह पाडण्याची यशस्वी कामगिरी केली. हे मिशन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मागील दोन वर्षापासून १५० वैज्ञानिक मेहनत घेतली होती. तसेच, मिशन शक्तीमुळे अंतराळ स्थानकाला धोका नसून येत्या ४५ दिवसात हा कचरा (डेब्रिस) नष्ट होणार असल्याची माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे(डीआरडीओ) प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी दिला आहे.


अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने 'मिशन शक्ती'वर टीका केली होती आणि या चाचणीमुळे अवकाशात सुमारे ४०० तुकडे निर्माण झाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला (आयएसएस) धोका निर्माण झाल्याचे सांगितले होते. मात्र, ईटीव्ही भारतशी बोलताना डीआरडीओ प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी कोणताही हानी होणार नाही, याची पुर्ण काळजी घेतल्याचे स्पष्ट केले. या चाचणीनंतर निर्माण झालेला कचऱ्यांने धोका होऊ नये, म्हणून उपग्रह पाडण्यासाठी ३०० किलोमीटरची कक्षा निवडण्यात आली होती. हा कचरा हळुहळु खाली येत असून संशोधकांच्या अंदाजानुसार येत्या ४५ दिवसात हा कचरा नष्ट होईल, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.


भारताच्या मिशन शक्तीमुळे आयएसएसला धोका निर्माण झाला आहे. उपग्रह पाडण्याच्या अशा प्रकारची घटना भविष्यातील मानवी अवकाश मोहिमांसाठी अनुकूल नाही, असे विधान नासाचे जिम ब्रिडेन्स्टीन यांनी केले होते. मात्र, अमेरिकेचे संरक्षण विभाग पेंटागनने भारताच्या चाचणीमुळे कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे.


'दोन वर्षापासून १५० वैज्ञानिक मेहनत'


2016 मध्ये पंतप्रधानानी या योजनेला परवानगी दिल्यानंतर भारतानेही या दिशेने काम सुरू केले. दोन वर्षापासून १५० वैज्ञानिकांनी या मिशनसाठी मेहनत घेतल्याची माहिती रेड्डी यांनी दिली.


अवकाश आणि आण्विक क्षेत्रातील विशेषज्ञ राजेश्वरी पिल्लई राजगोपाल यांनी ईटीव्ही भारतला सांगितले, की भारताचा हेतू पूर्णपणे सुरक्षित आणि उत्तरदायी आहे. आम्ही चीनपेक्षा सुरक्षित चाचणी केली आहे. भारताचा रेकॉर्ड त्यांच्याहून चांगला आहे. आपण ही चाचणी केली आणि जगासमोर ठेवली. मात्र, चीनने हे परीक्षण ८०० किलोमीटरपेक्षा अधिक उंचीवर केले. या चाचणीनंतर निर्माण झालेला कचरा अजूनही अंतराळात तरंगत आहेत. चीनने ते स्वीकारले नाही, असे त्यांनी सांगत मिशन शक्ती संपुर्ण सुरक्षित चाचणी असल्याचे स्पष्ट केले.

नवी दिल्ली - भारताने २७ मार्चला ‘मिशन शक्ती’द्वारे अवकाशातील उपग्रह पाडण्याची यशस्वी कामगिरी केली. हे मिशन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मागील दोन वर्षापासून १५० वैज्ञानिक मेहनत घेतली होती. तसेच, मिशन शक्तीमुळे अंतराळ स्थानकाला धोका नसून येत्या ४५ दिवसात हा कचरा (डेब्रिस) नष्ट होणार असल्याची माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे(डीआरडीओ) प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी दिला आहे.


अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने 'मिशन शक्ती'वर टीका केली होती आणि या चाचणीमुळे अवकाशात सुमारे ४०० तुकडे निर्माण झाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला (आयएसएस) धोका निर्माण झाल्याचे सांगितले होते. मात्र, ईटीव्ही भारतशी बोलताना डीआरडीओ प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी कोणताही हानी होणार नाही, याची पुर्ण काळजी घेतल्याचे स्पष्ट केले. या चाचणीनंतर निर्माण झालेला कचऱ्यांने धोका होऊ नये, म्हणून उपग्रह पाडण्यासाठी ३०० किलोमीटरची कक्षा निवडण्यात आली होती. हा कचरा हळुहळु खाली येत असून संशोधकांच्या अंदाजानुसार येत्या ४५ दिवसात हा कचरा नष्ट होईल, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.


भारताच्या मिशन शक्तीमुळे आयएसएसला धोका निर्माण झाला आहे. उपग्रह पाडण्याच्या अशा प्रकारची घटना भविष्यातील मानवी अवकाश मोहिमांसाठी अनुकूल नाही, असे विधान नासाचे जिम ब्रिडेन्स्टीन यांनी केले होते. मात्र, अमेरिकेचे संरक्षण विभाग पेंटागनने भारताच्या चाचणीमुळे कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे.


'दोन वर्षापासून १५० वैज्ञानिक मेहनत'


2016 मध्ये पंतप्रधानानी या योजनेला परवानगी दिल्यानंतर भारतानेही या दिशेने काम सुरू केले. दोन वर्षापासून १५० वैज्ञानिकांनी या मिशनसाठी मेहनत घेतल्याची माहिती रेड्डी यांनी दिली.


अवकाश आणि आण्विक क्षेत्रातील विशेषज्ञ राजेश्वरी पिल्लई राजगोपाल यांनी ईटीव्ही भारतला सांगितले, की भारताचा हेतू पूर्णपणे सुरक्षित आणि उत्तरदायी आहे. आम्ही चीनपेक्षा सुरक्षित चाचणी केली आहे. भारताचा रेकॉर्ड त्यांच्याहून चांगला आहे. आपण ही चाचणी केली आणि जगासमोर ठेवली. मात्र, चीनने हे परीक्षण ८०० किलोमीटरपेक्षा अधिक उंचीवर केले. या चाचणीनंतर निर्माण झालेला कचरा अजूनही अंतराळात तरंगत आहेत. चीनने ते स्वीकारले नाही, असे त्यांनी सांगत मिशन शक्ती संपुर्ण सुरक्षित चाचणी असल्याचे स्पष्ट केले.

Intro:Body:

नवी दिल्ली - भारताने २७ मार्चला ‘मिशन शक्ती’द्वारे अवकाशातील उपग्रह पाडण्याची यशस्वी कामगिरी केली. हे मिशन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मागील दोन वर्षापासून १५० वैज्ञानिक मेहनत घेतली होती. तसेत, मिशन शक्तीमुळे अंतराळ स्थानकाला धोका नसून येत्या ४५ दिवसात हा कचरा (डेब्रिस) नष्ट होणार असल्याची माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे(डीआरडीओ) प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी दिला आहे.





अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने 'मिशन शक्ती'वर टीका केली होती आणि या चाचणीमुळे अवकाशात सुमारे ४०० तुकडे निर्माण झाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला (आयएसएस) धोका निर्माण झाल्याचे सांगितले होते. मात्र, ईटीव्ही भारतशी बोलताना डीआरडीओ प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी कोणताही हानी होणार नाही, याची पुर्ण काळजी घेतल्याचे स्पष्ट केले. या चाचणीनंतर निर्माण झालेला कचऱयांने धोका होऊ नये, म्हणून उपग्रह पाडण्यासाठी ३०० किलोमीटरची कक्षा निवडण्यात आली होती. हा कचरा हळुहळु खाली येत असून संशोधकांच्या अंदाजानुसार येत्या ४५ दिवसात हा कचरा नष्ट होईल, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.  





भारताच्या मिशन शक्तीमुळे आयएसएसला धोका निर्माण झाला आहे. उपग्रह पाडण्याच्या अशा प्रकारची घटना भविष्यातील मानवी अवकाश मोहिमांसाठी अनुकूल नाही, असे विधान नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टीन यांनी केले होते. मात्र, अमेरिकेच्या पेंटागनने भारताच्या चाचणीमुळे कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे.   





'दोन वर्षापासून १५० वैज्ञानिक मेहनत'





२०१६ मध्ये पंतप्रधानानी या योजनेला परवानगी दिल्यानंतर भारतानेही या दिशेने काम सुरू केले. दोन वर्षापासून १५० वैज्ञानिकांनी या मिशनसाठी मेहनत घेतल्याची माहिती रेड्डी यांनी दिली.  

अवकाश आणि आण्विक क्षेत्रातील विशेषज्ञ राजेश्वरी पिल्लई राजगोपाल यांनी ईटीव्ही भारतला सांगितले, की भारताचा हेतू पूर्णपणे सुरक्षित आणि उत्तरदायी आहे. आम्ही चीनपेक्षा सुरक्षित चाचणी केली आहे. भारताचा रेकॉर्ड त्यांच्याहून चांगला आहे. आपण ही चाचणी केली आणि जगासमोर ठेवली. मात्र, चीनने हे परीक्षण ८०० किलोमीटरपेक्षा अधिक उंचीवर केली. या चाचणीनंतर निर्माण झालेला कचरा अजूनही अंतराळात तरंगत आहेत. चीनने ते स्वीकारले नाही, असे त्यांनी सांगत मिशन शक्ती संपुर्ण सुरक्षित चाचणी असल्याचे स्पष्ट केले.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.