मोरीगाव - आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात बाग्लादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याला डीटेंशन कँपमध्ये पाठवण्यात आले आहे. त्याचे नाव समर अली आहे. तो मोरीगाव जिल्ह्यातील बोरीबाजरा येथील रहिवासी असल्याची नोंद आहे. शुक्रवारी मोरीगाव न्यायालयाने त्याला परदेशी नागरीक घोषीत केले.
दोन वर्षापूर्वी त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन वर्षानंतर त्याला परदेशी नागरी घोषीत करण्यात आले. तो न्यायालयाकडे महत्वाची कागदपत्रे सादर करण्यात अपयशी ठरला. यामुळे त्याला तेजपूरच्या डीटेंशन कँपमध्ये पाठवण्यात आले.