म्हैसूर (कर्नाटक) - म्हैसूर पॅलेस येथील वार्षिक शरणनवरात्री उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे खास दरबार किंवा खासगी दरबार. आज सकाळी 10.45 ते 11.05 च्या दरम्यान भव्य दरबार हॉलमध्ये राजघराण्यातील प्रमुख यदुवीर कृष्णदत्त चमराजा वाडियार यांच्या सुवर्ण सिंहासनावर बसण्याने याचा प्रारंभ झाला.
सकाळी 10.35 वाजता यदुवीरला तेल-स्नान शास्त्राद्वारे खासगी दरबारचे विधी सुरू झाले. पहाटे 6.15 ते 6.30 च्या दरम्यान सोन्याच्या सिंहासनावर सिंहाची मस्तके ठेवण्यात आली. 4 ऑक्टोबरला सिंहासन (सोन्याचे) आणि भद्रासन (चांदीचे सिंहासन) एकत्र आणण्यात आले. सिंहासन दरबार हॉलमध्ये ठेवण्यात आले, तर, भद्रासन कन्नडी थोटी येथे ठेवण्यात आले आहे.
विधी झाल्यावर सकाळी 7.75 ते 8.15 दरम्यान यदुवीर यांना कंकण बांधण्यात आले. परंपरेनुसार, एकदा कंकण बांधल्यानंतर राजघराण्यातील प्रमुखाला दहा दिवस केवळ पॅलेसमध्येच रहावे आणि वावरावे लागते.
हेही वाचा - चकमक करणाऱ्या दहशतवाद्याला शरण येण्याचे सैनिकाकडून आवाहन, नंतर असे घडले नाट्य...
सकाळी 10.45 ते 11.05 च्या दरम्यान पट्टादा आणे (हत्ती), पट्टादा कुदुरे (घोडा), पट्टादा हसू (गाय) आणि पट्टादा ओन्टे (उंट) हे सर्व विधीसाठी आणले गेले. त्यानंतर त्यांना सवारा थोटी येथे नेण्यात आले, जेथे यदुवीर यांची पूजा करण्यात आली आणि पट्टादा आणे, कुदुरे, हसू आणि ओन्टे यांनी त्यांना आशीर्वाद दिला.
पोलीस आणि नोकरशहांच्या कुटुंबातील काहींना येथे प्रवेश दिला जातो. मात्र, इतरांसाठी आणि सार्वजनिक प्रवेशासाठी येथे कडक निर्बंध आहेत. मात्र, निवडक माध्यम प्रतिनिधींना येथे जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
हेही वाचा - भारतीय सार्वजनिक आरोग्य व्यवस्था गंभीर स्थितीत!
सिंहासनावर बसलेल्या यदुवीर कृष्णदत्त चमराजा वाडियार यांच्या हस्ते आजपासून 9 दिवस खास दरबारचे विधी संध्याकाळी होतील.